शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

‘माळेगाव’ची सत्ता गेल्याने अजित पवारांना दु:ख

By admin | Updated: March 27, 2017 01:59 IST

केंद्र व राज्यातील सत्ता गेली. त्या पाठोपाठ पुणे, पिंपरी-चिंचवडची सत्ता गेली, त्याचे अजित पवारांना दु:ख नाही, परंतु

बारामती : केंद्र व राज्यातील सत्ता गेली. त्या पाठोपाठ पुणे, पिंपरी-चिंचवडची सत्ता गेली, त्याचे अजित पवारांना दु:ख नाही, परंतु माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता गेल्याचे दु:ख त्यांना आहे. त्यामुळे सातत्याने माळेगाव कारखान्याच्या बाबत संभ्रम आणि दिशाभूल करणारे वक्तव्य करतात. त्यांच्या ताब्यातील खासगी, सहकारी कारखान्यांचे विस्तारीकरण केले जात आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध केला जात आहे. कारण, जादा दरामुळे गेटकेनचा ऊसदेखील माळेगावलाच मिळेल. दराबाबत त्यांच्या कारखान्यांना स्पर्धा करावी लागेल, अशी भीती त्यांना आहे, अशी टीका ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर केली. स्पर्धेत टिकण्यासाठी विस्तारीकरण...दौंड शुगर, अंबालिका, जरंडेश्वर, शरयू आदी खासगी आणि सहकारी कारखाने विस्तारीकरण करीत आहेत. त्याचे त्यांना काही नाही, पण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण होणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. विस्तारीकरणाच्या ठराव कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत घेतला आहे. उत्पादन खर्च कमी करायचा असेल, तर विस्तारीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. विस्तारीकरणानंतरदेखील कारखान्याच्या सभासदांच्या दरात काही फरक पडणार नाही, याची काळजी घेणार आहे. माळेगावच्या तुलनेत अन्य कारखान्यांचे दर कमी...माळेगाव कारखान्याने सन २०१५/२०१६ च्या हंगामात २८०० रुपये सर्वाधिक दर दिला. त्या तुलनेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २२२७ रुपये दर दिला. सोमेश्वरने २२५४ रुपये दर दिला. अंबालिका शुगरने २२५० रुपये, दौंड शुगरने २३०० रुपये आणि बारामती अ‍ॅग्रोने २१५० रुपये एफआरपीचा दर दिला. सोमेश्वर कारखान्याचा ५७३, छत्रपतीचा ५४५, अंबालिकाचा ५५०, दौंड शुगरचा ५०० आणि बारामती अ‍ॅग्रोचा ६५० रुपये दर माळेगाव कारखान्यापेक्षा कमी होता. त्यामुळे या कारखान्यांच्या ऊस उत्पादकांना २२७ कोटी ११ लाख ८५ हजार रुपये मिळाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, असल्याचे तावरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अजित पवार यांनी शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप... माळेगावचे विस्तारीकरण झाल्यास जादा उसाची लूट खासगी कारखान्यांना करता येत नाही. अजित पवार यांच्या खासगी कारखान्यांनी उसाची लूट करता येणार नाही, त्यामुळेच माळेगावच्या विस्तारीकरणाला विरोध केला जात. छत्रपती कारखाना लुटून मोकळे झाल्यावर विस्तारीकरण, सहवीजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले. त्या अगोदर त्यांच्या खासगी कारखान्यांचे विस्तारीकरण केले.  सहकाराचे पुरस्कर्ते असल्याचे सांगणारे अजित पवार खासगी कारखान्यांना फायदा होईल, असे वर्तन त्यांचे आहे. अजित पवार यांनी शेतकऱ्यांची लूट केली. ते शेतकऱ्यांचे ‘लुटारू’ नेते आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यांना माळेगाव अथवा कोणत्याही सहकारी कारखान्याच्या दराबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ४सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात खासगी कारखान्याच्या टोळ्या पडल्यामुळेच त्या कारखान्याच्या संचालक मंडळाने अजित पवार यांना न सांगता २७५० चा दर देण्याचा निर्णय घेतला, असल्याचे सांगून अजित पवार यांनी याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टीका त्यांनी केली. सभासदांना संभ्रम करणारी पत्र पाठविण्याचा प्रपंच केला जात आहे. माळेगावचे विस्तारीकरण करू नये, यासाठी जाहीर सभेत सांगतात. त्याच बरोबर त्यांच्या संचालकांनी मुंबई हायकोर्टात पत्र दिले आहे, ही वस्तुस्थित आहे. न्यायालयाची परवानगी घेऊनच विस्तारीकरण मार्गी लावणार असल्याचे तावरे यांनी सांगितले.