शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

विमानतळ सीमारेषा निश्चितीची प्रक्रिया सुरू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 20:56 IST

पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे २ हजार ३६७ कोटी जमीन संपादित करावी लागणार आहे. तसेच त्यासाठी अंदाजे ३ हजार ५१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ठळक मुद्देभूसंपादन : अधिसूचनेची प्रतिक्षाअंदाजे ८०० कोटी रुपयांचा मोबदला शेतक-यांना

पुणे: राज्य शासनाकडून पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मंजूरी देण्यात आली असली तरी विमानतळाच्या सीमारेषा निश्चित करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे भूसंपादनाची स्वतंत्र अधिसूचना प्रसिध्द केल्या झाल्यानंतरच विमानतळासाठी लागणा-या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू होईल,असे जिल्हा प्रशासनातील भूसंपादन विभागातील अधिका-यांनी सांगितले.पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे २ हजार ३६७ कोटी जमीन संपादित करावी लागणार आहे. तसेच त्यासाठी अंदाजे ३ हजार ५१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातही जमीन भूसंपादनास अंदाजे २ हजार २७१ कोटी आणि फळझाडे, विहिरी,ताली आदीसाठी अंदाजे ८०० कोटी रुपयांचा मोबदला शेतक-यांना द्यावा लागू शकतो. मात्र, कोणत्या गावातील किती एकर जमिनीचे संपादन करावे लागणार असून त्यासाठी किती खर्च येईल याची अचूक माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. तसेच विमानतळाच्या सीमारेषाही अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.विमानतळासाठी संपादित केल्या जाणा-या जमिनीमुळे एकही गावठाण बाधित होणार नाही; याची काळजी घेतली जाणार असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले होते. त्यामुळे विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील पारगाव,खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी व उदाची वाडी या सात गावांतील कोणत्या गट क्रमांकातील किती एकर जमिनीचे संपादन करावे लागणार याबाबतची माहिती घेण्याची प्रक्रिया स्पेशल प्लॅनिंग अ‍ॅथेरोटीकडून सुरू आहे. जमिनीसंदर्भातील अचूक माहिती प्राप्त झाल्यानंतर भूसंपादनाची स्वतंत्र अधिसूचना प्रसिध्द होईल. त्यामुळे शासनाकडून भूसंपादनास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असली तरी प्रत्यक्षात भूसंपादन सुरू करण्यास अजून काही कालावधी थांबावे लागणार आहे. 

टॅग्स :PurandarपुरंदरAirportविमानतळSaurabh Raoसौरभ राव