शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

'एआय' तंत्रज्ञान हे केवळ संकलन करू शकेल, पण सृजन नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 06:22 IST

पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : भारतीय संस्कृतीत ग्रंथांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे आज डिजिटल तंत्रज्ञान आले असले, तरी देखील ग्रंथांचे महत्त्व संपणार नाही. 'एआय' तंत्रज्ञान हे केवळ संकलन करू शकेल, पण सृजन करू शकणार नाही. म्हणून ग्रंथ कायम राहतील,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयातील मैदानावर झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुस्तक महोत्सव महाराष्ट्रभर राबविण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली. महोत्सव २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये सुमारे ७०० स्टॉल्स आहेत. फडणवीस म्हणाले की, आपले ग्रंथांशी असलेले नाते चिरकाल आहे. जगातील सर्वांत जुनी परंपरा भारताची आहे. समाजात सृजनशीलता आहे, तोपर्यंत पुस्तकं राहतील. वाचन संस्कृती कधीच संपू शकत नाही.

'मी पुन्हा येईन'चा गजर '

आमचे नेते प्रमोद महाजन सांगत की, एकाच ठिकाणी दोन वेळा पाहुणा म्हणून जाऊ नये. मात्र, हा पुस्तक महोत्सव आहे. मागील वर्षी आलो होतो, आता दुसऱ्या पर्वात आलो आणि पुढेही मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन,' असे तीन वेळा म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्यातील मिश्किलीचा प्रत्यय श्रोत्यांना दिला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfergusson collegeफर्ग्युसन महाविद्यालय