शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

कृषी अधिकारी-कर्मचारी जाणार शेतीच्या बांधावर:  सदाभाऊ खोत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 21:40 IST

पेरणी कालावधीत बांधावर जाऊन बियाणे, खते अधिकृत आणि कृषी विभागाने शिफारस केल्याप्रमाणे वापरली जातात की नाही हे या भेटीदरम्यान पाहिले जाईल.

ठळक मुद्देशिफारस केलेल्या खते-बियाणांच्या वापराची करणार पडताळणीबांधावर गेल्यानंतर शेतकऱ्यासोबत संबंधिताला सेल्फी देखील काढावा लागणार

पुणे : कोणत्या पिकाची पेरणी होते, खते आणि बियाणांचा कसा वापर शेतकरी करतात याची अचूक माहिती मिळावी यासाठी कृषी विभागातील शिपायांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना बांधावर जाण्याचा आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी दिला.  खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. खोत म्हणाले, कृषी विभागाचा प्रत्येक अधिकारी कर्मचारी बांधावर जाईल असे नियोजन करण्यात आले आहे. अनेकदा पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून बियाणांची तक्रार केली जाते. त्यामुळे पेरणी कालावधीत बांधावर जाऊन बियाणे, खते अधिकृत आणि कृषी विभागाने शिफारस केल्याप्रमाणे वापरली जातात की नाही हे या भेटीदरम्यान पाहिले जाईल. तसेच, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि अधिकाºयांमार्फत खते आणि बियाणांची निवड, तसेच वापराबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. बोगस किटकनाशके, खते, बियाणांच्या विक्रीला आळा बसावा यासाठी तालुका, जिल्हा आणि आयुक्तालय स्तरावर पथके स्थापन करण्यात येतील. या तपासणीत संबंधित परवानाधारकाकडे परवान्या व्यतिरिक्त इतर बियाणे आणि किटकनाशके आढळल्यास संबंधिताचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच, त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार देखील दिली जाईल. प्रत्येक परवानाधारकाने मालाची पावती देणे बंधनकारक आहे. विनापावती विक्री करताना आढळल्यास, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. गेल्या वर्षी बोंड आळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३ हजार ६०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. बोंड आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापूस उत्पादन क्षेत्रात तालुकानिहाय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच, कापसाचे देशी वाण वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यंदा १५२ लाख हेक्टरवर पेरणी होईल असा अंदाज असल्याचे खोत म्हणाले. ------------------------सेल्फी विथ फार्मर पिकांच्या पेरणीचा यंदाचा कल समजावा, बियाणे आणि खतांचा वापर कृषी विभागाच्या शिफारशींनुसार होतोय की नाही, हे पाहण्यासाठी या खरीप हंगामापासून कृषी विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना शेताच्या बांधावर जावे लागणार आहे. बांधावर गेल्यानंतर शेतकऱ्यासोबत संबंधिताला सेल्फी देखील काढावा लागणार आहे. तशा सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खरीप आढावा बैठकीत दिल्या. त्याबाबत पत्रकार परिषदेत त्यांना विचारले असता त्यांनी सेल्फीबाबत बोलणे टाळले. मात्र, शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्व व्यक्ती बांधावर जातील, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSadabhau Khotसदाभाउ खोत Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी