शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पिहिली प्रतिक्रिया 
3
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
4
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
5
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
6
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
7
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
8
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
9
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
10
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
11
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
12
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
13
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
14
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
15
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
16
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
17
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
18
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
19
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
20
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी जे केले ते योग्य होते का? कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा सवाल

By नितीन चौधरी | Updated: September 22, 2022 20:55 IST

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते...

पुणे : “महाविकास आघाडी सरकारच्या दुकांनामधून वाईन विकण्याच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असल्यास वाईन परवान्याबाबत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील,” असे मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. सत्तार म्हणाले, “चारही कृषी विद्यापीठांच्या अडचणी गुरुवारच्या बैठकीत जाणून घेतल्या. शासकीय आणि खासगी महाविद्यालयांनी दर्जेदार शिक्षण द्यावा असा प्रयत्न आहे. भविष्यात शेतकऱ्यांना याचा काय फायदा होईल या दृष्टीने चर्चा केली. शेती क्षेत्रात अनेक नवीन रोग आले, ते नष्ट कसे होतील यावर कायमस्वरुपी उपाय शोधले जातील.

वाईन धोरणासंदर्भात शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यात येतील. कृषीमंत्री म्हणून मी याबाबत सकारात्मक आहे. यापुढे राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून शेतकऱ्यांना काय अडचणी येतात ते जाणून घेऊ, असेही सत्तार म्हणाले.

शिक्षण विभागाची यादी बनावटमाझ्या मुलीचा पगार २०२० मध्येच बंद झाला होता. टीईटी घोटाळ्याबाबत अनेक आरोप झाले आहेत. ज्या ज्या वेळी निवडणुका येतात त्या वेळी माझ्यावर आरोप होतात. मी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चाैकशीची विनंती केली आहे. त्यानंतर मुख्य सचिव या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही यादी शिक्षण विभागाने केलेली नाही. ही यादी बनावट आहे, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला.

गेल्या सरकारने काहीच केले नाही“मला आश्चर्य वाटत आहे. गुजरात सरकारने ज्या सुविधा देत आहे त्या आपण द्यायला हव्या होत्या, खरेतर आधीच्या सरकारमध्ये मी होतो, आदित्य ठाकरे होते ही सामूहिक जबाबदारी होती, आम्ही त्यात कमी पडलो. मागच्या सरकारने २ वर्ष काहीच केले नाही. माजीमंत्री सुभाष देसाई हे तर आमचाही रामराम घेत नव्हते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा टोलाही सत्तार यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी जे केले ते योग्य होते का?

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबाबत सत्तार म्हणाले, “मी फार जवळून त्यांना बघितले नाही, भाजपसोबत युती तोडल्यानंतर त्यांनी जे केले ते इमानी इतबारे होते का? एकनाथ शिंदे हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. रिक्षावाला म्हणून ओळखतात मग रिक्षामध्ये ५० लोक (आमदार) कसे बसलेत याचा विचार केला का? शिवसेनेने सत्ता स्थापन करताना जो धोका दिला तेव्हा ती सती सावित्री होती का?,” असा सवालही सत्तार यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेAbdul Sattarअब्दुल सत्तारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे