शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

उद्धव ठाकरेंनी जे केले ते योग्य होते का? कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा सवाल

By नितीन चौधरी | Updated: September 22, 2022 20:55 IST

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते...

पुणे : “महाविकास आघाडी सरकारच्या दुकांनामधून वाईन विकण्याच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असल्यास वाईन परवान्याबाबत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील,” असे मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. सत्तार म्हणाले, “चारही कृषी विद्यापीठांच्या अडचणी गुरुवारच्या बैठकीत जाणून घेतल्या. शासकीय आणि खासगी महाविद्यालयांनी दर्जेदार शिक्षण द्यावा असा प्रयत्न आहे. भविष्यात शेतकऱ्यांना याचा काय फायदा होईल या दृष्टीने चर्चा केली. शेती क्षेत्रात अनेक नवीन रोग आले, ते नष्ट कसे होतील यावर कायमस्वरुपी उपाय शोधले जातील.

वाईन धोरणासंदर्भात शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यात येतील. कृषीमंत्री म्हणून मी याबाबत सकारात्मक आहे. यापुढे राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून शेतकऱ्यांना काय अडचणी येतात ते जाणून घेऊ, असेही सत्तार म्हणाले.

शिक्षण विभागाची यादी बनावटमाझ्या मुलीचा पगार २०२० मध्येच बंद झाला होता. टीईटी घोटाळ्याबाबत अनेक आरोप झाले आहेत. ज्या ज्या वेळी निवडणुका येतात त्या वेळी माझ्यावर आरोप होतात. मी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चाैकशीची विनंती केली आहे. त्यानंतर मुख्य सचिव या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही यादी शिक्षण विभागाने केलेली नाही. ही यादी बनावट आहे, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला.

गेल्या सरकारने काहीच केले नाही“मला आश्चर्य वाटत आहे. गुजरात सरकारने ज्या सुविधा देत आहे त्या आपण द्यायला हव्या होत्या, खरेतर आधीच्या सरकारमध्ये मी होतो, आदित्य ठाकरे होते ही सामूहिक जबाबदारी होती, आम्ही त्यात कमी पडलो. मागच्या सरकारने २ वर्ष काहीच केले नाही. माजीमंत्री सुभाष देसाई हे तर आमचाही रामराम घेत नव्हते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा टोलाही सत्तार यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी जे केले ते योग्य होते का?

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबाबत सत्तार म्हणाले, “मी फार जवळून त्यांना बघितले नाही, भाजपसोबत युती तोडल्यानंतर त्यांनी जे केले ते इमानी इतबारे होते का? एकनाथ शिंदे हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. रिक्षावाला म्हणून ओळखतात मग रिक्षामध्ये ५० लोक (आमदार) कसे बसलेत याचा विचार केला का? शिवसेनेने सत्ता स्थापन करताना जो धोका दिला तेव्हा ती सती सावित्री होती का?,” असा सवालही सत्तार यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेAbdul Sattarअब्दुल सत्तारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे