शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

उद्धव ठाकरेंनी जे केले ते योग्य होते का? कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा सवाल

By नितीन चौधरी | Updated: September 22, 2022 20:55 IST

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते...

पुणे : “महाविकास आघाडी सरकारच्या दुकांनामधून वाईन विकण्याच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असल्यास वाईन परवान्याबाबत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील,” असे मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. सत्तार म्हणाले, “चारही कृषी विद्यापीठांच्या अडचणी गुरुवारच्या बैठकीत जाणून घेतल्या. शासकीय आणि खासगी महाविद्यालयांनी दर्जेदार शिक्षण द्यावा असा प्रयत्न आहे. भविष्यात शेतकऱ्यांना याचा काय फायदा होईल या दृष्टीने चर्चा केली. शेती क्षेत्रात अनेक नवीन रोग आले, ते नष्ट कसे होतील यावर कायमस्वरुपी उपाय शोधले जातील.

वाईन धोरणासंदर्भात शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यात येतील. कृषीमंत्री म्हणून मी याबाबत सकारात्मक आहे. यापुढे राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून शेतकऱ्यांना काय अडचणी येतात ते जाणून घेऊ, असेही सत्तार म्हणाले.

शिक्षण विभागाची यादी बनावटमाझ्या मुलीचा पगार २०२० मध्येच बंद झाला होता. टीईटी घोटाळ्याबाबत अनेक आरोप झाले आहेत. ज्या ज्या वेळी निवडणुका येतात त्या वेळी माझ्यावर आरोप होतात. मी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चाैकशीची विनंती केली आहे. त्यानंतर मुख्य सचिव या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही यादी शिक्षण विभागाने केलेली नाही. ही यादी बनावट आहे, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला.

गेल्या सरकारने काहीच केले नाही“मला आश्चर्य वाटत आहे. गुजरात सरकारने ज्या सुविधा देत आहे त्या आपण द्यायला हव्या होत्या, खरेतर आधीच्या सरकारमध्ये मी होतो, आदित्य ठाकरे होते ही सामूहिक जबाबदारी होती, आम्ही त्यात कमी पडलो. मागच्या सरकारने २ वर्ष काहीच केले नाही. माजीमंत्री सुभाष देसाई हे तर आमचाही रामराम घेत नव्हते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा टोलाही सत्तार यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी जे केले ते योग्य होते का?

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबाबत सत्तार म्हणाले, “मी फार जवळून त्यांना बघितले नाही, भाजपसोबत युती तोडल्यानंतर त्यांनी जे केले ते इमानी इतबारे होते का? एकनाथ शिंदे हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. रिक्षावाला म्हणून ओळखतात मग रिक्षामध्ये ५० लोक (आमदार) कसे बसलेत याचा विचार केला का? शिवसेनेने सत्ता स्थापन करताना जो धोका दिला तेव्हा ती सती सावित्री होती का?,” असा सवालही सत्तार यांनी केला.

टॅग्स :PuneपुणेAbdul Sattarअब्दुल सत्तारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे