शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

एफआरपीवर कराराचा उतारा!, साखर कारखाने आता करणार थेट शेतकऱ्यांशी करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 01:25 IST

साखरेला फारसा भाव नसल्याने साखर कारखान्यांसमोर उसाची रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्यात अडचण आहे. हजारो कोटींची एफआरपी थकीत आहे.

पुणे : साखरेला फारसा भाव नसल्याने साखर कारखान्यांसमोर उसाची रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्यात अडचण आहे. हजारो कोटींची एफआरपी थकीत आहे. यावर उपाय म्हणून कारखान्यांनी आता उर्वरित हंगामासाठी शेतक-यांशी थेट करार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. करारानुसार दोन वा तीन हप्त्यात एफआरपीची रक्कम शेतक-यांना दिली जाईल.शुगरकेन कंट्रोल १६६ च्या कायद्यानुसार शेतक-यांना ऊस गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. राज्यात १५ जानेवारी अखेरच्या गाळपानुसार ३१ जानेवारी अखेरीस सुरू असलेल्या १९० साखर कारखान्यांकडे १३ हजार ३०५ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपये शेतकºयांना देण्यात आले. थकबाकीदार कारखान्यांविरोधात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रेव्हेन्यू रिकव्हरी सर्र्टिफिकेट (आरआरसी) बजावले आहे. त्यामुळे ३१ जानेवारीनंतर काही कारखान्यांनी ५० कोटींचा भरणा केला आहे.कायद्यानुसार शेतकºयांशी करार न केल्यास १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. करार असल्यास एफआरपी हप्त्यात देता येते, अशी माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. याचा अर्थ कारखान्याला एफआरपीपेक्षा कमी रक्कम देता येणार नाही. एखाद्या कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये अथवा वार्षिक सर्वसाधारण सभेतील टप्पा पद्धतीचा ठराव अथवा निर्णय ग्राह्य धरला जाणार नाही. त्यासाठी प्रत्येक शेतकºयाशी स्वतंत्र करार करावा लागेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. राज्यातील ८ कारखान्यांनी सर्वसाधारण सभेत दोन ते तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचा ठराव केला आहे. त्यांना देखील शेतकºयांशी थेट करारच करावा लागेल.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने