शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

५६व्या वर्षी ती एकटी करणार कन्याकुमारी ते लेहपर्यंत सायकल प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 19:53 IST

जिद्दीला वय, लिंग, धर्म असे कोणतेही भेद नसतात. असते ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती. अशीच ईच्छाशक्ती दाखवत पुण्यातील वासंती जोशी या ५६ वर्षांच्या महिलेने १९ हजार ३०० फूट यांनी कन्याकुमारी ते लेह असा प्रवास करणार आहेत

ठळक मुद्देमहिलांच्या सबलीकरणासाठी भीतीवर विजय या ध्येयाकरीता आखली मोहीम५६व्या वर्षी पुण्याच्या वासंती जोशी करणार कन्याकुमारी ते लेहचा सायकल प्रवास 

 

पुणे : जिद्दीला वय, लिंग, धर्म असे कोणतेही भेद नसतात. असते ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती. अशीच ईच्छाशक्ती दाखवत पुण्यातील वासंती जोशी या ५६ वर्षांच्या महिलेने १९ हजार ३०० फूट यांनी कन्याकुमारी ते लेह असा प्रवास करणार आहेत. एकूण ४० दिवस असणारा हा प्रवास त्या सायकलवरून करणार असून कन्याकुमार ते लेह या मार्गाचा वापर करणार आहेत.जोशी या पुण्यातील एनएसडीटी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र गर्ल्स बटालियटनमध्ये त्यांनी काहीकाळ सेकंड लेफ्टनंट पदावर काम केले आहे. सायकलवरून करणाऱ्या या प्रवासाचे  त्यांचे घोषवाक्य भीतीवर विजय असे आहे. २८ मे रोजी त्यांच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे.या प्रवासातील आधुनिक स्त्री सशक्तीकरणाचे प्रतीक म्हणून १९ हजारे ३०० फुटावरील उमलिंग खिंडीत त्या एसएनडीटी विद्यापीठाचा झेंडा त्यांना फडकावणार आहेत. 

     जोशी यांनी यापूर्वी सायकलवरून २हजार ७२५ किलोमीटर अंतर असलेली नर्मदा परिक्रमा २७ दिवसात पूर्ण केली आहे.तसेच लेह ते श्रीनगर, लेह ते सियाचीन बेस आणि मनाली ते लेह अशीही सायकल सफर केली आहे. याबाबत जोशी यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी या प्रवासासाठी वय आडवे येत नसल्याचे सांगितले. उलट तरुण विद्यार्थींनींसोबत राहून मनाने अजून तरुण वाटते आणि ऊर्जा मिळते असा अनुभव सांगितला. या मोहिमेसाठी त्या दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करत असून बास्केटबॉलही खेळतात. इतकेच नव्हे तर जानेवारीपासून त्या आवर्जून २५ ते १५० किलोमीटरपर्यंत सायकलिंगचा सराव करतात. या काळात दररोज किती प्रवास करणार याचे नियोजन केले नसून शरीर आणि निसर्ग साथ देईल तशी मोहीम पूर्ण करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :PuneपुणेTravelप्रवास