शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

स्वातंत्र्यानंतरही विज्ञानापासून आपण लांबच; डॉ. जयंत नारळीकर यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 02:40 IST

ज्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो त्याची योग्य तपासणी केली तर एकविसाव्या शतकात राहाणे जास्त सोयीचे होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पुणे : पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’मधून विज्ञानाची महती लोकांपर्यंत पोहोचवली. स्वातंत्र्यानंतर लोक विज्ञानाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील आणि त्यांच्यात एक निर्णयक्षमता निर्माण होईल. मात्र स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी वैज्ञानिक दृष्टिकोनापासून आपण लांबच आहोत, अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली. ज्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो त्याची योग्य तपासणी केली तर एकविसाव्या शतकात राहाणे जास्त सोयीचे होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.२० आॅगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा हौतात्म्य दिन या वर्षीपासून ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय आॅल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी घेतला आहे. त्याच्या पूर्वसंध्येला या दोन्हींसह लोकविज्ञान संघटना आणि सिम्बायोसिस स्कूल आॅफ लिबरल आटर््स या संघटनांच्या वतीने ‘वैज्ञानिक दृष्टिकोन कशासाठी?’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ‘२१ व्या शतकात जगायला शिकताना’ या विषयावर ते बोलत होते.याप्रसंगी मुक्ता दाभोलकर, डॉ. विवेक माँटेरो आणि डॉ. सत्यजित रथ उपस्थित होते.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडले ही समाधानाची गोष्ट आहे. लवकरच संपूर्ण कट उघडकीस येईल अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ. नारळीकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी केली. ते म्हणाले, आज आसपासची स्थिती पाहातो तेव्हा असे वाटते, की अजूनही लोक १८ व १९व्या शतकातून बाहेर आलेले नाहीत. एकविसाव्या शतकात म्हणतो तेव्हा खासियत काय? विज्ञानाने अनेक गोष्टीत प्रगती केली. त्याचे पडसाद तंत्रज्ञानात उमटले. मात्र ज्या वेळी विज्ञानामधून तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानामधून विज्ञानात जातो तेव्हा सगळे विज्ञानाचे शोध कल्याणकारी असतातच असे नाही. त्याचे दुष्परिणाम असू शकतात. विज्ञानाचा योग्य वापर करतो की नाही, हे पाहणे आवश्यक आहे. दाभोलकर यांना माहिती होते की जुन्या विचारसरणीला नवीन प्रवाहात आणले पाहिजे. जी माहिती आपल्याला आहे ती कधीतरी अपुरीदेखील असू शकते त्यासाठी एखादी गोष्ट तपासून घेता आली पाहिजे. आपण कुठली गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून न तपासता अंधश्रद्धेच्या आहारी जातो. ही खरच अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे? लोकांना मदत करणे ही श्रद्धा असू शकते मात्र दोन्हीमध्ये काय तथ्य आहे याची तपासणी करावी. विश्वास ठेवणाऱ्या गोष्टींची तपासणी केली तर एकविसाव्या शतकात राहणे जास्त सोयीचे होईल.डॉ. सत्यजित रथ ‘परंपरा आणि नवता : एक वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर बोलताना म्हणाले, सामान्य माणसाचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक नसतो. राज्यघटनेने हे गाठोडं लोकांच्या डोक्यावर दिले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन मनुष्यत्वाचे व्यवच्छेदक लक्षण असेल तर आपण ते का हरवून बसलो आहोत हा प्रश्न आहे.वैैज्ञानिक दृष्टिकोन शोषणमुक्तीचा मार्गमुक्ता दाभोलकर यांनी ‘शोषणरहित समाजासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर विचार व्यक्त केले. शास्त्रज्ञ किंवा विज्ञानाच्या विषयावर काम करणाºया व्यक्तींना माहिती आहे की प्रश्न उपस्थित करताना हिंसा शोषण होऊ शकते, तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन हाच शोषणमुक्तीचा मार्ग आहे आणि त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. मुलांच्या मनात आज प्रश्न निर्माण होत आहेत आणि ते त्याची पडताळणी करीत आहेत. त्यांच्या अनुभविश्वाला भिडले पाहिजे तरच शोषणरहित समाज निर्माण होऊ शकतो. आयुष्यात निर्णय घेताना तर्क वापरता आले पाहिजेत. वैज्ञानिक दृष्टिकोनापासून शोषणविरहित समाजाकडे वाटचाल केली तर हिंसेला तोंड द्यावे लागणे हे आव्हान आहे. यासाठी माणसांनी एकमेकांचा आदर करून हात दिला पाहिजे.

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकरscienceविज्ञान