शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

अतिक्रमण कारवाईनंतरही परिस्थिती जैैसे थे! नगर परिषदेचा वाहतूक आराखडाही कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:27 IST

पुणे-नाशिक मार्गावरील राजगुरुनगर शहरातील वाडा रोड, पाबळ रोड येथील वाहतूककोंडीतील अडथळे मोठा गाजावाजा करीत प्रशासनाने हटविली. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा येथील परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र आहे.

- राजेंद्र मांजरेराजगुरुनगर : पुणे-नाशिक मार्गावरील राजगुरुनगर शहरातील वाडा रोड, पाबळ रोड येथील वाहतूककोंडीतील अडथळे मोठा गाजावाजा करीत प्रशासनाने हटविली. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा येथील परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र आहे. वाडा रोड भाजीमंडईलगत, पाबळ रोड येथे पुन्हा अतिक्रमण झाल्यामुळे वाहतूककोंडीत अजूनच भर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.राजगुरुनगर शहरामध्ये मागील महिन्यात पुणे-नाशिक महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील वाडा रोड, पाबळरोड येथील अनधिकृत बांधकाम,शेड टपºया, हातगाड्या यांच्यावर सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय आधिकारी आयुषप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखालीनगर परिषद, राष्ट्रीय राज्यमार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत कारवाई करण्यातआली होती. त्यात हातगाड्यांसह, टपºया व अन्य साहित्य जप्तकरण्यात आले. या कारवानंतर व्यावसायिकांना नगर परिषद हद्दीमध्ये पुन्हा जागा देण्यात आली. त्यांचे पर्यायी जागा देऊन पुनवर्सन करून हातगाड्या लावण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच राजगुरुनगर परिषद हद्दीमध्ये नगर परिषदेने टेंडर काढून वाहतूक आराखडाबाबत नियोजन केले होते. मात्र या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे.चालताही येत नाही : विक्रेत्यांनी दुकाने थाटलीशहरातील एकेरी वाहतूक, वाहनतळ, वाहनबंदी (नो पार्किंग), झेब्रा क्रॉसिंग याबाबत शहरात ठिकठिकाणी केलेले नियोजन कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. अतिक्रमण कारवाईनुसार त्या ठिकाणी टपरीधारक, फळविक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण करू नये; असे आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र पाबळ रोड येथे खासगी वाहनांचा वाहनतळ बनला आहे. त्यामुळे पादचाºयांना नीट चालताही येत नाही. तसेच वाडा रोड भाजीमंडईलगत रस्त्यावर भाजीविक्रेते रस्त्यावरच बसत असल्याने अजूनच वाहतूककोंडी होत आहे. महात्मा गांधी विद्यालयासमोर फळविक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटली आहेत. या रस्त्यावरून विद्यार्थी, नागरिक यांना येथून जाताना विनाकारण त्रास होतो.काही ठिकाणी अनधिकृत टपºया व भाजीविक्रेते, फळ विक्रेत्यांनी रस्ते व पदपथांवर ठाण मांडलेले आहे. त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे अतिक्रमण अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. किंबहुना त्यांच्याच आशीर्वादाने अतिक्रमणधारकांची मुजोरी कारवाईअभावी दिवसेंदिवस वाढत आहे अशी परिस्थिती आहे.कायदेशीर कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी नगर प्रशासनाचीच आहे. अतिक्रमणे पूर्वीप्रमाणेच होत असतील तर इतर ठिकाणच्या अतिक्रमणांना चाप बसण्याचे दूरच, एकच महिन्यात पुन्हा सर्वत्र अतिक्रमणे वाढू लागल्याने त्याचा विपरीत परिणाम पादचारी, वाहनधारक सर्वांनाच होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत नगर परिषद मुख्य अधिकारी संर्पक साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.माझी आता नव्यानेच नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. याबाबत माहिती घेऊन पुढील दोन दिवसांत बैठक घेऊन योग्य ती कारवाई करणार आहे. शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी व नागरिकांच्या हितासाठी शहरातील पुन्हा होत अतिक्रमणे काढण्यात येतील.-शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष राजगुरुनगर नगर परिषदपुन्हा अतिक्रमण होत असल्यास त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात येईल. त्यासाठी नगरपरिषद मध्ये अतिक्रमण विरोधी पथकांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यांनी पुन्हा झालेले अतिक्रम हटवावे. तसेच मी उद्या मुख्याधिकारी यांच्याशी बोलून माहिती घेतो.-आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी खेड विभागअतिक्रमणे हटवली परंतु यामुळे होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या अजुनही सुटलेली नाही. फक्त जे हातावर पोट भरत होते,त्या सगळ्यांचे नुकसान झाले. मात्र वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य ती कारवाई करावी. अतिक्रमण धारांचे पुनवर्सन करावे.- दीपक थिगळे (नागरिक )

टॅग्स :Puneपुणे