शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

अतिक्रमण कारवाईनंतरही परिस्थिती जैैसे थे! नगर परिषदेचा वाहतूक आराखडाही कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:27 IST

पुणे-नाशिक मार्गावरील राजगुरुनगर शहरातील वाडा रोड, पाबळ रोड येथील वाहतूककोंडीतील अडथळे मोठा गाजावाजा करीत प्रशासनाने हटविली. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा येथील परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र आहे.

- राजेंद्र मांजरेराजगुरुनगर : पुणे-नाशिक मार्गावरील राजगुरुनगर शहरातील वाडा रोड, पाबळ रोड येथील वाहतूककोंडीतील अडथळे मोठा गाजावाजा करीत प्रशासनाने हटविली. मात्र, काही दिवस गेल्यानंतर पुन्हा येथील परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र आहे. वाडा रोड भाजीमंडईलगत, पाबळ रोड येथे पुन्हा अतिक्रमण झाल्यामुळे वाहतूककोंडीत अजूनच भर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.राजगुरुनगर शहरामध्ये मागील महिन्यात पुणे-नाशिक महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील वाडा रोड, पाबळरोड येथील अनधिकृत बांधकाम,शेड टपºया, हातगाड्या यांच्यावर सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय आधिकारी आयुषप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखालीनगर परिषद, राष्ट्रीय राज्यमार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत कारवाई करण्यातआली होती. त्यात हातगाड्यांसह, टपºया व अन्य साहित्य जप्तकरण्यात आले. या कारवानंतर व्यावसायिकांना नगर परिषद हद्दीमध्ये पुन्हा जागा देण्यात आली. त्यांचे पर्यायी जागा देऊन पुनवर्सन करून हातगाड्या लावण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच राजगुरुनगर परिषद हद्दीमध्ये नगर परिषदेने टेंडर काढून वाहतूक आराखडाबाबत नियोजन केले होते. मात्र या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे.चालताही येत नाही : विक्रेत्यांनी दुकाने थाटलीशहरातील एकेरी वाहतूक, वाहनतळ, वाहनबंदी (नो पार्किंग), झेब्रा क्रॉसिंग याबाबत शहरात ठिकठिकाणी केलेले नियोजन कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. अतिक्रमण कारवाईनुसार त्या ठिकाणी टपरीधारक, फळविक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण करू नये; असे आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र पाबळ रोड येथे खासगी वाहनांचा वाहनतळ बनला आहे. त्यामुळे पादचाºयांना नीट चालताही येत नाही. तसेच वाडा रोड भाजीमंडईलगत रस्त्यावर भाजीविक्रेते रस्त्यावरच बसत असल्याने अजूनच वाहतूककोंडी होत आहे. महात्मा गांधी विद्यालयासमोर फळविक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटली आहेत. या रस्त्यावरून विद्यार्थी, नागरिक यांना येथून जाताना विनाकारण त्रास होतो.काही ठिकाणी अनधिकृत टपºया व भाजीविक्रेते, फळ विक्रेत्यांनी रस्ते व पदपथांवर ठाण मांडलेले आहे. त्याकडे नगरपालिका प्रशासनाचे अतिक्रमण अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. किंबहुना त्यांच्याच आशीर्वादाने अतिक्रमणधारकांची मुजोरी कारवाईअभावी दिवसेंदिवस वाढत आहे अशी परिस्थिती आहे.कायदेशीर कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी नगर प्रशासनाचीच आहे. अतिक्रमणे पूर्वीप्रमाणेच होत असतील तर इतर ठिकाणच्या अतिक्रमणांना चाप बसण्याचे दूरच, एकच महिन्यात पुन्हा सर्वत्र अतिक्रमणे वाढू लागल्याने त्याचा विपरीत परिणाम पादचारी, वाहनधारक सर्वांनाच होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत नगर परिषद मुख्य अधिकारी संर्पक साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.माझी आता नव्यानेच नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. याबाबत माहिती घेऊन पुढील दोन दिवसांत बैठक घेऊन योग्य ती कारवाई करणार आहे. शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी व नागरिकांच्या हितासाठी शहरातील पुन्हा होत अतिक्रमणे काढण्यात येतील.-शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष राजगुरुनगर नगर परिषदपुन्हा अतिक्रमण होत असल्यास त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात येईल. त्यासाठी नगरपरिषद मध्ये अतिक्रमण विरोधी पथकांची नेमणुक करण्यात आली आहे. त्यांनी पुन्हा झालेले अतिक्रम हटवावे. तसेच मी उद्या मुख्याधिकारी यांच्याशी बोलून माहिती घेतो.-आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी खेड विभागअतिक्रमणे हटवली परंतु यामुळे होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या अजुनही सुटलेली नाही. फक्त जे हातावर पोट भरत होते,त्या सगळ्यांचे नुकसान झाले. मात्र वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य ती कारवाई करावी. अतिक्रमण धारांचे पुनवर्सन करावे.- दीपक थिगळे (नागरिक )

टॅग्स :Puneपुणे