शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

तब्बल बारा वर्षांनी महात्मा फुले समग्र ग्रंथाचे होणार पुनर्प्रकाशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 18:42 IST

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे साहित्य अनेक वर्षांपासून प्रकाशित झालेले नाही. राज्य शासनाने यापूर्वी महात्मा फुले गौरव ग्रंथ, महात्मा फुले समग्र वाङमय,शेतक-यांचा आसूड अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली होती.

ठळक मुद्देमहात्मा फुले जयंतीदिनी प्रकाशन समारंभ समग्र ग्रंथ नव्याने प्रकाशित करताना त्यामध्ये २०० पानी मजकूर वाढविण्यात आला

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समग्र साहित्य प्रकाशित झालेले नाही. या साहित्य प्रकाशनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. तब्बल बारा वर्षांनंतर महात्मा फुले समग्र ग्रंथ पुनर्प्रकाशित होत असून, दोनशे पानांच्या नवीन मजकुरासह हा ग्रंथ वाचकांच्या भेटीला येत आहे. येत्या ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे साहित्य अनेक वर्षांपासून प्रकाशित झालेले नाही. राज्य शासनाने यापूर्वी महात्मा फुले गौरव ग्रंथ, महात्मा फुले समग्र वाङमय,शेतक-यांचा आसूड अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली होती. मात्र, शासकीय ग्रंथागारात ही पुस्तके कित्येक वर्षांपासून वाचकांना उपलब्ध नाहीत.त्यामुळे फुले दाम्पत्यांच्याजीवनावरील साहित्य लवकरात लवकर प्रकाशित करण्याची मागणी युवा माळी संघटना आणि भिडे वाडा बचाव मोहिमेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे प्रमुख ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांच्याशी ‘लोकमत’प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले, सुरूवातीच्या काळात राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने महात्मा फुले यांच्यावरील पुस्तके प्रकाशित केली होती. १९९१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. त्यानंतर तब्बल सोळा वर्षांनी २००६ मध्ये दुसरी आवृत्ती आली. त्यानंतर राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून महात्मा फुले प्रकाशन समितीने हे काम स्वत:कडे मागून घेतले. ते ग्रंथ तसेच्या तसे प्रकाशित करणे समितीला सहज शक्य होते. परंतु,आम्हाला ते जसेच्या तसे छापायचे नव्हते. त्यामध्ये नव्याने काही गोष्टी आम्हाला समाविष्ट कराव्याशा वाटल्या. महात्मा फुले यांचे लेखन हे मोडी लिपीत असायचे. त्यांचे शेतक-यांचे आसूड याचे मूळ हस्तलिखित मोडीमध्येच होते. ते तसेच छापले कारण त्याकाळी मोडी जाणणारी अनेक लोकं होती पण नंतर मोडी लिपी जाणणारी लोक कमी होत गेली. त्यानंतर महात्मा फुले समग्र ग्रंथासह त्यांची पुस्तके देवनागरी लिपीमध्ये प्रकाशित झाली. आता हा समग्र ग्रंथ नव्याने प्रकाशित करताना त्यामध्ये २०० पानी मजकूर वाढविण्यात आला आहे. महात्मा फुले यांनी गव्हर्नर जनरला जे पत्र लिहिले ती मूळ पत्रे छापण्यात आली आहेत. महात्मा फुले हयात असताना जे ग्रंथ प्रकाशित झाले होते त्या ग्रंथाला कुणाकुणाच्या प्रस्तावना होत्या त्या वगळल्या होत्या. त्या सर्व प्रस्तावनांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. वृत्तपत्रात महात्मा फुले यांनी जे रिपोर्ट लिहिले होते जे आजच्या काळाशीही सुसंगत आहेत त्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. महात्मा फुले यांच्या मुलाने लिहिलेले चरित्र, फुलेंचा सयाजीराव गायकवाडांशी झालेला पत्रव्यवहार या गोष्टींच्या समाविष्टतेतून एक परिपूर्ण ग्रंथ करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यlibraryवाचनालय