शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

सामाजिक कार्याचा जोपासला आदर्श; नक्षलग्रस्त मुलांच्या डोक्यावर मायेचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 00:38 IST

चार वर्षांपासून नक्षलग्रस्तांच्या मुलांकरिता काम करण्यास आदर्श मित्रमंडळाने सुरुवात केली

पुणे :दहशतवादाचा सामना करण्यासाठी त्याला मुळापासून उखडून टाकण्याकरिता नक्षलवाद संपविला गेला पाहिजे. त्याचा कृतिशील आदर्श घेऊन चार वर्षांपासून नक्षलग्रस्तांच्या मुलांकरिता काम करण्यास आदर्श मित्रमंडळाने सुरुवात केली.चार वर्षांपूर्वी पुण्यात नक्षलवादी सापडले. या प्रश्नावर विचारांचे कृतीत परिवर्तन करण्याचे धाडस आदर्श मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष उदय जगताप यांनी दाखविले. गडचिरोली येथे गेल्यानंतर, तेथील लोकांची व्यवस्थेविषयी कमालीची अनास्था दिसून आली. याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांना आरोग्य, शिक्षण, रोजगार याविषयी सरकारकडून कुठल्याच प्रकारचे सहकार्य मिळत नाही. या नाराजीचे रूपांतर पुढे संघर्षात झाल्याने नक्षलवाद तयार होतो आहे. शाळेकरिता रोज तब्बल पाच किलोमीटरची पायपीट करणाऱ्यांकरिता शासनाकडून दखल घेतली जात नाही अशावेळी आदर्श मित्रमंडळाने ते आपले उद्दिष्ट मानून नक्षलपीडित ११० कुटुंबांतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.वर्षभर चालणाºया मंडळाच्या उपक्रमांमध्ये नक्षलग्रस्त मुलांचे पुनर्वसन, शिक्षण आणि त्यांना स्वयंपूर्ण घडविणे असा उद्देश होता. या भागात शांतता व सुव्यवस्था राहावी याकरिता परिसरातील साडेतेरा हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.याकामी गडचिरोलीतील पोलीस प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले. साडेतेरा हजार विद्यार्थ्यांपैकी सहा हजार ७८६ विद्यार्थी निवडण्यात आले. मुलांसोबत शांततेच्या विचारांच्या पुस्तकांचे वाचन करण्यात आले. त्याची नोंद गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली गेली. शांतता व अहिंसेच्या विचारांचा प्रचार व प्रसार हा त्यामागील हेतू होता. याशिवाय त्या भागातील ३३ पोलीस स्थानकांमध्ये ग्रंथालयांची सुरुवात करण्यात आली. ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. हा सगळा सामाजिक उपक्रम पाहून ५६ माओवाद्यांनी गडचिरोतील पोलीस स्थानकात आत्मसमर्पण केले.७२ वर्षे लाइटविना...एकीकडे मोठ्या आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना दुसरीकडे गडचिरोतील अनेक भाग अद्याप अंधारातच आहे. स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होऊनदेखील त्यांच्यापर्यंत लाइट पोहोचली नाही.याकामी दोष कुणाला द्यावा, मंडळाने याकामी त्याभागातील पीडितांना मदत केली. सुरुवातीला पाच शाळांमध्ये लाइटची व्यवस्था करण्यात आली. यानंतर पुढे सहाशे घरांमध्ये लाइटचे कनेक्शन देण्यात आले. नक्षल भागातील मूळ प्रश्नांशी अद्याप संघर्ष सुरूच असल्याची भावना जगताप यांनी व्यक्त केली.मंडळाचे उपक्रमगडचिरोलीतील अतिदुर्गम आदिवासी भागासाठी टू व्हिलर अ‍ॅम्ब्ल्युन्स उपलब्ध करून दिल्या.पुढील पिढी नक्षलवादाकडे जाऊ नये, याकरिता ई- लर्निंग स्कूल व ई- संस्कार वर्ग सुरू केले.गडचिरोली पोलिसांच्या साह्याने तेथील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रदर्शनच्या सहलीचे आयोजन.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPuneपुणे