शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

सामाजिक कार्याचा जोपासला आदर्श; नक्षलग्रस्त मुलांच्या डोक्यावर मायेचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 00:38 IST

चार वर्षांपासून नक्षलग्रस्तांच्या मुलांकरिता काम करण्यास आदर्श मित्रमंडळाने सुरुवात केली

पुणे :दहशतवादाचा सामना करण्यासाठी त्याला मुळापासून उखडून टाकण्याकरिता नक्षलवाद संपविला गेला पाहिजे. त्याचा कृतिशील आदर्श घेऊन चार वर्षांपासून नक्षलग्रस्तांच्या मुलांकरिता काम करण्यास आदर्श मित्रमंडळाने सुरुवात केली.चार वर्षांपूर्वी पुण्यात नक्षलवादी सापडले. या प्रश्नावर विचारांचे कृतीत परिवर्तन करण्याचे धाडस आदर्श मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष उदय जगताप यांनी दाखविले. गडचिरोली येथे गेल्यानंतर, तेथील लोकांची व्यवस्थेविषयी कमालीची अनास्था दिसून आली. याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांना आरोग्य, शिक्षण, रोजगार याविषयी सरकारकडून कुठल्याच प्रकारचे सहकार्य मिळत नाही. या नाराजीचे रूपांतर पुढे संघर्षात झाल्याने नक्षलवाद तयार होतो आहे. शाळेकरिता रोज तब्बल पाच किलोमीटरची पायपीट करणाऱ्यांकरिता शासनाकडून दखल घेतली जात नाही अशावेळी आदर्श मित्रमंडळाने ते आपले उद्दिष्ट मानून नक्षलपीडित ११० कुटुंबांतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.वर्षभर चालणाºया मंडळाच्या उपक्रमांमध्ये नक्षलग्रस्त मुलांचे पुनर्वसन, शिक्षण आणि त्यांना स्वयंपूर्ण घडविणे असा उद्देश होता. या भागात शांतता व सुव्यवस्था राहावी याकरिता परिसरातील साडेतेरा हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.याकामी गडचिरोलीतील पोलीस प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले. साडेतेरा हजार विद्यार्थ्यांपैकी सहा हजार ७८६ विद्यार्थी निवडण्यात आले. मुलांसोबत शांततेच्या विचारांच्या पुस्तकांचे वाचन करण्यात आले. त्याची नोंद गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेतली गेली. शांतता व अहिंसेच्या विचारांचा प्रचार व प्रसार हा त्यामागील हेतू होता. याशिवाय त्या भागातील ३३ पोलीस स्थानकांमध्ये ग्रंथालयांची सुरुवात करण्यात आली. ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. हा सगळा सामाजिक उपक्रम पाहून ५६ माओवाद्यांनी गडचिरोतील पोलीस स्थानकात आत्मसमर्पण केले.७२ वर्षे लाइटविना...एकीकडे मोठ्या आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना दुसरीकडे गडचिरोतील अनेक भाग अद्याप अंधारातच आहे. स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होऊनदेखील त्यांच्यापर्यंत लाइट पोहोचली नाही.याकामी दोष कुणाला द्यावा, मंडळाने याकामी त्याभागातील पीडितांना मदत केली. सुरुवातीला पाच शाळांमध्ये लाइटची व्यवस्था करण्यात आली. यानंतर पुढे सहाशे घरांमध्ये लाइटचे कनेक्शन देण्यात आले. नक्षल भागातील मूळ प्रश्नांशी अद्याप संघर्ष सुरूच असल्याची भावना जगताप यांनी व्यक्त केली.मंडळाचे उपक्रमगडचिरोलीतील अतिदुर्गम आदिवासी भागासाठी टू व्हिलर अ‍ॅम्ब्ल्युन्स उपलब्ध करून दिल्या.पुढील पिढी नक्षलवादाकडे जाऊ नये, याकरिता ई- लर्निंग स्कूल व ई- संस्कार वर्ग सुरू केले.गडचिरोली पोलिसांच्या साह्याने तेथील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रदर्शनच्या सहलीचे आयोजन.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPuneपुणे