शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुरेशा पावसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST

८० ते १०० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडल्यावरच पेरण्या करा कृषी विभागाचा सल्ला (रविकिरण सासवडे) बारामती : पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यातील खरिपाच्या ...

८० ते १०० मिलिमीटरपर्यंत

पाऊस पडल्यावरच पेरण्या करा

कृषी विभागाचा सल्ला

(रविकिरण सासवडे)

बारामती : पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने देखील जोपर्यंत सर्वदूर सलग दोन ते तीन दिवस ८० ते १०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरण्या करू नयेत असे आवाहन केले आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे कमी-अधिक प्रमाण राहिले आहे. मात्र, सर्वदूर पाऊस नसल्याने खरीप पेरण्या रखडल्या आहेत. पुणे जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८२९.१० मिलीमीटर आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये केवळ ८०.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. परंतु गेल्या काही दिवसांत बहुतांश भागात पावसाने उघडीप दिल्यामुळे बहुतांश ठिकाणी मशागत करून शेत तयार ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात तांदळाची लागवड होत असते. शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड, आंबेगाव, जुन्नर या पूर्वेकडील भागात प्रामुख्याने बाजरी, मका व इतर कडधान्यांचे पीक घेतले जाते. यंदा सोयाबिनला चांगला दर असल्याने जिल्ह्यात भोर, जुन्नर, खेड, बारामती आणि आंबेगाव तालुक्यात सोयाबिन पेरण्या वाढतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

रानाला वाफसा नसल्याने तसेच पुरेशी ओल नसल्याने आता पेरण्या केल्या तर बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहू शकते. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे कृषी विभागाने देखील सध्य परिस्थितीमध्ये पेरण्या न करता जोपर्यंत समाधानकारक पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरण्या करू नका असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

--------------------------

शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. सध्या तुरळक पाऊस पडत आहे. सोयाबिन, तूर ,भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरिता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. खरीप हंगामातील सोयाबिन, बाजरी, तूर, उडीद, मूग, मका ईत्यादी पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरून वाढते.

- बालाजी ताटे

उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती

-----------------------------

जिल्ह्यातील आतापर्यंतची पावसाची

आकडेवारी (मिलीमीटरमध्ये)

हवेली - ८४.४

मुळशी - ८५.४

भोर - ७९.९

वेल्हा - ८४.२

जुन्नर - ४९.४

खेड - ९२.९

आंबेगाव - ८४.५

शिरूर - ७६.८

बारामती - ७५.५

इंदापूर - ६२.१

दौंड - ९५.३

पुरंदर - ६३.९

---------------------------------

फोटो ओळी : उंडवडी-कडेपठार येथे पेरणीपूर्व बैलजोडीच्या सहाय्याने सुरू असलेली मशागत

१४०६२०२१-बारामती-०६

-------------------------------