शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पाच रणरागिणींना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, जिल्ह्यातील एकूण १४ जणांचा होणार विशेष सत्कार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 03:38 IST

आपल्या कार्यक्षेत्रात येणा-या गावांमध्ये विशेष उपक्रम राबवून गावांचा विकास करणाºया जिल्ह्यातील पाच रणरागिणींबरोबर एकूण १४ जणांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली. ही निवड मागील दोन वर्षांतील कामांचा आढावा घेऊन करण्यात आली आहे.

पुणे : आपल्या कार्यक्षेत्रात येणा-या गावांमध्ये विशेष उपक्रम राबवून गावांचा विकास करणाºया जिल्ह्यातील पाच रणरागिणींबरोबर एकूण १४ जणांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली. ही निवड मागील दोन वर्षांतील कामांचा आढावा घेऊन करण्यात आली आहे.हवेली, बारामती, इंदापूर, मुळशी आणि मावळ या पाच तालुक्यातील प्रत्येकी एका महिला ग्रामसेवकाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे, तर इतर तालुक्यातील पुरुष ग्रामसेवकांचा समावेश आहे.जिल्ह्यात स्वच्छता मोहीम, ग्रामपातळीवर वसुली आणि जमाखर्च या घटकांकडे विशेष प्राधान्य देऊन निश्चित कार्यक्रम राबवून आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये विशेष काम करणाºया तसेच तालुक्यातील इतर गावांमध्ये सक्षम ग्रामसचिवालय बनविणाºया जिल्ह्यातील १४ ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षांत मासिक सभा, पंचायत समिती सभा उपस्थिती, लेखापरीक्षण, बायोगॅस कामास प्राधान्य देणाºया ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.या पुरस्कारामध्ये आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी गावचे ग्रामसेवक रवींद्र रामचंद्र उगले यांची निवड आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.गावातील बंदिस्त गटारे, समाजकल्याण विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या कामांची अंमलबजावणी करणाºया ग्रामसेवकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.- संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदजिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १४ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये सन २१०४-१५ मधील एक आदर्श ग्रामसेवकाचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या कामांना उत्तेजन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मागील काही वर्षांपासून प्रोत्साहन देण्यासाठी हा विशेष सन्मान करण्यात येत आहे. आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी प्रशासनाच्या वतीने ग्रामपातळीवर विविध योजना आणि निकष लावून काम करणाºया ग्रामसेवकांचे मूल्यांकन तपासण्यासाठी १०० गुणांच्या तक्त्याच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणे