शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

हॉलतिकीटसाठी अडवणाऱ्या शाळांवर कारवाई होणार; मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावींचा इशारा

By प्रशांत बिडवे | Updated: February 20, 2024 17:07 IST

गाेसावी म्हणाले, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांवर आपण कारवाई करीत असताे...

पुणे : शैक्षणिक शुल्क अथवा इतर काेणत्याही कारणामुळे दहावी तसेच बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे हाॅलतिकीट न देणे गंभीर बाब आहे. याप्रकारे शाळांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. विद्यार्थी, पालकांची तक्रार आल्यास संबंधित शाळांवर परीक्षा झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिला. तसेच आतापर्यंत आशा स्वरूपाच्या दाेन तक्रारी प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

गाेसावी म्हणाले, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांवर आपण कारवाई करीत असताे. संबंधित प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि संचालक यांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना हाॅलतिकीट न देणे अत्यंत गंभीर आहे. राज्य मंडळ काेणत्याही कारणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता गांभीर्याने घेत असते. आतापर्यंत आमच्याकडे दाेन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरवर्षी सरासरी दाेन ते तीन तक्रारी येत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून हे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.

गतवर्षी ११ गुन्ह्यांची नाेंद

परीक्षेदरम्यान गतवर्षी जे गैरप्रकार झाले, त्याबाबत ११ गुन्हे दाखल झाले असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिघात १४४ कलम लागू असते. केंद्राजवळ झेराॅक्स सेंटरही बंद केली जातात. परीक्षेदरम्यान मूळ विद्यार्थी तसेच डमी बसलेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला जातो तसेच मूळ विद्यार्थ्यांस पुढील पाच परीक्षेला बसू दिले जात नाही.

परीक्षेचा निकाल लवकर लावणार

गतवर्षी सुरुवातीचे काही दिवस शिक्षकांचा संप सुरू हाेता, तरीही आम्ही बारावीचा निकाल वेळेवर जाहीर केला हाेता. यंदाही मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बारावीचा निकाल लावण्यावर आमचा भर आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा