शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आठवडाभरात ४५०० ब्रास माती सील, खेड तालुक्यातील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:49 IST

खेड तालुक्यात वाळद येथे ११९४ ब्रास अनधिकृत मातीसाठा पंचनामा करून सील करण्यात आला आहे. महसूल विभागाकडून खेड तालुक्यात आतापर्यंत ४५०० ब्रास माती, २६ ब्रास वाळू सील केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : खेड तालुक्यात वाळद येथे ११९४ ब्रास अनधिकृत मातीसाठा पंचनामा करून सील करण्यात आला आहे. महसूल विभागाकडून खेड तालुक्यात आतापर्यंत ४५०० ब्रास माती, २६ ब्रास वाळू सील केली आहे. तालुक्यातील ही सर्वांत मोठी कारवाई झाली आहे. त्यामुळे अनधिकृत मातीसाठा व वाळूमाफियांचे धाबे चांगले दणाणले आहे.निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर व यांचे पथक गेल्या आठ दिवसांपासून कडक कारवाई करत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात मोरोशी, टोकावडे, मंदोशी, कारकुडी व वाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत वीटभट्ट्या आहेत. अनेक जणांनी शासनाची रितसर रॉयल्टी न भरता लाल मातीचा साठा करून ठेवला होता. बेकायदा मातीउपसा कोट्यवधी रुपयांची अनधिकृत केलेल्या २७६३ ब्रास मातीसाठ्याचा पंचनामा करून सील करण्यात आला होता. तसेच शिक्रापूर रोडवर वाहतूक करणाºया सहा गाड्यांवर पथकाने दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध गौण खनिज अधिनियमानुसार कारवाई करून सहा वाळूच्या गाड्यांवर कारवाईत ५ लाख ३१ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला होता.दोनच दिवसांपूर्वी सावरदरी येथे अनधिकृत मुरूम वापरून तयार केलेल्या रस्त्याचा १५० ब्रासमुरूम वापरल्याप्रकरणी महसूल विभागाने दंडात्मक कारवाई करून ५ लाख ८५ हजार रुपायांचा दंड ठोठावला आहे. तालुक्यामध्ये शेकडो वीटभट्ट्या विनापरवाना सर्रास सुरू आहेत. या वीटभट्ट्या विनापरवाना माती उत्खनन करीत असून सरकारचा कोट्यवधींचा महसूल यामुळे बुडत आहे. या शिवाय या वीटभट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असतानास संबंधीत व्यक्तींपैकी कोणीही प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेण्याची साधी तसदीही घेतलेली नाही.संतप्त ग्रामस्थांचा आरोपकाही ठिकाणी तर मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन केले आहे. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडालेला व बुडत आहे. याशिवाय माती तयार झाल्यावर व विटा तयार झाल्यावर त्याचा वाहतूक परवाना घेणे आवश्यक आहे. 'कारण, वीट वाहतूक करणारे ट्रक हे अवजड असतात यांच्यामुळे रस्त्याचे नुकसान होते. तसेच अपघातहीहोतात. यामुळे याची वाहतूक परवानगी घेणे बंधनकारक आहे; मात्र, तशी परवानगी घेतली जात नाही.या सर्व वीटभट्ट्या असो किंवा नदीपात्रातील बेकायदा वाळूउपसा असो, याची इत्थंभूत माहिती कामगार तलाठ्यांना असते. मात्र, ते कधीच कारवाई करीत नाहीत किंवा वरिष्ठांनाही माहिती देण्याची गरज या तलाठ्यांना वाटत नाही, असा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :Puneपुणे