शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आठवडाभरात ४५०० ब्रास माती सील, खेड तालुक्यातील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:49 IST

खेड तालुक्यात वाळद येथे ११९४ ब्रास अनधिकृत मातीसाठा पंचनामा करून सील करण्यात आला आहे. महसूल विभागाकडून खेड तालुक्यात आतापर्यंत ४५०० ब्रास माती, २६ ब्रास वाळू सील केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : खेड तालुक्यात वाळद येथे ११९४ ब्रास अनधिकृत मातीसाठा पंचनामा करून सील करण्यात आला आहे. महसूल विभागाकडून खेड तालुक्यात आतापर्यंत ४५०० ब्रास माती, २६ ब्रास वाळू सील केली आहे. तालुक्यातील ही सर्वांत मोठी कारवाई झाली आहे. त्यामुळे अनधिकृत मातीसाठा व वाळूमाफियांचे धाबे चांगले दणाणले आहे.निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर व यांचे पथक गेल्या आठ दिवसांपासून कडक कारवाई करत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात मोरोशी, टोकावडे, मंदोशी, कारकुडी व वाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत वीटभट्ट्या आहेत. अनेक जणांनी शासनाची रितसर रॉयल्टी न भरता लाल मातीचा साठा करून ठेवला होता. बेकायदा मातीउपसा कोट्यवधी रुपयांची अनधिकृत केलेल्या २७६३ ब्रास मातीसाठ्याचा पंचनामा करून सील करण्यात आला होता. तसेच शिक्रापूर रोडवर वाहतूक करणाºया सहा गाड्यांवर पथकाने दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध गौण खनिज अधिनियमानुसार कारवाई करून सहा वाळूच्या गाड्यांवर कारवाईत ५ लाख ३१ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला होता.दोनच दिवसांपूर्वी सावरदरी येथे अनधिकृत मुरूम वापरून तयार केलेल्या रस्त्याचा १५० ब्रासमुरूम वापरल्याप्रकरणी महसूल विभागाने दंडात्मक कारवाई करून ५ लाख ८५ हजार रुपायांचा दंड ठोठावला आहे. तालुक्यामध्ये शेकडो वीटभट्ट्या विनापरवाना सर्रास सुरू आहेत. या वीटभट्ट्या विनापरवाना माती उत्खनन करीत असून सरकारचा कोट्यवधींचा महसूल यामुळे बुडत आहे. या शिवाय या वीटभट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असतानास संबंधीत व्यक्तींपैकी कोणीही प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेण्याची साधी तसदीही घेतलेली नाही.संतप्त ग्रामस्थांचा आरोपकाही ठिकाणी तर मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन केले आहे. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडालेला व बुडत आहे. याशिवाय माती तयार झाल्यावर व विटा तयार झाल्यावर त्याचा वाहतूक परवाना घेणे आवश्यक आहे. 'कारण, वीट वाहतूक करणारे ट्रक हे अवजड असतात यांच्यामुळे रस्त्याचे नुकसान होते. तसेच अपघातहीहोतात. यामुळे याची वाहतूक परवानगी घेणे बंधनकारक आहे; मात्र, तशी परवानगी घेतली जात नाही.या सर्व वीटभट्ट्या असो किंवा नदीपात्रातील बेकायदा वाळूउपसा असो, याची इत्थंभूत माहिती कामगार तलाठ्यांना असते. मात्र, ते कधीच कारवाई करीत नाहीत किंवा वरिष्ठांनाही माहिती देण्याची गरज या तलाठ्यांना वाटत नाही, असा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :Puneपुणे