शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

रोडरोमियोंवर ‘निर्भया’द्वारे कारवाई

By admin | Updated: April 1, 2017 02:03 IST

महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यातील पाच जिल्ह्यांत निर्भया पथकाची स्थापना सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली आहे.

कामशेत : महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यातील पाच जिल्ह्यांत निर्भया पथकाची स्थापना सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून अनेक रोडरोमियोंवर कारवाई करण्यात आली असून, त्यांचे समुपदेशनही करण्यात आले आहे. या पथकात महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी येथे झालेल्या परिसंवादात सांगितले.येथील एका रिसोर्टमध्ये शुक्रवारी दुपारी नागरिक व पोलीस यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष पोलीस महासंचालक नांगरे पाटील, डीवायएसपी शिवतारे, एसीपी राजकुमार शिंदे, कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.कामशेत पोलीस ठाण्याच्या तपासणीसाठी आलेल्या नांगरे पाटील यांनी या परिसंवादाच्या माध्यमातून नागरिक व महिला व विद्यार्थिनींचे प्रश्न जाणून घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित नेहरू विद्यालयाच्या विद्यार्धीनिनी स्वागत गीत सादर केले. नंतर नांगरे पाटील यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत महिला व मुलींना कोणी त्रास देत आहे का या प्रश्नाने सुरुवात केली. अनेक विद्यालयीन विद्यार्धीनिनी प्रश्न विचारले. आपल्या अडचणी मांडल्या. त्यावर मुलीनी सोशल मिडीयाचा वापर अतिशय सावधानतेने करावयाला हवा, अशा सल्ला यावेळी नांगरे पाटील यांनी विद्याथीर्नीना दिला.कामशेत शहरातील वाहतूक कोंडीचा ऐरणीचा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत व पोलीस यांची मिटिंग बोलून शहरातील वाढलेली अतिक्रमणे एक महिन्याच्या आत काढण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. जुना मुंबई -पुणे महामार्गावर व द्रुतगती मार्गावर ठराविक ठिकाणी होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी च्या उपाय योजना यावर नागरिकांनी प्रश्न मांडले.या कार्यक्रमाला कामशेतच्या सरपंच सारिका रमेश शिंदे, सदस्या सारिका घोलप, रुपाली शिनगारे, पोलीस पाटील सविता वरघडे, पुणे जिल्हा महिला दक्षता समिती सदस्या कल्पना कांबळे, लायन क्लब महेश शेट्टी, सुनील भटेवरा, पंडित नेहरू विद्यालयाचे प्राचार्य एस. डी. घुले, खांडशी सरपंच बाळासाहेब शिरसट, ताजे सरपंच रामदास केदारी, व्हीआयटीचे निलेश गारगोटे, कैलास गायकवाड, तुकाराम शेंडगे, चंद्रकांत राउत, महादू लगड, विठ्ठल शेंडगे, डॉ. विकेश मुथा, गणेश भोकरे, माजी सरपंच विजय शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी केले. (वार्ताहर)पोलिसांकडून त्रास : सोने, चांदी व्यापाऱ्याची तक्रारसोने चांदीच्या व्यापाऱ्यांना पोलिसांचा त्रास होत असल्याची एका व्यापाऱ्याने तक्रार केली. चोरीचा माल तुम्ही विकत घेतला का? असा प्रश्न विचारून पोलिसांच्या गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेले जाते. यामुळे आमच्या व्यवसायावर निष्कारण परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तरुणांनीही प्रश्न विचारले. शहरातील शाळांच्या परिसरात शाळा सुटणे व भरण्याच्या वेळी अनेक दुचाकीस्वार शाळेच्या घिरट्या मारतात. एका वजनदार दुचाकीच्या गाडीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारखे आवाज काढले जातात, अशा तक्रारी केल्या. त्यांच्यावर लवकरच कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक पाटील यांना देण्यात आले.