शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर वळणांमुळे अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:47 IST

रस्त्याच्या मागणी : दुचाकी, चारचाकी व अवजड कंटेनरचे अपघात झाले नित्याचे

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर असलेल्या दोन्ही धोकादायक वळणांमुळे दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि.१२) पहाटे तीनच्या सुमारास वळणावर शिक्रापूरहून - चाकणकडे जाणारा अवजड कंटेनर वाहतुकीदरम्यान पलटी झाला. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. वारंवार होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाय योजना करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

चाकण-शिक्रापूर राज्यमार्ग पुणे जिल्ह्यातील तीन ते चार महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींना जोडणारा रस्ता आहे. परिणामी, या मार्गावर कायम वर्दळ असते. परराज्यातून औद्योगिक वसाहतींना कच्चा माल पुरविणारे असंख्य अवजड कंटेनर याच मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील अपघातातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यमार्गावर खेड तालुक्याच्या हद्दीत साबळेवाडीच्या तसेच शेलपिंपळगावच्या पश्चिमेला ‘एस’ आकाराची धोकादायक वळणे आहेत. ही दोन्ही वळणे धोकादायक आहेत. या वळणावर रोज अपघात होत आहेत.

भीमा - भामा नदीलगत असलेल्या शेलपिंपळगावच्या वळणावर गॅसचे टँकर, ट्रक, मालवाहू गाड्या, दुधाचे ट्रक वळण घेत असताना सातत्याने पलटी होत आहेत. शेलपिंपळगावच्या वळणालगत भीमा-भामा नदीचा प्रवाह असल्याने सकाळपासून अनेक वाहतूकदार अंघोळीसाठी वाहने रस्त्यालगत उभी करून वाहतुकीत अडचण निर्माण करतात. यामुळे इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातसदृश परिस्थीती निर्माण होते. तर, साबळेवाडीचे वळण चाकणकडून शिक्रापूरकडे जाताना चढ वाहतुकीचे आहे. त्यामुळे मुंबई, नाशिककडून औद्योगिक वसाहतींचा कच्चा माल घेऊन येणारी अवजड वाहने येथील वळणावर वाहतुकीदरम्यान अडकली जातात. मात्र, शिक्रापूरकडून चाकणबाजूकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना रस्त्याचा उतार धोकादायक ठरत असल्याने बहुतांशी वाहने जागीच पलटी होत आहेत. रस्त्यावरील दोन्ही ठिकाणच्या वळणांवर वाढते अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाय योजना कार्यान्वित करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहतूकदारांकडून केली जात आहे.साबळेवाडी येथील वळणावर सातत्याने अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. विशेष म्हणजे, वळणाला कठडे उपलब्ध नसणे ही खेदाची बाब आहे. सूचना फलक व कठडे तातडीने बसविणे गरजेचे आहे.- सुनील बेंडभर, स्थानिक नागरिक.शेलपिंपळगाव वळणालगत असलेली झाडे वाढली आहेत. त्यामुळे शिक्रापूरकडून चाकणकडे जाणाºया वाहनांना समोरच्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघात घडून येत आहेत. वळणाच्या दुतर्फा उभ्या केलेल्या वाहनांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली तर त्याठिकाणचे अवैध पार्किंग बंद होईल. - विद्या मोहिते, सरपंच शेलपिंपळगाव.४महामार्गावरील दोन्ही धोकादायक वळणांवर सातत्याने मोठ-मोठे अपघात होत आहेत. परिणामी जीवितहानीचा आकडा वाढत चालला आहे. शेलपिंपळगावच्या वळणावर गेल्या वर्षभरात दहा ते बारा, तर साबळेवाडीच्या वळणावर पंधरा ते वीस वाहने वाहतुकीदरम्यान पलटीझाली आहेत.४वळणावर दुचाकींच्या अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. वळणावरील सूचना फलक जमीनदोस्त झाले असून जे सूचना फलक उभे आहेत ते अनेक व्यावसायिकांच्या स्वत:च्या जाहिरातीला बळी पडत आहेत. तर, साबळेवाडीच्या वळणाचे संपूर्ण कठडे तुटलेले आहे. परिणामी अपघातग्रस्त वाहने थेट खोल दरीत कोसळलीजात आहेत. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड