शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या जीवरक्षकांमुळे अपघाताचा धोका

By admin | Updated: April 18, 2017 02:36 IST

आकुर्डी रेल्वे स्टेशनलगत प्राधिकरणामध्ये असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज जलतरण तलावामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहण्यासाठी गर्दी होत आहे

रावेत : आकुर्डी रेल्वे स्टेशनलगत प्राधिकरणामध्ये असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज जलतरण तलावामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहण्यासाठी गर्दी होत आहे. परिसरात एकच तलाव असल्यामुळे येथे पोचण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. तलावाच्या नियमाप्रमाणे हद्दीतील नागरिकांनाच पोहण्यासाठी परवानगी आहे; परंतु पालिका हद्दीबाहेरील नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे पालिका हद्दीतील नागरिकांना पोहण्यास अडचणी निर्माण होत आहेत.पहाटे ६ ते ९.४५ व दुपारी २.३० ते सायंकाळी ६.१५ पर्यंत खुला असतो. या वेळेत दररोज किमान ६०० ते ७०० जण या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत असतात. सध्या येथे ना क्रीडा शिक्षक ना पुरेसे प्रशिक्षक अशी स्थिती पहावयास मिळत आहे. नियमाप्रमाणे पोहणाऱ्यांची आणि प्रशिक्षकांची १:२५ या प्रमाणात विभागणी करण्यात येत असते. म्हणजेच एका वेळेस केवळ 50 व्यक्तींना प्रवेश देणे अपेक्षित असताना येथे मात्र एकावेळी १०० व्यक्तींना त्यांचा जीव धोक्यात घालून प्रवेश दिला जातो. नकळत जर एखादी दुर्घटना घडली, तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. तलावाची क्षमता पाहता व दिवसेंदिवस पोहणाऱ्यांची वाढणारी संख्या लक्षात घेता आणखी जीवरक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. मोठ्या तलावालगत १२ वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेला बेबी तलाव गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्यामुळे लहान मुलांना इतरांसोबत पोहण्याची अडचण निर्माण होत आहे. याबाबत व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की बेबी तलाव लिकेज असल्यामुळे बंद आहे. याबाबत पालिका प्रशासनास कळविण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम व बाथरूमचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीशेजारी असणारे चेंबर उघड्या अवस्थेत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. जीवरक्षकांच्या विश्रांतीसाठी असणारी खोली आणि तलावासाठी पाणीपुरवठा व फिल्टरेशन याकरिता एकच खोली आहे. त्या खोलीची भिंत पाडून पाइप सोडण्यात आले आहेत. तलावात उतरण्यासाठी असणाऱ्या शिड्या निखळण्याच्या स्थितीत आहे.शहरातील इतर तलावाच्या मानाने तिकिटाचे दर कमी असल्यामुळे देहू, देहूरोड, चिंचवड, प्राधिकरण, आकुर्डी, वाल्हेकरवाडी,रावेत आदी परिसरातून पोहण्यासाठी नागरिक येत असतात. प्रत्येक व्यक्तीस ३० मिनिटांकरिता १० रु आकारणी केली जाते. जी इतर तलावाच्या मानाने खूपच कमी आहे. तलावामध्ये बसविण्यात आलेल्या फरशा तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे पोहताना पायास जखम होते. तसेच ओव्हर फ्लो होणाऱ्या पाण्याच्या गटाराच्या बाजूने अनेक ठिकाणी कठडे तुटल्यामुळे पोहणाऱ्याच्या हाताला इजा होतात. जीवरक्षकासाठी असणाऱ्या खोलीमध्ये इतर साहित्याची ठेवण केल्यामुळे जीवरक्षकांना उघड्यावरच विश्रांती घ्यावी लागते. सकाळी ९ ते ९.४५ व दुपारी २.३० ते ३.१५ ही वेळ केवळ महिलांसाठी राखीव आहे. या वेळेत अनेक महिला पोहण्यासाठी येतात; परंतु महिलांसाठी महिला जीवरक्षकाची नियुक्ती नसल्यामुळे पुरुष जीवरक्षक महिलांच्या वेळेत उपस्थित असतात. त्यामुळे महिलांना पोहताना संकोचित होते, असे महिलांचे म्हणणे आहे.महिलांसाठी स्वतंत्र महिला जीवरक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी येथे येणाऱ्या महिलांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे करूनसुद्धा प्रशासन महिलांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)दररोज विविध राजकीय पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना मोफत सोडण्याकरिता येथील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जातो. त्यामुळे सुद्धा मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये घट होत आहे. जे नागरिक तिकिटासाठी तासन्तास उन्हामध्ये उभे राहून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना मात्र अशा फुकट्यांमुळे तिकीट मिळत नाही. पालिकेने सुरक्षारक्षक नेमावेत गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक हे ठेकेदारांचे असल्यामुळे तिकीट विक्रीच्या वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी अर्थकारण करीत गुपचूप नागरिकांना आत सोडले जाते. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत आहे. नागरिकांना उन्हात थांबावे लागते : तिकीट विक्री सुरू होण्यापूर्वी नागरिक भर उन्हात अनेकवेळा ताटकळत उभे असतात. त्यांच्यासाठी तिकीट विक्रीसमोर सावली करून देणे गरजेचे आहे.