शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अपुऱ्या जीवरक्षकांमुळे अपघाताचा धोका

By admin | Updated: April 18, 2017 02:36 IST

आकुर्डी रेल्वे स्टेशनलगत प्राधिकरणामध्ये असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज जलतरण तलावामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहण्यासाठी गर्दी होत आहे

रावेत : आकुर्डी रेल्वे स्टेशनलगत प्राधिकरणामध्ये असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजीमहाराज जलतरण तलावामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहण्यासाठी गर्दी होत आहे. परिसरात एकच तलाव असल्यामुळे येथे पोचण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. तलावाच्या नियमाप्रमाणे हद्दीतील नागरिकांनाच पोहण्यासाठी परवानगी आहे; परंतु पालिका हद्दीबाहेरील नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे पालिका हद्दीतील नागरिकांना पोहण्यास अडचणी निर्माण होत आहेत.पहाटे ६ ते ९.४५ व दुपारी २.३० ते सायंकाळी ६.१५ पर्यंत खुला असतो. या वेळेत दररोज किमान ६०० ते ७०० जण या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत असतात. सध्या येथे ना क्रीडा शिक्षक ना पुरेसे प्रशिक्षक अशी स्थिती पहावयास मिळत आहे. नियमाप्रमाणे पोहणाऱ्यांची आणि प्रशिक्षकांची १:२५ या प्रमाणात विभागणी करण्यात येत असते. म्हणजेच एका वेळेस केवळ 50 व्यक्तींना प्रवेश देणे अपेक्षित असताना येथे मात्र एकावेळी १०० व्यक्तींना त्यांचा जीव धोक्यात घालून प्रवेश दिला जातो. नकळत जर एखादी दुर्घटना घडली, तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. तलावाची क्षमता पाहता व दिवसेंदिवस पोहणाऱ्यांची वाढणारी संख्या लक्षात घेता आणखी जीवरक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. मोठ्या तलावालगत १२ वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेला बेबी तलाव गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्यामुळे लहान मुलांना इतरांसोबत पोहण्याची अडचण निर्माण होत आहे. याबाबत व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की बेबी तलाव लिकेज असल्यामुळे बंद आहे. याबाबत पालिका प्रशासनास कळविण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम व बाथरूमचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीशेजारी असणारे चेंबर उघड्या अवस्थेत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. जीवरक्षकांच्या विश्रांतीसाठी असणारी खोली आणि तलावासाठी पाणीपुरवठा व फिल्टरेशन याकरिता एकच खोली आहे. त्या खोलीची भिंत पाडून पाइप सोडण्यात आले आहेत. तलावात उतरण्यासाठी असणाऱ्या शिड्या निखळण्याच्या स्थितीत आहे.शहरातील इतर तलावाच्या मानाने तिकिटाचे दर कमी असल्यामुळे देहू, देहूरोड, चिंचवड, प्राधिकरण, आकुर्डी, वाल्हेकरवाडी,रावेत आदी परिसरातून पोहण्यासाठी नागरिक येत असतात. प्रत्येक व्यक्तीस ३० मिनिटांकरिता १० रु आकारणी केली जाते. जी इतर तलावाच्या मानाने खूपच कमी आहे. तलावामध्ये बसविण्यात आलेल्या फरशा तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे पोहताना पायास जखम होते. तसेच ओव्हर फ्लो होणाऱ्या पाण्याच्या गटाराच्या बाजूने अनेक ठिकाणी कठडे तुटल्यामुळे पोहणाऱ्याच्या हाताला इजा होतात. जीवरक्षकासाठी असणाऱ्या खोलीमध्ये इतर साहित्याची ठेवण केल्यामुळे जीवरक्षकांना उघड्यावरच विश्रांती घ्यावी लागते. सकाळी ९ ते ९.४५ व दुपारी २.३० ते ३.१५ ही वेळ केवळ महिलांसाठी राखीव आहे. या वेळेत अनेक महिला पोहण्यासाठी येतात; परंतु महिलांसाठी महिला जीवरक्षकाची नियुक्ती नसल्यामुळे पुरुष जीवरक्षक महिलांच्या वेळेत उपस्थित असतात. त्यामुळे महिलांना पोहताना संकोचित होते, असे महिलांचे म्हणणे आहे.महिलांसाठी स्वतंत्र महिला जीवरक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी येथे येणाऱ्या महिलांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे करूनसुद्धा प्रशासन महिलांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)दररोज विविध राजकीय पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना मोफत सोडण्याकरिता येथील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जातो. त्यामुळे सुद्धा मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये घट होत आहे. जे नागरिक तिकिटासाठी तासन्तास उन्हामध्ये उभे राहून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना मात्र अशा फुकट्यांमुळे तिकीट मिळत नाही. पालिकेने सुरक्षारक्षक नेमावेत गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक हे ठेकेदारांचे असल्यामुळे तिकीट विक्रीच्या वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी अर्थकारण करीत गुपचूप नागरिकांना आत सोडले जाते. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत आहे. नागरिकांना उन्हात थांबावे लागते : तिकीट विक्री सुरू होण्यापूर्वी नागरिक भर उन्हात अनेकवेळा ताटकळत उभे असतात. त्यांच्यासाठी तिकीट विक्रीसमोर सावली करून देणे गरजेचे आहे.