शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

डिजिटल संकल्पनेचा अंगिकार करावा : डॉ. रघुनाथ माशेलकर; ‘डिजिटल चतुर’ पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 16:14 IST

गतिमान जगात टिकून रहायचे असेल तर डिजिटल इंडिया संकल्पनेचा सर्वांनी अंगीकार करावा, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. ‘डिजिटल चतुर’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन माशेलकर ह्यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देस्मार्ट फोन हा आपला सखा, मार्गदर्शक व सवंगडी : रघुनाथ माशेलकरडॉ. दीपक शिकारपूर यांनी लिहिलेल्या ‘डिजिटल चतुर’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : बहुविध क्षेत्रातील आॅनलाईन सेवांमुळे जीवन सुकर व सुसह्य झाले आहे. संगणक युगातील स्थित्यंतराचा वेग प्रचंड आहे. अवघे विश्व व्यापून टाकण्याची क्षमता तंत्रज्ञानात आहे. या गतिमान जगात टिकून रहायचे असेल तर डिजिटल इंडिया संकल्पनेचा सर्वांनी अंगीकार करावा, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी लिहिलेल्या ‘डिजिटल चतुर’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन माशेलकर ह्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे प्रमुख विशाल सोनी उपस्थित होते. पुस्तकाला माशेलकर यांची प्रस्तावना लाभली आहे.माशेलकर म्हणाले, ‘स्मार्ट फोन हा आपला सखा, मार्गदर्शक व सवंगडी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संगणक प्रणालीमुळे या क्षेत्रात क्रांतीच होणार आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. रोगाचे अचूक निदान कमी खर्चात व जलदगतीने त्यामुळे होईल. त्यामुळे रोगावरील उपचारांची परिणामकारकता वाढेल. दिव्यांग व्यक्तीही संगणकाच्या सहजसुलभ वापरामुळे परावलंबी जीवनापासून बहुतांशी मुक्त होतील व चांगले जीवन जगू शकतील.’‘गेल्या दशकात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील सर्व आर्थिक-सामाजिक-राजकीय चित्रे, धोरणे आणि समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स व उपग्रहीय संवादमाध्यमांचा मोठा वाटा आहे. डिजिटल चतुर ही एक अशी व्यक्तिरेखा आहे की जिला स्मार्ट फोन, संगणक, इंटरनेट यांचा वापर करणे जमले आहे. आजच्या काळात आपणही डिजिटल चतुर होण्याची गरज आहे’, असे मत डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :digitalडिजिटलPuneपुणे