शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
6
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
7
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
8
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
9
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
10
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
11
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
12
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
13
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
14
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
15
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
16
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
18
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
19
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
20
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच

पालिकेच्या सदनिकांचा गैरवापर

By admin | Updated: April 20, 2016 01:04 IST

महापालिकेकडून पुनर्वसन म्हणून मिळणाऱ्या सदनिकांचा लाभार्थींकडून फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू आहे. सलग १० वर्षे तब्बल ३ कोटी रुपयांचे भाडे थकविण्यात आले आहे

पुणे : महापालिकेकडून पुनर्वसन म्हणून मिळणाऱ्या सदनिकांचा लाभार्थींकडून फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू आहे. सलग १० वर्षे तब्बल ३ कोटी रुपयांचे भाडे थकविण्यात आले आहे. काही ठिकाणी या सदनिकांचा ताबा गुंडांनी घेतला असून, तिथे सुरू असलेल्या जुगार, दारू आदी बेकायदेशीर धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बाधित कुटुंबांना सदनिका देण्यासाठी नियम आहेत. त्या दरमहा भाडेतत्त्वावर दिल्या जातात. त्याची मालकी महापालिकेकडेच राहते. लाभार्थीला त्या विकता येत नाहीत. ५ वर्षांचा करार केला जातो. त्यानंतर पुन्हा देता येत नाहीत. अगदीच अपवादात्मक स्थितीत पुन्हा ५ वर्षांचा करार करता येतो. लाभार्थीला त्यात नवे बांधकाम करता येत नाही, दुसऱ्या कोणाला त्या देता येत नाही. भाडे थकवले किंवा गैरवापर केला, तर कारवाई करून सदनिका काढून घेण्याचा अधिकार पालिकेकडे असतो. मालमत्ता व्यवस्थापन कक्ष; तसेच चाळ विभाग, असे दोन स्वतंत्र विभाग यासाठी पालिकेत कार्यरत आहेत; मात्र परस्परांवर जबाबदारी ढकलण्याशिवाय त्यांच्याकडून दुसरे काहीही व्हायला तयार नाही.बहुसंख्य पुनर्वसीतांनी १० वर्षांपेक्षा अधिक काळ पालिकेचे भाडे थकविले आहे. ही थकबाकी ३ कोटी २३ लाख रुपये इतकी आहे. याबाबत बराच ओरडा झाल्यानंतर १ हजार ४०० सदनिकाधारकांना नोटिसा बजावल्या गेल्या; मात्र पुढे काहीच झाले नाही. प्रशासनाची अशी डोळेझाक होत असल्याने अनेक कुुटुंबांनी मिळालेल्या सदनिका भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. > औंध, बाणेर, मुंढवा अशी उपनगरे; तसेच नीलायम चित्रपटगृहामागे व शहराच्या मध्यवस्तीत काही ठिकाणी अशा वसाहती आहेत.काहींनी आपल्या खोल्या परगावातून पुण्यात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे घेऊन दिल्या आहेत. पालिकेकडून वाटप न झालेल्या सदनिकांचा ताबा काही गुंडांनी कुलपे तोडून घेतला असून, तिथे पत्त्यांचा क्लब सुरू केला आहे.लिफ्ट, वाहनतळ, सोसायटी मेन्टेनन्स या नावाखाली सतत पैसे वसूल केले जातात. पालिका प्रशासन या सगळ्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने, तेथील नागरिक वैतागले असून, कारवाईची मागणी करीत आहेत.> प्रकल्पबाधित जागामालकांना नुकसानभरपाई मिळते, भाडेकरूंना नाही. सहानुभूती म्हणून पालिका त्यांना तात्पुरत्या स्वरूपात अशा सदनिका उपलब्ध करून देते; मात्र त्यांच्यातील अनेकांना विनामूल्य; तसेच मालकीची घरे हवी असतात. कायद्याने ते शक्य नाही. त्यामुळे त्यांच्याकडून वेळेवर भाडे जमा केले जात नाही, सदनिकांचा ताबा मुदत संपली, तरी सोडला जात नाही ही वस्तुस्थिती आहे; मात्र त्यांच्याकडून थकबाकी वसूल व्हावी, यासाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करते आहे; तसेच घर कोणी दुसऱ्यांना भाडेतत्त्वावर दिली आहेत का, वगैरेची तपासणी केली जाईल; पण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर संबंधितांनी नजीकच्या पोलीस ठाण्याची मदत घ्यायला हवी, पालिका या विषयात हस्तक्षेप करू शकत नाही. - सतीश कुलकर्णी, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन, महापालिका