शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

Aashadhi Wari: वारीचं वय होतंय तरुण, दिंड्यांमधील तरुणांची संख्या वाढली; आत्मिक समाधान हीच ओढ

By नितीन चौधरी | Updated: June 14, 2023 16:30 IST

कोरोना कालखंडापूर्वीच्या गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला असता वारीतून मार्गक्रमण करणाऱ्या तरुण वारकऱ्यांची संख्या वाढत आहे...

पुणे : 'तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात' कीर्तनातून सहभागी होणारा तरुण हा खऱ्या अर्थाने समाजात उठून दिसतो. याच उक्तीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आता तरुणाई उठून दिसत आहे. गेल्या काही वर्षांचे चित्र बघता तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन जीवनात असलेला ताण तणाव चिंता दूर करण्यासाठीच विठ्ठलाचे नामस्मरण हेच जीवनाचे सार असल्याचं या वारीत सहभागी होणाऱ्या तरुण वारकऱ्यांचं मत आहे. तरुणांची ही संख्या सध्या तीस ते पस्तीस टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे वारी ही ज्येष्ठांची आहे असा समज आता दूर होत आहे. हाच तरुण आता वैष्णवांची ही पताका सामर्थ्याने खांद्यावर घेऊन विठ्ठलाची आस धरतोय.

कोरोना कालखंडापूर्वीच्या गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला असता वारीतून मार्गक्रमण करणाऱ्या तरुण वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. वाडवडिलांची परंपरा पुढे सांभाळणाऱ्या तरुणांपेक्षाही वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असलेल्या मात्र कुटुंबातील सदस्यांनी वारी केलेली नसली तरी आपण मात्र अखंड वारी करायची असा ध्यासच काही तरुणांनी घेतला आहे. त्यात विशेषतः विदर्भ मराठवाड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांची संख्या जास्त आहे. बदनापूर (जिल्हा जालना) येथील कार्तिक एखंडे हे याचे उत्तम उदाहरण आहे.

कार्तिकला पंधराव्या वर्षीच आळंदीच्या माऊलींची ओढ लागली आणि हा तरुण वारकरी आळंदीतच स्थिरावला. गावाकडं अधूनमधून येणं जाणं असलं तरी आळंदीतच रमणारा हा कार्तिक गेली सात आठ वर्ष वारी करतोय. केवळ ज्ञानोबारायांच्या कृपेने वारी करतोय, अशी भावना तो व्यक्त करतोय. माऊलींच्या कृपेनेच वारी घडते अशी कृतार्थ भावना बीएससी ऍग्री केलेला बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचा सोपान माटे व्यक्त करतो. व्यावसायिक शिक्षण घेऊनही सोपान सारखे अनेक तरुण माऊलींच्या रथापुढे व रथामागे असणाऱ्या शेकडो दिंड्यांमध्ये आढळतात. उद्देश एकच ताण तणाव दूर करणे त्यातून परमार्थ साध्य करणे, संसाराचा गाडा ओढत असतानाच परमार्थाची गोडी लागणे, हे महत्त्वाचं असल्याचं मत माऊलींच्या रथापुढील सतराव्या दिंडीचे ज्ञानेश्वर महाराज सावर्डेकर व्यक्त करतात.

तरुण आणि ज्येष्ठांचा सहभाग असलेल्या या दिंडीत हे तरुण ज्येष्ठांशी कशा पद्धतीने जुळून घेतात याविषयी सावर्डेकर म्हणतात, "ही संकल्पनाच मुळात पाळली जात नाही. लहान थोर सारेच एक असे माऊलींनी  सांगितलेले आहे. त्याचीच रुजवात दिंड्यांमधूनही दिसून येते." तरुणांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल सावर्डेकर अभिमानाने आणि खात्रीनं असं सांगतात. तरुणांच्या हाती असलेली ही वैष्णवांची पताका यापुढे अभिमानाने कायम उंचावत राहील. येत्या काही काळात वारीचे स्वरूप या तरुणाईच्या सहभागाने वेगळे झालेले आपल्याला दिसून येईल अशी खात्री त्यांना आहे.

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात क्षणिक सुखाऐवजी कायमस्वरूपी तणावमुक्त जीवनाचा ध्यास घेऊनच ही तरुण मंडळी वारीत सहभागी होत आहेत. आपण हॉटेलमधूनही आता चुलीवरच्या जेवणाला प्राधान्य देत आहोत, जून्याकडे अनेकांचा कल आहे. अनेक टीव्ही चॅनेल्सवर सकाळचा वेळ हा कीर्तन प्रवचनासाठी दिल्याचा आपण बघतोय हा एक सकारात्मक बदल आहे अशी भावना विणेकरी तुकाराम धाडगे व्यक्त करतात.  पूर्वी दिंड्यांमधून ज्येष्ठांची संख्या जास्त होती. त्यात महिला व पुरुषही असायचे आणि मात्र महिलांचे प्रमाण कमी होत असले तरी पुरुषांमध्ये तरुण व मध्यमवर्गीय पुरुषांचे प्रमाण जास्त आहे हा बदल सकारात्मक आहे असे मत गेली तीस वर्षे वारी करणाऱ्या हडपसरमधील अशोक जगताप यांचे आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड