शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Aashadhi Wari: वारीचं वय होतंय तरुण, दिंड्यांमधील तरुणांची संख्या वाढली; आत्मिक समाधान हीच ओढ

By नितीन चौधरी | Updated: June 14, 2023 16:30 IST

कोरोना कालखंडापूर्वीच्या गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला असता वारीतून मार्गक्रमण करणाऱ्या तरुण वारकऱ्यांची संख्या वाढत आहे...

पुणे : 'तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात' कीर्तनातून सहभागी होणारा तरुण हा खऱ्या अर्थाने समाजात उठून दिसतो. याच उक्तीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आता तरुणाई उठून दिसत आहे. गेल्या काही वर्षांचे चित्र बघता तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन जीवनात असलेला ताण तणाव चिंता दूर करण्यासाठीच विठ्ठलाचे नामस्मरण हेच जीवनाचे सार असल्याचं या वारीत सहभागी होणाऱ्या तरुण वारकऱ्यांचं मत आहे. तरुणांची ही संख्या सध्या तीस ते पस्तीस टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे वारी ही ज्येष्ठांची आहे असा समज आता दूर होत आहे. हाच तरुण आता वैष्णवांची ही पताका सामर्थ्याने खांद्यावर घेऊन विठ्ठलाची आस धरतोय.

कोरोना कालखंडापूर्वीच्या गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला असता वारीतून मार्गक्रमण करणाऱ्या तरुण वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. वाडवडिलांची परंपरा पुढे सांभाळणाऱ्या तरुणांपेक्षाही वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असलेल्या मात्र कुटुंबातील सदस्यांनी वारी केलेली नसली तरी आपण मात्र अखंड वारी करायची असा ध्यासच काही तरुणांनी घेतला आहे. त्यात विशेषतः विदर्भ मराठवाड्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांची संख्या जास्त आहे. बदनापूर (जिल्हा जालना) येथील कार्तिक एखंडे हे याचे उत्तम उदाहरण आहे.

कार्तिकला पंधराव्या वर्षीच आळंदीच्या माऊलींची ओढ लागली आणि हा तरुण वारकरी आळंदीतच स्थिरावला. गावाकडं अधूनमधून येणं जाणं असलं तरी आळंदीतच रमणारा हा कार्तिक गेली सात आठ वर्ष वारी करतोय. केवळ ज्ञानोबारायांच्या कृपेने वारी करतोय, अशी भावना तो व्यक्त करतोय. माऊलींच्या कृपेनेच वारी घडते अशी कृतार्थ भावना बीएससी ऍग्री केलेला बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचा सोपान माटे व्यक्त करतो. व्यावसायिक शिक्षण घेऊनही सोपान सारखे अनेक तरुण माऊलींच्या रथापुढे व रथामागे असणाऱ्या शेकडो दिंड्यांमध्ये आढळतात. उद्देश एकच ताण तणाव दूर करणे त्यातून परमार्थ साध्य करणे, संसाराचा गाडा ओढत असतानाच परमार्थाची गोडी लागणे, हे महत्त्वाचं असल्याचं मत माऊलींच्या रथापुढील सतराव्या दिंडीचे ज्ञानेश्वर महाराज सावर्डेकर व्यक्त करतात.

तरुण आणि ज्येष्ठांचा सहभाग असलेल्या या दिंडीत हे तरुण ज्येष्ठांशी कशा पद्धतीने जुळून घेतात याविषयी सावर्डेकर म्हणतात, "ही संकल्पनाच मुळात पाळली जात नाही. लहान थोर सारेच एक असे माऊलींनी  सांगितलेले आहे. त्याचीच रुजवात दिंड्यांमधूनही दिसून येते." तरुणांच्या वाढत्या प्रमाणाबद्दल सावर्डेकर अभिमानाने आणि खात्रीनं असं सांगतात. तरुणांच्या हाती असलेली ही वैष्णवांची पताका यापुढे अभिमानाने कायम उंचावत राहील. येत्या काही काळात वारीचे स्वरूप या तरुणाईच्या सहभागाने वेगळे झालेले आपल्याला दिसून येईल अशी खात्री त्यांना आहे.

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात क्षणिक सुखाऐवजी कायमस्वरूपी तणावमुक्त जीवनाचा ध्यास घेऊनच ही तरुण मंडळी वारीत सहभागी होत आहेत. आपण हॉटेलमधूनही आता चुलीवरच्या जेवणाला प्राधान्य देत आहोत, जून्याकडे अनेकांचा कल आहे. अनेक टीव्ही चॅनेल्सवर सकाळचा वेळ हा कीर्तन प्रवचनासाठी दिल्याचा आपण बघतोय हा एक सकारात्मक बदल आहे अशी भावना विणेकरी तुकाराम धाडगे व्यक्त करतात.  पूर्वी दिंड्यांमधून ज्येष्ठांची संख्या जास्त होती. त्यात महिला व पुरुषही असायचे आणि मात्र महिलांचे प्रमाण कमी होत असले तरी पुरुषांमध्ये तरुण व मध्यमवर्गीय पुरुषांचे प्रमाण जास्त आहे हा बदल सकारात्मक आहे असे मत गेली तीस वर्षे वारी करणाऱ्या हडपसरमधील अशोक जगताप यांचे आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड