शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून आधार हद्दपार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:37 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेले आधार केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांना याठिकाणी येवून आधारकार्ड विषयक काम करणे सोपे जात होते.मात्र, फर्निचरचे काम सुरू झाल्याने हे केंद्र बंद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआधार केंद्र: वैकुंठ मेहता संस्थेच्या परिसरात स्थलांतरितजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-यांना आधारकार्ड विषयक नागरिकांच्या तक्रारी

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये फर्निचरचे काम सुरू केल्यामुळे सुमारे पाच महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरू असलेले आधार केंद्र बंद करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या केंद्रात येणे सर्वांना सोईचे होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने आधार केंद्र हद्दपार करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.केंद्र व राज्य शासनाने स्वीकारलेल्या धोरणामुळे आधारकार्डाला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. न्यायालयाने आधारकार्ड विषयी दिलेल्या निर्णयामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या आधारकार्ड केंद्रावरील नागरिकांची गर्दी अजूनही कमी झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेले आधार केंद्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नागरिकांना याठिकाणी येवून आधारकार्ड विषयक काम करणे सोपे जात होते.मात्र, फर्निचरचे काम सुरू झाल्याने हे केंद्र बंद करण्यात आले आहे.नागरिकांची गरज लक्षात घेवून तात्पुरत्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात आधार केंद्र सूरू करण्यात आले होते. आता हे केंद्र वैकुंठ मेहता राष्ट्रीय सरकारी व्यवस्थापन संस्थेच्या परिसरात सुरू नागरी सुविधा केंद्र सुरू केले जाणार आहे.त्यामुळे याच ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार केंद्र स्थलांतरित करण्यात येणार आहे,असे आधार केंद्र समन्वयक विकास भालेराव यांनी सांगितले. मात्र,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ए विंग मध्ये फर्निचरचे काम सुरू आहे.मात्र,बी विंगमधील सर्व खोल्या रिकाम्या आहेत. त्यामुळे केवळ फर्निचरच्या कारणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार केंद्र स्थलांतरीत करणे चूकीचे आहे,अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-यांना आधारकार्ड विषयक नागरिकांच्या तक्रारी ऐकाव्या लागतात. त्यामुळे हे केंद्र स्थलांतरीत केले जात असल्याची चर्चा केली जात आहे. मात्र,तक्रारी ऐकूण घेतल्याशिवाय नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे हे केंद्र स्थलांतरित करू नये,अशी मागणी नागरिक करत आहे. दरम्यान,आधार केंद्र बंद करण्यापूर्वी नागरिकांना कोणतीही कल्पना दिली नव्हती.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात केवळ भित्तीपत्रके चिटकवण्यात आली होती.त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.-----------------------जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या सुरू असलेल्या आधार केंद्राची जागा ही भूसंपादन विभागाची होती. तसेच हे केंद्र कायस्वरूपी सुरू करण्यात आले नव्हते. नागरी सुविधा केंद्रात विविध कारणांसाठी नागरिकांना यावे लागते. त्यामुळे नव्याने सुरू केलेल्या जाणा-या  वैैकुंठ मेहता संस्थेतील नागरी सुविधा केंद्राच्या शेजारीच आधार केंद्र सुरू करण्यात येईल.  - विकास भालेराव, आधार समन्व्यक अधिकारी,पुणे 

टॅग्स :PuneपुणेAdhar Cardआधार कार्ड