शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

अस्वस्थ तरुणाईचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी : शरद पवार

By निलेश राऊत | Updated: April 6, 2024 15:56 IST

यावेळी उपस्थित शेकडो तरुणांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पवार यांनी निवडणुका संपल्यावर तरुणाईच्या विविध समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले....

पुणे : ‘तरुणाईत आलेले नैराश्य हे देशाचे मोठे नुकसान आहे. अशा वेळी राज्य व केंद्र सरकार निर्णय घेत नसेल तर, लोकशाहीत आपण संघर्ष करणे जरुरीचे आहे तसेच तरुणाईचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे’, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

‘अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब’ या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, आमदार अशोक पवार, दीप्ती चवधरी, मोहन जोशी, पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. कुमार सप्तर्षी, भूषणसिंह होळकर, प्रभाकर देशमुख, प्रशांत जगताप, रवींद्र धंगेकर, चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शेकडो तरुणांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पवार यांनी निवडणुका संपल्यावर तरुणाईच्या विविध समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. दरम्यान, प्रशासनातील रिक्त पदे तात्काळ भरली जाणे जरुरी असल्याचे ते म्हणाले. सध्या शासकीय सेवेत कंत्राटी पद्धतीने जी कामगार भरती केली जात आहे, ती अयोग्य असून, ही पद्धती बंद झाली पाहिजे व कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय सेवेतील भरती ही एमपीएससी मार्फत झाली पाहिजे आणि ही भरती करताना होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायदा करणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले. गेल्या काही वर्षांत २० कोटी जणांना रोजगार दिला जाईल, असे बोलले गेले; पण प्रत्यक्षात ७ लाख जणांना रोजगार मिळाला याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. शासकीय सेवेत सर्व रिक्त जागा लवकर भरताना राज्यात उद्योग-व्यवसाय कसा वाढेल, याचाही विचार करणे जरुरीचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

‘डॉ. सप्तर्षी यांनी ही निवडणूक देशाचे भविष्य घडविणारी असून, परिवर्तनाची लाट आपण अंगावर घेऊन काम केले पाहिजे, असे सांगितले. सध्या तरुणाईच्या वाटेला निराशा आली आहे. जे बुद्धी चालवणार नाही असे तरुण या सरकारला पाहिजे. एक व्यापारी लॉबी देशात काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये वरून कीर्तन आतून तमाशा असेच चालले आहे. अशा वेळी देशाला व्यापारी लॉबीतून मुक्त करण्याचे चॅलेंज असून, तरुणांनी निवडणूक हातात घेणे जरुरी आहे’, असे ते म्हणाले.

भूषणसिंह होळकर यांनी तरुणाईचा प्रश्न सोडवण्यासाठी होळकर नेहमी पुढे असतील असे सांगितले. विद्यार्थ्यांना फी आकारण्यापेक्षा आमदारांचे पगार बंद करा, कशाला त्यांना पैसे पाहिजे. जे तरुणांसाठी आवश्यक आहे ते केले पाहिजे. उद्याचा प्रशासक घडवायचा असेल तर या तरुणाईला बळ दिले पाहिजे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास पासलकर यांनी केले.

अनेक देशांमध्ये सैन्य दलात मुली माेठ्या प्रमाणात कार्यरत आहेत; पण आपल्याकडे सैन्यदलात मुली नव्हत्या. मी संरक्षण मंत्री असताना हवाई व नौदलाच्या सेवेत मुलींना स्थान देण्याचा निर्णय घेतला. मुलींना सर्व क्षेत्रात संधी मिळाली पाहिजे, ही समाजामध्ये मानसिकता रुजली पाहिजे, असे पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवार