शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अस्वस्थ तरुणाईचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी : शरद पवार

By निलेश राऊत | Updated: April 6, 2024 15:56 IST

यावेळी उपस्थित शेकडो तरुणांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पवार यांनी निवडणुका संपल्यावर तरुणाईच्या विविध समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले....

पुणे : ‘तरुणाईत आलेले नैराश्य हे देशाचे मोठे नुकसान आहे. अशा वेळी राज्य व केंद्र सरकार निर्णय घेत नसेल तर, लोकशाहीत आपण संघर्ष करणे जरुरीचे आहे तसेच तरुणाईचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे’, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

‘अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब’ या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, आमदार अशोक पवार, दीप्ती चवधरी, मोहन जोशी, पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. कुमार सप्तर्षी, भूषणसिंह होळकर, प्रभाकर देशमुख, प्रशांत जगताप, रवींद्र धंगेकर, चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शेकडो तरुणांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पवार यांनी निवडणुका संपल्यावर तरुणाईच्या विविध समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. दरम्यान, प्रशासनातील रिक्त पदे तात्काळ भरली जाणे जरुरी असल्याचे ते म्हणाले. सध्या शासकीय सेवेत कंत्राटी पद्धतीने जी कामगार भरती केली जात आहे, ती अयोग्य असून, ही पद्धती बंद झाली पाहिजे व कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय सेवेतील भरती ही एमपीएससी मार्फत झाली पाहिजे आणि ही भरती करताना होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायदा करणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले. गेल्या काही वर्षांत २० कोटी जणांना रोजगार दिला जाईल, असे बोलले गेले; पण प्रत्यक्षात ७ लाख जणांना रोजगार मिळाला याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. शासकीय सेवेत सर्व रिक्त जागा लवकर भरताना राज्यात उद्योग-व्यवसाय कसा वाढेल, याचाही विचार करणे जरुरीचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

‘डॉ. सप्तर्षी यांनी ही निवडणूक देशाचे भविष्य घडविणारी असून, परिवर्तनाची लाट आपण अंगावर घेऊन काम केले पाहिजे, असे सांगितले. सध्या तरुणाईच्या वाटेला निराशा आली आहे. जे बुद्धी चालवणार नाही असे तरुण या सरकारला पाहिजे. एक व्यापारी लॉबी देशात काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये वरून कीर्तन आतून तमाशा असेच चालले आहे. अशा वेळी देशाला व्यापारी लॉबीतून मुक्त करण्याचे चॅलेंज असून, तरुणांनी निवडणूक हातात घेणे जरुरी आहे’, असे ते म्हणाले.

भूषणसिंह होळकर यांनी तरुणाईचा प्रश्न सोडवण्यासाठी होळकर नेहमी पुढे असतील असे सांगितले. विद्यार्थ्यांना फी आकारण्यापेक्षा आमदारांचे पगार बंद करा, कशाला त्यांना पैसे पाहिजे. जे तरुणांसाठी आवश्यक आहे ते केले पाहिजे. उद्याचा प्रशासक घडवायचा असेल तर या तरुणाईला बळ दिले पाहिजे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास पासलकर यांनी केले.

अनेक देशांमध्ये सैन्य दलात मुली माेठ्या प्रमाणात कार्यरत आहेत; पण आपल्याकडे सैन्यदलात मुली नव्हत्या. मी संरक्षण मंत्री असताना हवाई व नौदलाच्या सेवेत मुलींना स्थान देण्याचा निर्णय घेतला. मुलींना सर्व क्षेत्रात संधी मिळाली पाहिजे, ही समाजामध्ये मानसिकता रुजली पाहिजे, असे पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवार