शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

अस्वस्थ तरुणाईचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था हवी : शरद पवार

By निलेश राऊत | Updated: April 6, 2024 15:56 IST

यावेळी उपस्थित शेकडो तरुणांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पवार यांनी निवडणुका संपल्यावर तरुणाईच्या विविध समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले....

पुणे : ‘तरुणाईत आलेले नैराश्य हे देशाचे मोठे नुकसान आहे. अशा वेळी राज्य व केंद्र सरकार निर्णय घेत नसेल तर, लोकशाहीत आपण संघर्ष करणे जरुरीचे आहे तसेच तरुणाईचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे’, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

‘अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब’ या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, आमदार अशोक पवार, दीप्ती चवधरी, मोहन जोशी, पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. कुमार सप्तर्षी, भूषणसिंह होळकर, प्रभाकर देशमुख, प्रशांत जगताप, रवींद्र धंगेकर, चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शेकडो तरुणांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पवार यांनी निवडणुका संपल्यावर तरुणाईच्या विविध समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. दरम्यान, प्रशासनातील रिक्त पदे तात्काळ भरली जाणे जरुरी असल्याचे ते म्हणाले. सध्या शासकीय सेवेत कंत्राटी पद्धतीने जी कामगार भरती केली जात आहे, ती अयोग्य असून, ही पद्धती बंद झाली पाहिजे व कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय सेवेतील भरती ही एमपीएससी मार्फत झाली पाहिजे आणि ही भरती करताना होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायदा करणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले. गेल्या काही वर्षांत २० कोटी जणांना रोजगार दिला जाईल, असे बोलले गेले; पण प्रत्यक्षात ७ लाख जणांना रोजगार मिळाला याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. शासकीय सेवेत सर्व रिक्त जागा लवकर भरताना राज्यात उद्योग-व्यवसाय कसा वाढेल, याचाही विचार करणे जरुरीचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

‘डॉ. सप्तर्षी यांनी ही निवडणूक देशाचे भविष्य घडविणारी असून, परिवर्तनाची लाट आपण अंगावर घेऊन काम केले पाहिजे, असे सांगितले. सध्या तरुणाईच्या वाटेला निराशा आली आहे. जे बुद्धी चालवणार नाही असे तरुण या सरकारला पाहिजे. एक व्यापारी लॉबी देशात काम करत आहे. महाराष्ट्रामध्ये वरून कीर्तन आतून तमाशा असेच चालले आहे. अशा वेळी देशाला व्यापारी लॉबीतून मुक्त करण्याचे चॅलेंज असून, तरुणांनी निवडणूक हातात घेणे जरुरी आहे’, असे ते म्हणाले.

भूषणसिंह होळकर यांनी तरुणाईचा प्रश्न सोडवण्यासाठी होळकर नेहमी पुढे असतील असे सांगितले. विद्यार्थ्यांना फी आकारण्यापेक्षा आमदारांचे पगार बंद करा, कशाला त्यांना पैसे पाहिजे. जे तरुणांसाठी आवश्यक आहे ते केले पाहिजे. उद्याचा प्रशासक घडवायचा असेल तर या तरुणाईला बळ दिले पाहिजे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास पासलकर यांनी केले.

अनेक देशांमध्ये सैन्य दलात मुली माेठ्या प्रमाणात कार्यरत आहेत; पण आपल्याकडे सैन्यदलात मुली नव्हत्या. मी संरक्षण मंत्री असताना हवाई व नौदलाच्या सेवेत मुलींना स्थान देण्याचा निर्णय घेतला. मुलींना सर्व क्षेत्रात संधी मिळाली पाहिजे, ही समाजामध्ये मानसिकता रुजली पाहिजे, असे पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवार