शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! १८६ रुपयांत लाटणार होता ११.२६ कोटी; शेतकऱ्याकडे तब्बल ११ हजार एकर जमीन पडताळणीत उघड

By नितीन चौधरी | Updated: October 8, 2023 10:15 IST

नुकसान भरपाईसाठी पात्र ठरला असता, तर त्याला केवळ १८६ रुपयांच्या विमा रकमेत तब्बल ११ कोटी २८ लाख रुपयांचा लाभ झाला असता. 

पुणे  : एका शेतकऱ्याकडे तब्बल साडेचार हजार हेक्टर अर्थात ११ हजार एकर जमीन आहे. विश्वास बसत नाही ना? या शेतकऱ्याने या सर्व जमिनीवर सोयाबीन लावले आहे, तेही तब्बल २८ जिल्ह्यांमध्ये. कृषी विभागाने खरीप पीकविमा योजनेत केलेल्या शेतकऱ्यांच्या पडताळणीत हा पठ्ठ्या सापडला. नुकसान भरपाईसाठी पात्र ठरला असता, तर त्याला केवळ १८६ रुपयांच्या विमा रकमेत तब्बल ११ कोटी २८ लाख रुपयांचा लाभ झाला असता. 

त्या मोबदल्यात त्याने सरकारला ४ कोटींचा चुना लावला असता. प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत २१ दिवसांपेक्षा जास्त खंड असलेल्या मंडळांमध्ये १८ जिल्ह्यांत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कृषी  विभागाकडून पडताळणी करताना ही बाब उघड झाली. हा पठ्ठ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आहे.

कारवाईचे आदेश -त्याच्याकडे स्वत:चे सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) आहे. या केंद्रावरूनच त्याने हा उद्योग केला. त्याने त्याचे वडील व आजोबांच्या नावावरही विमा काढला. त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश देण्यात येणार आहेत.

२८ जिल्ह्यांत जमीन त्याने २८ जिल्ह्यांमध्ये जमीन असल्याचे दाखवत विम्यासाठी १८६ अर्ज केले. यातील ५० अर्जांमधून त्याने संभाजीनगर जिल्ह्यात १ हजार २२१ हेक्टर जमीन दाखवून ६ कोटी ९ लाख ६५ हजार ८७५ रुपयांचा विमा काढला. 

बीड जिल्ह्यात ३१ अर्जांमधून ५८३ हेक्टर जमीन दाखवून ३ कोटी ४ लाख ३५ हजारांचा विमा उतरवला. हिंगोलीत १४ अर्जांद्वारे ४९० हेक्टर व लातूरमध्ये १४ अर्जांतून ३८० हेक्टर जमीन दाखवली. 

या पठ्ठ्याने २८ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ५१८.३९ हेक्टर अर्थात ११ हजार २९५ एकर जमीन असल्याचे दाखवले आहे. या २८ जिल्ह्यांपैकी चंद्रपूर, जळगाव, नाशिक, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील विमा उतरवलेल्या जमिनीचे क्षेत्र अजून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून उपलब्ध झालेले नाही. हा आकडा ५ हजार हेक्टरच्या वर जाईल.

सोयाबीनचीच सगळीकडे नोंद - साडेचार हजार हेक्टर जमिनीवर सोयाबीनचे पीक दाखवून पठ्ठ्याने २२ कोटी ५७ लाख ४३ हजार १७८ रुपयांचा विमा काढला. - त्यासाठी राज्य सरकारला शेतकरी हिश्श्यापोटी सुमारे ३ कोटी ९८ लाख ६५ हजार ८५४ रुपये विमा कंपन्यांना द्यावे लागणार होते. - अर्थात या पठ्ठ्याने राज्य सरकारला चार कोटींंना गंडवले असते.- नुकसानभरपाईचे निकष लागू झाल्यास ५० टक्के भरपाईपोटी ११ कोटी २८ लाख ७१ हजार ५८९ रुपयांचा लाभ मिळाला असता.

टॅग्स :fraudधोकेबाजीFarmerशेतकरीMONEYपैसा