शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘एमपीएससी’ मागे धावताना ९९ टक्के होतात अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:11 IST

अमोल अवचिते लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या परीक्षा देऊन ...

अमोल अवचिते

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न दरवर्षी लाखो तरुण पाहतात. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र यात यशस्वी ठरणाऱ्यांचे प्रमाण जेमतेम एक टक्का देखील नसल्याचे गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

अधिकार पदाची जागा पटकावण्यासाठी लाखो तरुण दरवर्षी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात येऊन अनेक नशीब आजमावतात. मात्र योग्यवेळी स्वत:च्या क्षमतांचा योग्य अंदाज न घेता या मृगजळामागे धावत राहतात आणि आयुष्यातला महत्त्वाचा कालखंड वाया घालवतात, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘लोकमत’कडे मांडले.

एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्चला होणार नसल्याचे समजताच राज्यात झालेला विद्यार्थ्यांचा उद्रेक नुकताच सर्वांनी पाहिला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न समोर आले आहेत. एमपीएससीचे अनियमित वेळापत्रक, न्यायालयीन लढाई, आरक्षण, निवडणूका आदी कारणांमुळे परीक्षा प्रक्रियेला लागणारा वेळ यात विद्यार्थ्यांची मोलाची वर्षे वाया जात आहेत. दुसरीकडे नैराश्यात भर पडत आहे. जेवढ्या प्रमाणात परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या आहे. तेवढ्या प्रमाणात जागा निघतात का? हा मोठा प्रश्न आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण किती याची सत्यता पडताळण्याची गरज आहे. सातत्याने ज्यांना परीक्षेत अपयश येते त्या विद्यार्थ्याकडे अन्य पर्याय (बी प्लॅन) आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे. त्याच बरोबर सोबत दिलेल्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. असे जाणकारांचे म्हणणे आहे.

चौकट

बोलके आकडे

वर्ष भरलेली पदे परीक्षेसाठी आलेलले अर्ज यशस्वी विद्यार्थ्यांची टक्केवारी

२०१९-२० ४८६७ १५, ३४, ३३७ ०. ३२

२०१८-१९ ५३६७ २६, ६४, ०४१ ०. २०

२०१७-१८ ८६८८ १७, ४१, ०६९ ० . ५०

२०१७-१६ ३२५४ ११, ३४, २०० ०. २९

२०१६-१५ ५४९२ ५, २९, ६९५ १. ०४

एकूण २७,६६४ ७६,०३, ३४२

चौकट

‘प्लान बी’ हवाच

* स्वत:ची आवड, क्षमता ओळखा

* स्पर्धा परीक्षेची तयारी पदवीला असतानाच सुरु करा.

* पदवीनंतर स्पर्धा परीक्षेसाठी किमान ३ ते ५ वर्षाचा कालावधी द्यावा यश आले तर उत्तम. अन्यथा ‘बी प्लॅन’ हवाच.

* अन्य क्षेत्रातही अनेक संधी आहेत, त्याची माहिती ठेवावी.

* चुकीचे मार्गदर्शन, बड्या जाहिराती यांना भुलू नये.

चौकट

लक्षात घ्यावे असे

* पहिल्या दोन ते तीन वर्षात चांगला अभ्यास करता येऊन यश मिळवता येते, याचा आत्मविश्वास ठेवावा.

* सगळीच स्वप्ने पूर्ण होत नसतात.

* स्पर्धा परीक्षा म्हणजेच आयुष्य नाही हे भान हवे.

* आई-वडील, कुटुंब हे देखील परीक्षेइतकेच महत्वाचे असल्यचे विसरु नका.

* अपयश स्वीकारण्याची मानसिकता ठेवा.

चौकट

सरकारची जबाबदारी

* रिक्त जागांचे मागणीपत्र एमपीएससीला वेळेवर पाठवावे.

* नियुक्त्या, प्रशिक्षण प्रलंबित ठेऊ नका

* एमपीएससी स्वायत्त संस्था असल्याचे भान ठेवा.

चौकट

‘एमपीएससी’कडून अपेक्षा

* दरवर्षी वेळापत्रक जाहीर करा.

* ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घ्या.

* परीक्षा यादी जाहीर करा

* एकदा वर्ग एक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पुन्हा वर्ग दोनच्या पदासाठी मनाई करा.

* सरकारच्या दबावाला बळी पडू नका.

चौकट

“शासनाच्या बदलत्या धोरणाचा फटका अनेक विद्यार्थाना बसला आहे. नोकर भारती बंद करणे योग्य नाही. मुलांनी स्पर्धा परीक्षेच्या मृगजळाला न भुलता इतर पर्यायांचा विचार करावा. पालकांनी मुलांच्या करियर बाबतीत दृष्टिकोन ठेवला पाहिजे. या परीक्षांमध्ये वर्षे वाया जाणार नाहीत याची घ्यावी. या क्षेत्रात खूप मोठी तरुण शक्ती वाया जात असल्याची खंत वाटते.”

-राजेंद्र कोंढरे, अध्यक्ष, शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशन.

चौकट

आर्थिक स्थितीचा दबाव

“कोणत्याही पालकाला पाल्याचे अपयश बघण्याची इच्छा नसते. पाठिंबा देऊन त्याला अभ्यास करायला सांगतो. कर्ज काढून, जमीन विकून, सोने गहाण ठेवून पैसे दिले जातात. याचा देखील दबाब विद्यार्थ्यांवर असतो. वेळीच पाल्याला ओळखता आले तर अनेक गोष्टी सोप्या होतील.”

-राजेश शिंदे, पालक.