शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आसखेड रस्त्याच्या कामांसाठी ९७ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:27 IST

आंबेठाण चौक ते करंजविहीरे रस्ता : जनतेच्या दबावामुळे रस्त्यांच्या कामांना सुरुवात

आसखेड : येथील आंबेठाण चौक ते करंजविहीरे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. लवकरच या रस्त्याच्या कामांना सुरुवात होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. हायब्रीड अ‍ॅन्युईटी कार्यक्रम २०१८ या अंतर्गत १८ किलोमीटरच्या कामासाठी ९७.२६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून आंबेठाण चौक ते करंजविहीरे रस्त्याची दुरुस्ती प्रतीक्षेत होती. रस्त्यावरील खड्डे, धूळ व जड वाहतूक आदीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र जनमताच्या दबावामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. आमदार सुरेश गोरे यांनी सद्यस्थितीची माहिती देताना सांगितले की, या हायब्रीड अ‍ॅन्यूईटी कार्यक्रम योजनेत कर्ज काढताना ठेकेदारास शासन जामीनदार राहाणार या प्रक्रियेत प्रशासकीय अडचणीमुळे उशीर झाला. १५ ते २० दिवसांत काम सुरू होईल. यामध्ये आंबेठाण चौक ते भांबोली या दहा किलोमीटर चारपदरी रस्त्यासाठी सुमारे ५२.२१ कोटी, आसखेड फाटा ते करंजविहिरे या सुमारे ६.४५ किलोमीटरसाठी ३४.२३ कोटी, तर करंजविहिरे ते खिंड या २ किमीसाठी १०.८२ कोटी रुपये खर्चून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. आंबेठाण चौक ते करंजविहिरे-तळेगाव (आंबी) औद्योगिक वसाहत या रस्त्याने वसाहतीची अवजड वाहतूक होते. टप्पा दोन व तळेगाव वसाहतीस जोडणारा हाही एक रस्ता आहे, त्यामुळे रस्त्याच्या कुवतीपेक्षा जास्तीच्या वाहतुकीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तर याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कित्येक ठिकाणी मोठमोठे खड्डे तर कित्येक ठिकाणी पूर्णपणे डांबररहित रस्ता तयार झाला. त्यामुळे नागरिकांना धूळ व गाड्याचे नुकसान, वेळेचा अपव्यय याचा त्रास सहन करावा लागला. परंतु आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर सदर रस्त्यास सुमारे ९७.२३ कोटी मंजूर झाले असले तरी यात रस्त्याच्या रुंदीकरणात येणाºया अडचणीवर विद्यमान आमदार व प्रशासन काय तोडगा काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.वाडा रस्त्यावर खड्डेवाडा : येथील गावातील अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहे. यामुळे येथून ये-जा करणाºया नागरिकांनायाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.येथील रस्त्यांचे काही वर्षांपूर्वी खडीकरणात झाले होते. त्यानंतर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाºया नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ रस्ता दुरुस्तीची मागणी करत आहेत. गेल्या कित्येक वर्षांत या रस्त्याचे काम झालेले नाही. दरवर्षी पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील माती वाहून गेल्याने खडी मोठ्या प्रमाणात निघाली असून रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

टॅग्स :Puneपुणे