शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भामा-आसखेडमध्ये ७३ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:20 IST

यंदाच्या वर्षी वेळीअवेळी पडलेल्या पावसामुळे भामा-आसखेड धरणात सध्या ७२.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर गतवर्षी ५४.२० टक्के पाणीसाठा होता.

आसखेड : यंदाच्या वर्षी वेळीअवेळी पडलेल्या पावसामुळे भामा-आसखेड धरणात सध्या ७२.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर गतवर्षी ५४.२० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी झालेल्या सुमारे १२९२ मिलिमीटर पाऊसामुळे विहिरी - नाले आजपर्यंत समाधानकारक भरलेले आहेत. त्यामुळे मार्चअखेर जवळ आला तरी पाणीप्रश्न अजून मोठ्या प्रमाणात निर्माण झाला नसल्याची माहिती भामा-आसखेडचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली.धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी असून, धरणात सध्या ७२.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. १६ ते १८ नोव्हेंबर या तीन दिवसांदरम्यान धरणातून ५५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते, तर २४ डिसेंबरला ७८३ वरून ८६० क्युसेक्स सोडून ३ जानेवारी १८ ला बंद, ३१ जानेवारी १८ ला ८४५ क्युसेक्सने सोडून २ फेब्रुवारीला बंद, तर २० फेब्रुवारीला ६०० क्युसेक्स, ९५० वरून १००० क्युसेक्सने पाणी सोडून ३ मार्च १८ ला विसर्ग बंद करण्यात आला होता. असा चार वेळा विसर्ग सोडण्यात आला होता.धरणाची सध्याची पाणीपातळी ६६७.३७ मीटर इतकी आहे, तर पाणीसाठा १७१.९२४ दलघमी व उपयुक्त पाणीसाठा १५८.४०२ दलघमी इतका आहे.यंदा धरण वेळोवेळीच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरल्याने बºयाचदा विसर्ग सोडावा लागला. पूर्ण भरल्यामुळे या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तीन तालुक्यांना होणार आहे.त्यामुळे हे धरण तीनही तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांना वरदान ठरले आहे, तर नदीकाठाजवळपासच्या गावांची तहान भागणार आहे.>शेतपिकाच्यापाण्याची चिंता मिटलीवेळोवेळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे त्याचा फायदा खेड तालुक्यासह शिरूर, दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आणि विविध गावच्या पाणी योजनांना झाला तर झालाच, पण त्याबरोबरच नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरले. त्यामुळे २-३ महिने नदीकाठच्या शेतकºयांची शेतपिकाच्या पाण्याची चिंता मिटली.