शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आषाढी यात्रेनिमित्त ७२ विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 15:39 IST

आषाढी यात्रेनिमित्त विविध मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमिरज व पंढरपुर मार्गावर दि. १९ ते २८ जुलैदरम्यान दररोज डेमु सोडण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज या गाडीच्या दोन फेऱ्या 

पुणे :  पंढरपुर येथील आषाढी यात्रेनिमित्त मुंबई, नवी अमरावती, खामगाव, लातुर व मिरज-कुर्डूवाडी मार्गावर ७२ विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मिरज या गाडीच्या दोन फेऱ्या होतील. ही गाडी दि. २२ जुलैला मध्यरात्री १२.२० वाजता मुंबई स्थानकातून सुटून त्याच दिवशी दुपारी ४.०५ वाजता मिरज स्थानकात पोहचेल. तर दि. २३ जुलैला रात्री ८.५५ वाजता मिरज स्थानकातून परतीचा प्रवास सुरू होईल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपुर, सांगोला, धालगाव हे थांबे असतील. पंढरपुर-कुर्डूवाडी या गाडीच्या १२ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी दि. २०, २१, २२, २७, २८, २९ जुलैला दुपारी १.३५ वाजता पंढरपुर स्थानकातून सोडण्यात येणार आहे. तर त्याचदिवशी दुपारी ३.३० वाजता कुर्डुवाडी स्थानकातून पंढरपुरकडे प्रस्थान करेल.नवी अमरावती ते पंढरपुर अनारक्षित गाडीच्या चार फेऱ्या  होतील. ही गाडी दि. १७ व २० जुलै रोजी दुपारी २ वाजता नवी अमरावती स्थानकातून सुटून दुसऱ्या दिवशी ११.१५ वाजता पंढरपुर येथे पोहचेल. तर पंढरपुर येथून दि. १८ व २४ जुलैला दु. ४ वाजता सुटेल. खामगाव ते पंढरपुर ही गाडी दि. १९ व २५ जुलैला सकाळी ११.१५ वाजता खामगाव स्थानकातून पंढरपुर कडे रवाना होईल. तर पढरपुर स्थानकातून त्याच दिवशी सकाळी दुपारी ४ वाजता निघेल. लातुर ते पंढरपुर ही दि. २०, २३, २४, २५ व २७ जुलैला सकाळी ७.४५ वाजता पंढरपुरकडे प्रस्थान करेल. तर त्याचदिवशी दुपारी २ वाजता पंढरपुर स्थानकातून सुटेल.मिरज व पंढरपुर मार्गावर दि. १९ ते २८ जुलैदरम्यान दररोज डेमु सोडण्यात येईल. ही गाडी मिरज स्थानकातून सकाळी ५.३० वाजता तर पंढरपुर स्थानकातून सकाळी ९.५० वाजता सुटेल. मिरज व कुर्डुवाडी दरम्यानही अनुक्रमे दुपारी २.४० व रात्री ८.३० वाजता डेमु गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रIndian Railwayभारतीय रेल्वेPandharpurपंढरपूर