शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

देशात कर्करोगामुळे ७० लाख रुग्णांचा मत्यू -अरुणविजयजीमहाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 03:14 IST

भारत देशामध्ये दरवर्षी सुमारे सत्तर लाख लोक कर्करोगसारख्या गंभीर आजाराने मृत्युमुखी पडत असल्याचे विदारक चित्र आहे. कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाबरोबरच प्रदूषित आहारामुळेही होतो हे लक्षात घेतले पाहिजे.

भिगवण - भारत देशामध्ये दरवर्षी सुमारे सत्तर लाख लोक कर्करोगसारख्या गंभीर आजाराने मृत्युमुखी पडत असल्याचे विदारक चित्र आहे. कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाबरोबरच प्रदूषित आहारामुळेही होतो हे लक्षात घेतले पाहिजे. आहारातील प्रदूषणाबरोबरच विचारांचेही प्रदूषण सजग समाजासाठी धोकादायक आहे. सजग, संवेदनशील व निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी चुकीचा आहार व चुकीच्या विचारांचे होत असलेले प्रदूषण रोखण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जैन मुनी अरुणविजयजीमहाराज यांनी केले.भिगवण येथील सकल जैन समाजाच्या वतीने जैन स्थानकांमध्ये महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास हेमंतमुनी महाराज, भिगवण जैन संघाचे अध्यक्ष अभय रायसोनी, उपाध्यक्ष मनोज मुनोत, अशोक रायसोनी, विजयकुमार बोगावत, महेंद्र बोगावत, कमलेश गांधी, राहुल गुंदेचा, संदीप बोगावत आदी उपस्थित होते. श्री अरुणविजयजीमहाराज म्हणाले, कर्करोग हा केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतो, हा गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे.या वेळी गार्इंची कत्तलखान्यापासून सुटका करण्यासाठी अशोक रायसोनी, अभय रायसोनी, संदीप बोगावत, कमलेश गांधी, विजय रायसोनी, संजय रायसोनी, चैनसुख बोरा, लालचंद रायसोनी, उमाकांत रायसोनी व योगेश ललवाणी यांनी प्रत्येकी एक गाय पुणे येथील विरालय गोशाळेस भेट देण्याचे जाहीर केले. तसेच जैनस्थानकांमधील कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिकचा वापर न करण्याचा संकल्पही करण्यात आला. सचिन बोगावत यांनी प्रास्ताविक केले. राहुल गुंदेचा यांनी सूत्रसंचालन केले. संजय रायसोनी यांनी आभार मानले. नियोजन सचिन बोगावत, किरण रायसोनी, विशाल गांधी, केतन बोरा, हर्षद रायसोनी, निखिल बोगावत, शुभंम बोरा आदींसह सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले.सध्या कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ५४ टक्के प्रमाण महिलांचे आहे. अन्न शिजविताना वापरलेली भांडी, प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर, तसेच जंकफूड यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शुद्ध व सात्विक आहार व शुद्ध विचाराची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यासाठी आहारातील भेसळ व विचारांमधील प्रदूषण रोखण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :cancerकर्करोगIndiaभारत