शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

देशात कर्करोगामुळे ७० लाख रुग्णांचा मत्यू -अरुणविजयजीमहाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 03:14 IST

भारत देशामध्ये दरवर्षी सुमारे सत्तर लाख लोक कर्करोगसारख्या गंभीर आजाराने मृत्युमुखी पडत असल्याचे विदारक चित्र आहे. कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाबरोबरच प्रदूषित आहारामुळेही होतो हे लक्षात घेतले पाहिजे.

भिगवण - भारत देशामध्ये दरवर्षी सुमारे सत्तर लाख लोक कर्करोगसारख्या गंभीर आजाराने मृत्युमुखी पडत असल्याचे विदारक चित्र आहे. कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाबरोबरच प्रदूषित आहारामुळेही होतो हे लक्षात घेतले पाहिजे. आहारातील प्रदूषणाबरोबरच विचारांचेही प्रदूषण सजग समाजासाठी धोकादायक आहे. सजग, संवेदनशील व निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी चुकीचा आहार व चुकीच्या विचारांचे होत असलेले प्रदूषण रोखण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जैन मुनी अरुणविजयजीमहाराज यांनी केले.भिगवण येथील सकल जैन समाजाच्या वतीने जैन स्थानकांमध्ये महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास हेमंतमुनी महाराज, भिगवण जैन संघाचे अध्यक्ष अभय रायसोनी, उपाध्यक्ष मनोज मुनोत, अशोक रायसोनी, विजयकुमार बोगावत, महेंद्र बोगावत, कमलेश गांधी, राहुल गुंदेचा, संदीप बोगावत आदी उपस्थित होते. श्री अरुणविजयजीमहाराज म्हणाले, कर्करोग हा केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतो, हा गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे.या वेळी गार्इंची कत्तलखान्यापासून सुटका करण्यासाठी अशोक रायसोनी, अभय रायसोनी, संदीप बोगावत, कमलेश गांधी, विजय रायसोनी, संजय रायसोनी, चैनसुख बोरा, लालचंद रायसोनी, उमाकांत रायसोनी व योगेश ललवाणी यांनी प्रत्येकी एक गाय पुणे येथील विरालय गोशाळेस भेट देण्याचे जाहीर केले. तसेच जैनस्थानकांमधील कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिकचा वापर न करण्याचा संकल्पही करण्यात आला. सचिन बोगावत यांनी प्रास्ताविक केले. राहुल गुंदेचा यांनी सूत्रसंचालन केले. संजय रायसोनी यांनी आभार मानले. नियोजन सचिन बोगावत, किरण रायसोनी, विशाल गांधी, केतन बोरा, हर्षद रायसोनी, निखिल बोगावत, शुभंम बोरा आदींसह सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले.सध्या कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ५४ टक्के प्रमाण महिलांचे आहे. अन्न शिजविताना वापरलेली भांडी, प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर, तसेच जंकफूड यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शुद्ध व सात्विक आहार व शुद्ध विचाराची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यासाठी आहारातील भेसळ व विचारांमधील प्रदूषण रोखण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :cancerकर्करोगIndiaभारत