शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

देशात कर्करोगामुळे ७० लाख रुग्णांचा मत्यू -अरुणविजयजीमहाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 03:14 IST

भारत देशामध्ये दरवर्षी सुमारे सत्तर लाख लोक कर्करोगसारख्या गंभीर आजाराने मृत्युमुखी पडत असल्याचे विदारक चित्र आहे. कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाबरोबरच प्रदूषित आहारामुळेही होतो हे लक्षात घेतले पाहिजे.

भिगवण - भारत देशामध्ये दरवर्षी सुमारे सत्तर लाख लोक कर्करोगसारख्या गंभीर आजाराने मृत्युमुखी पडत असल्याचे विदारक चित्र आहे. कर्करोग हा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाबरोबरच प्रदूषित आहारामुळेही होतो हे लक्षात घेतले पाहिजे. आहारातील प्रदूषणाबरोबरच विचारांचेही प्रदूषण सजग समाजासाठी धोकादायक आहे. सजग, संवेदनशील व निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी चुकीचा आहार व चुकीच्या विचारांचे होत असलेले प्रदूषण रोखण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जैन मुनी अरुणविजयजीमहाराज यांनी केले.भिगवण येथील सकल जैन समाजाच्या वतीने जैन स्थानकांमध्ये महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास हेमंतमुनी महाराज, भिगवण जैन संघाचे अध्यक्ष अभय रायसोनी, उपाध्यक्ष मनोज मुनोत, अशोक रायसोनी, विजयकुमार बोगावत, महेंद्र बोगावत, कमलेश गांधी, राहुल गुंदेचा, संदीप बोगावत आदी उपस्थित होते. श्री अरुणविजयजीमहाराज म्हणाले, कर्करोग हा केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतो, हा गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे.या वेळी गार्इंची कत्तलखान्यापासून सुटका करण्यासाठी अशोक रायसोनी, अभय रायसोनी, संदीप बोगावत, कमलेश गांधी, विजय रायसोनी, संजय रायसोनी, चैनसुख बोरा, लालचंद रायसोनी, उमाकांत रायसोनी व योगेश ललवाणी यांनी प्रत्येकी एक गाय पुणे येथील विरालय गोशाळेस भेट देण्याचे जाहीर केले. तसेच जैनस्थानकांमधील कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिकचा वापर न करण्याचा संकल्पही करण्यात आला. सचिन बोगावत यांनी प्रास्ताविक केले. राहुल गुंदेचा यांनी सूत्रसंचालन केले. संजय रायसोनी यांनी आभार मानले. नियोजन सचिन बोगावत, किरण रायसोनी, विशाल गांधी, केतन बोरा, हर्षद रायसोनी, निखिल बोगावत, शुभंम बोरा आदींसह सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले.सध्या कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ५४ टक्के प्रमाण महिलांचे आहे. अन्न शिजविताना वापरलेली भांडी, प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर, तसेच जंकफूड यामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शुद्ध व सात्विक आहार व शुद्ध विचाराची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. त्यासाठी आहारातील भेसळ व विचारांमधील प्रदूषण रोखण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :cancerकर्करोगIndiaभारत