शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

RBI च्या निर्णयामुळे ७ लाख ठेवीदारांचा मोठा तोटा; रुपी बँक ठेवीदार हक्क समितीचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 20:30 IST

बँकेचे ७ लाखांपेक्षा जास्त ठेवीदार असून त्यांचे मिळून काहीशे कोटी रूपये बँकेत अडकले

पुणे : गेली अनेक वर्षे आर्थिक अडचणीत असलेल्या रूपी बँकेचा परवाना अखेर भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला. २२ सप्टेंबरनंतर हा निर्णय लागू होईल. त्यानंतर बँकेला बँकिंग म्हणून काहीही व्यवसाय करता येणार नाही. बँकेचे ७ लाखांपेक्षा जास्त ठेवीदार असून त्यांचे मिळून काहीशे कोटी रूपये बँकेत अडकले आहेत.

ठेवीदार व कर्मचारी वर्गाने बँक दिवाळखोरीत काढून आम्हाला पैसे द्यावेत अशी मागणी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. आता बँकेच्या दिवाळखोरीच्या प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. बँकेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आला होता. त्यांनी तत्वत: मंजूरीही दिली होती, मात्र दरम्यानच्या काळात विमा ठेव सुरक्षा महांडळाच्या निर्णयानुसार ६४ हजार ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची ५ लाखापर्यंतची किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तितकी रक्कम देण्यात आली. ही रक्कम सुमारे ७०० कोटी रूपये इतकी आहे. त्यामुळे ज्या बँकेत विलिनीकरण होणार होते, त्या बँकेने प्रस्तावाला नकार दिला. त्यामुळे बँकेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

त्यानंतर ठेवीदार संघटना तसेच कर्मचारी संघटनांनी आरबीआयकडे बँकेकडे आता व्यवसाय करण्यासाठी किमान भांडवलही नाही अशी तक्रार केली होती. त्याच्या सुनावणीत २२ सप्टेंबरनंतर बँकेचा व्यवसायाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बँक दिवाळखोरीत काढण्याचा प्रक्रिया सुरू होईल असे बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर आरबीआयने बँकेवर प्रशासक मंडळ नियुक्त केले होते. सध्या सुधीर पंडित हे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष आहेत. बँकेचे ७ लाखांपेक्षा अधिक ठेवीदार आहेत. त्यांची मिळून १३०० कोटी रूपयांची रक्कम बँकेत अडकली आहे. त्यापैकी ६४ हजार जणांना ठेवीदार विमा सुरक्षा महामंडळाने कमाल ५ लाख रूपये व किमान त्यापेक्षा कमी ठेव असेल त्यांना मिळून ७०० कोटी रूपये दिले आहेत. रूपये ५ लाखांपेक्षा जास्त ठेव असलेल्या असंख्य ठेवीदारांचे अजूनही बँकेत ६०० कोटी रूपये अडकून पडले आहेत.

रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले 

रुपी बँक ठेवीदार हक्क समितीचे पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी यांनी रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय अनाकलनीय असल्याचे मत व्यक्त केले. या निर्णयामुळे आता बँकेत पडून असलेले ८०० कोटी रूपये ठेव सुरक्षा विमा महामंडळ काढून घेईल. त्यामुळे ठेवीदारांचा या निर्णयामुळे मोठा तोटा झाला असल्याचे कुलकर्णी म्हणाले. हा निर्णय घेऊन रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले आहे अशी टीका कुलकर्णी यांनी केली.

बँक दिवाळखोरीत काढण्याची प्रक्रिया सुरू 

बँक वाचवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू होते, मात्र त्याचा उपयोग झालेला दिसत नाही. २२ सप्टेंबरनंतर बँकिंग करता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर बँक दिवाळखोरीत काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. - विद्याधर अनासकर, नागरी सहकारी बँक फेडरेशन अध्यक्ष

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकRupee Bankरुपी बँकbankबँकMONEYपैसाGovernmentसरकार