शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
3
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
4
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
5
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
6
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
7
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
8
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
9
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
10
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
11
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
12
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
13
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
14
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
15
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
16
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
17
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
18
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
19
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...

RBI च्या निर्णयामुळे ७ लाख ठेवीदारांचा मोठा तोटा; रुपी बँक ठेवीदार हक्क समितीचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 20:30 IST

बँकेचे ७ लाखांपेक्षा जास्त ठेवीदार असून त्यांचे मिळून काहीशे कोटी रूपये बँकेत अडकले

पुणे : गेली अनेक वर्षे आर्थिक अडचणीत असलेल्या रूपी बँकेचा परवाना अखेर भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला. २२ सप्टेंबरनंतर हा निर्णय लागू होईल. त्यानंतर बँकेला बँकिंग म्हणून काहीही व्यवसाय करता येणार नाही. बँकेचे ७ लाखांपेक्षा जास्त ठेवीदार असून त्यांचे मिळून काहीशे कोटी रूपये बँकेत अडकले आहेत.

ठेवीदार व कर्मचारी वर्गाने बँक दिवाळखोरीत काढून आम्हाला पैसे द्यावेत अशी मागणी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. आता बँकेच्या दिवाळखोरीच्या प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. बँकेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आला होता. त्यांनी तत्वत: मंजूरीही दिली होती, मात्र दरम्यानच्या काळात विमा ठेव सुरक्षा महांडळाच्या निर्णयानुसार ६४ हजार ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची ५ लाखापर्यंतची किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तितकी रक्कम देण्यात आली. ही रक्कम सुमारे ७०० कोटी रूपये इतकी आहे. त्यामुळे ज्या बँकेत विलिनीकरण होणार होते, त्या बँकेने प्रस्तावाला नकार दिला. त्यामुळे बँकेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

त्यानंतर ठेवीदार संघटना तसेच कर्मचारी संघटनांनी आरबीआयकडे बँकेकडे आता व्यवसाय करण्यासाठी किमान भांडवलही नाही अशी तक्रार केली होती. त्याच्या सुनावणीत २२ सप्टेंबरनंतर बँकेचा व्यवसायाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बँक दिवाळखोरीत काढण्याचा प्रक्रिया सुरू होईल असे बँकिंग क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर आरबीआयने बँकेवर प्रशासक मंडळ नियुक्त केले होते. सध्या सुधीर पंडित हे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष आहेत. बँकेचे ७ लाखांपेक्षा अधिक ठेवीदार आहेत. त्यांची मिळून १३०० कोटी रूपयांची रक्कम बँकेत अडकली आहे. त्यापैकी ६४ हजार जणांना ठेवीदार विमा सुरक्षा महामंडळाने कमाल ५ लाख रूपये व किमान त्यापेक्षा कमी ठेव असेल त्यांना मिळून ७०० कोटी रूपये दिले आहेत. रूपये ५ लाखांपेक्षा जास्त ठेव असलेल्या असंख्य ठेवीदारांचे अजूनही बँकेत ६०० कोटी रूपये अडकून पडले आहेत.

रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले 

रुपी बँक ठेवीदार हक्क समितीचे पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी यांनी रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय अनाकलनीय असल्याचे मत व्यक्त केले. या निर्णयामुळे आता बँकेत पडून असलेले ८०० कोटी रूपये ठेव सुरक्षा विमा महामंडळ काढून घेईल. त्यामुळे ठेवीदारांचा या निर्णयामुळे मोठा तोटा झाला असल्याचे कुलकर्णी म्हणाले. हा निर्णय घेऊन रिझर्व्ह बँकेने ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले आहे अशी टीका कुलकर्णी यांनी केली.

बँक दिवाळखोरीत काढण्याची प्रक्रिया सुरू 

बँक वाचवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू होते, मात्र त्याचा उपयोग झालेला दिसत नाही. २२ सप्टेंबरनंतर बँकिंग करता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर बँक दिवाळखोरीत काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. - विद्याधर अनासकर, नागरी सहकारी बँक फेडरेशन अध्यक्ष

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकRupee Bankरुपी बँकbankबँकMONEYपैसाGovernmentसरकार