शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

उरुळी कांचन येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६६ टक्के मतदान; ५५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 19:55 IST

उरुळी कांचन ग्रामपंचायतीसाठी एकूण सहा प्रभागांमध्ये १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती.

उरुळीकांचन : उरुळी कांचन व परिसरातील ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ( दि. १५) मतदान झाले. सकाळी साडे सात ते साडे अकरा या वेळात २१ टक्के तर दीड वाजण्याच्या दरम्यान ४१ टक्के आणि साडे तीनच्या दरम्यान ५३ टक्केचा टप्पा ओलांडला होता. साडेपाच वाजता एकूण २५ हजार ४२७ मतदारांपैकी १६ हजार ८११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ६६ .११ टक्के मतदान नोंदवले गेले.

उरुळी कांचन ग्रामपंचायतीसाठी एकूण सहा प्रभागांमध्ये १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी प्रभाग क्रमांक चार मधून एक महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे १६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया प्रशासनाकडून राबवण्यात आली, यासाठी सुमारे ५५ जण आपले नशीब आजमावत होते, त्यांनी साम - दाम - दंड - भेद अशा सगळ्या प्रकाराने मतदारांशी संपर्क साधून मतदानात सहभागी होण्यासाठी जोराचा प्रचार व प्रयत्न केला होता. मात्र, आज या ५५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले असून ते १८ तारखेलाच उघड होऊन जनतेपुढे येईल. प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी स्वतंत्र आघाड्या अथवा युती करून निवडणुका लढवल्या होत्या. मागच्या निवडणुकीचे एकमेकांचे प्रतिस्पर्धी या निवडणुकीत एकत्र येऊन निवडणूक लढवत होते. त्यामुळे या निवडणुकीत नेमके काय होणार याची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला लागून राहिली आहे.

विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेत वय वर्ष शंभरच्या श्रीमती रंभाबाई मारुती कांचन यांनी सहभाग घेऊन आपले मत नोंदवले.दोन अल्पवयीन मुलांकडून मतदान करून घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचा प्रकार मतदान प्रक्रियेदरम्यान आढळून आला. परंतु मतदान प्रतिनिधीच्या द्वारे या दोघांनाही मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास मज्जाव केल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते. निवडणुक निर्णय अधिकारी व पोलिसांनी या प्रकाराची नोंद घेत खातरजमा करून या अल्पवयीन मुलांना त्यांची माहिती जमा करून घेऊन सोडून दिले.मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत पोलीस यंत्रणेने म्हणजे  ६ अधिकारी ४५ पोलिस कर्मचारी व एस आर पी एफ चे जवान यांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत मतदान पार पडले. शिंदवणे येथे 85 .54%, वळती येथे 85 टक्के, सोरतापवाडी येथे 75%, भवरापूर 90% असे परिसरातील ग्रामपंचायतीत मतदान झाले.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतVotingमतदान