शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कला घरघर; 56 कंपन्यांचं स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 11:46 IST

अनेक कंपन्या राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कला रामराम करणार

पुणे: वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी सुविधांचा अभाव यांच्यामुळे हिंजवडीमधील 56 कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून काढता पाय घेतला आहे. यामध्ये 6 बहुराष्ट्रीय आणि 50 लहान कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दोन मोठ्या कंपन्यांनी वाहतूक कोंडीला वैतागून बालेवाडी आणि खराडी परिसरात आपला मुक्काम हलवला आहे. यानंतर आता 56 कंपन्या हिंजवडीला रामराम करणार आहेत.राज्यातील सर्वात मोठं आयटी पार्क अशी हिंजवडीची ओळख आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि राष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं हिंजवडीत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून आयटी पार्कला घरघर लागली आहे. ऑफिसला ये-जा करताना करावा लागणारा वाहतूक कोंडीचा सामना आणि पायाभूत सुविधांचा अभाव यांच्यामुळे अनेक कंपन्या हिंजवडीतून इतरत्र स्थलांतरित होत आहेत. हिंजवडीत कार्यालयात पोहोचण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. तितकाच वेळ ऑफिसमधून घरी जाण्यासाठी लागतो. त्यामुळे दिवसातील किमान चार तास वाहतूक कोंडीत जातात. यामुळे अनेक कंपन्यांनी हिंजवडीला रामराम केला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये आयटी पार्कमधील दोन महत्त्वाच्या कंपन्या बालेवाडी आणि खराडीत स्थलांतरित झाल्या. यानंतर आता आणखी सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडीतून काढता पाय घेतला आहे. तर आणखी 50 लहान कंपन्या वाकड, बाणेर, बालेवाडी आणि पुण्यातील अन्य भागांमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कला घरघर लागली आहे.  

टॅग्स :hinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञान