शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

टनाला ५०० रुपये अनुदान द्यावे

By admin | Updated: January 19, 2015 23:25 IST

सध्या साखर कारखानदारी प्रचंड आर्थिक संकटात सापडली असल्याने एफआरपीप्रमाणे उसाला दर देणे अशक्य झाले आहे.

बावडा : सध्या साखर कारखानदारी प्रचंड आर्थिक संकटात सापडली असल्याने एफआरपीप्रमाणे उसाला दर देणे अशक्य झाले आहे. मात्र, राज्य व केंद्र सरकारने साखर कारखान्यांना प्रत्येक टनामागे ५०० रुपये अनुदान दिल्यास ते शक्य होईल, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ११ मेगावॉट क्षमतेचा सहवीज प्रकल्प कारखान्याच्या चालू गळीत हंगामात कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पातून उत्पादित झालेल्या १ कोटी ११ लाख ११ हजार १११ व्या वीज युनिट एक्स्पोर्टचे पूजन एनसीडीसी दिल्लीचे मुख्य संचालक ए. सर्वदेवा यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी पाटील बोलत होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, की साखर कारखानदारी टिकवायची आहे, पुढे न्यायची आहे. त्यामुळे ती उत्तम चालली पाहिजे. यावर शेतकऱ्यांचे संसार अवलंबून असून, उसाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाने धाडसी निर्णय घेणे गरजेचे आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यात व केंद्रात झपाट्याने निर्णय घेतले जायचे. दुर्दैवाने या सरकारच्या काळात आता तसे होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.सर्वदेवा म्हणाले, की या साखर कारखान्याने अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले आहेत. हा वीज प्रकल्पही अतिशय थोड्या कालावधीत व बचत करून उत्कृष्टरीत्या राबविला आहे. त्यामुळे या कारखान्यांच्या आणखीन नवीन प्रकल्पांना एनसीडीसी सदैव मदत करेल. कार्यकारी संचालक बी. बी. नवले यांनी स्वागत, तर उपाध्यक्ष विलास वाघमोडे यांनी प्रास्ताविक केले. बारामती वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अशोक इरवाडकर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे दाणी यांची भाषणे झाली. या वेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक मंडळ, शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तानाजी नाईक यांनी आभार मानले. (वार्ताहर)४साखरेचे जर दर वाढणार नसतील, तर साखरेबरोबरच इतर उत्पादनांचा विचार कारखान्यांना करावा लागणार आहे. तरच ही कारखानदारी टिकू शकेल.४ आम्ही ब्राझील देशासह इतर साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून ‘बी हेवी’ मोलासेस उत्पादनाची माहिती घेत आहोत. ४हे प्रकल्प इतर देशांत यशस्वी झाले असून, त्याबाबत अभ्यास करून भविष्यात हा प्रकल्प उभारण्याचे सूतोवाच हर्षवर्धन पाटील यांनी केले.४आघाडी सरकारच्या काळात राज्यात व केंद्रात झपाट्याने निर्णय घेतले जायचे.