शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मसाप निवडणुकीसाठी ५० टक्के मतदान

By admin | Updated: March 13, 2016 01:48 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत सुमारे ५,४८९ सभासदांनी मतदान केले. दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ११,३३६ मतदारांपैकी

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत सुमारे ५,४८९ सभासदांनी मतदान केले. दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ११,३३६ मतदारांपैकी अर्ध्याअधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बारकोड आणि ओळखपत्र या निकषांवर पात्र मतदार ठरविण्यात येणार असून, १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अधिकृत निकाल जाहीर केले जातील, अशी माहिती या निवडणुकीचे मुख्य अधिकारी अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी (दि. १४) सायंकाळी ७ वाजेपर्यंत मसापच्या कार्यालयात मतपत्रिका स्वीकारण्यात येणार आहेत. दि. १५ रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजेपर्यंत अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल. शनिवारपर्यंत पुणे शहरातील २,९४८ मतदारांपैकी १,०६०, तर पुणे जिल्ह्यातील १,५९६ मतदारांपैकी ८७३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक सुरुवातीपासूनच दुबार नावे, बोगस मतदान, मृत व्यक्तींची नावे अशा विविध कारणांनी चर्चेत राहिली आहे. प्रारंभीचे काही दिवस थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर सभासदांचा मतदानाचा ओघ हळूहळू वाढला. काही सभासदांना मतपत्रिका न मिळाल्याने त्यांनी दुबार मतपत्रिकांसाठी अर्ज केला होता. अर्ज केलेल्या ४१० पैकी ३५३ पात्र मतदारांना दुबार मतपत्रिका देण्यात आल्याचे परदेशी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मृत व्यक्तींच्या नावे अथवा बोगस मतदानाचे प्रमाण नगण्य असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. निवडणुकीसाठी परदेशी यांच्यासह अ‍ॅड. सुभाष किवडे, प्रा. सुधाकर जाधवर यांनी काम पाहिले. ठाणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये निवडणूक बिनविरोध पार पडली. पुणे शहर, पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, कोकण या विभागांमध्ये मतदान प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी बारकोड पद्धती, ओळखपत्राची सक्ती, या पद्धतीने राबविल्याने मतदारांनी समाधान व्यक्त केले. >प्रथमच बारकोडमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रथमच बारकोड पद्धत वापरण्यात आली आहे. मतमोजणीदरम्यान सुरुवातीला बारकोड मॅच करणे आणि ओळखपत्रे तपासणे या निकषांवर पडताळणी होणार आहे.सुरुवातीचा तास-दीड तास ही पडताळणी झाल्यानंतर पात्र मतपत्रिकांच्या प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात होईल. ओळखपत्र नसलेल्या, मृत व्यक्तींच्या नावाने आलेल्या तसेच चारही बाजूंनी चिकटपट्टी लावलेल्या मतपत्रिका बाद ठरविल्या जाणार आहेत. त्यामुळे बोगस मतदानाचे प्रमाण नगण्य असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मतपत्रिकांबाबत आतापर्यंत झालेले घोळ लक्षात आणून दिले असता, इतक्या वर्षांच्या सवयी कशा बदलणार, असा सवाल करून त्यांनी कोपरखळी मारली.बोगस मतदानाला आळा घातला जावा, यासाठी मतदान प्रक्रिया आणखी पारदर्शी करण्याकडे लक्ष देण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. डॉ. न. म. जोशी यांच्या नावाने बोगस मतदान झाल्याने मसाप निवडणूक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना याबाबतची अधिक माहिती निकालादिवशी देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.