शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मसाप निवडणुकीसाठी ५० टक्के मतदान

By admin | Updated: March 13, 2016 01:48 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत सुमारे ५,४८९ सभासदांनी मतदान केले. दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ११,३३६ मतदारांपैकी

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत सुमारे ५,४८९ सभासदांनी मतदान केले. दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ११,३३६ मतदारांपैकी अर्ध्याअधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बारकोड आणि ओळखपत्र या निकषांवर पात्र मतदार ठरविण्यात येणार असून, १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अधिकृत निकाल जाहीर केले जातील, अशी माहिती या निवडणुकीचे मुख्य अधिकारी अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी (दि. १४) सायंकाळी ७ वाजेपर्यंत मसापच्या कार्यालयात मतपत्रिका स्वीकारण्यात येणार आहेत. दि. १५ रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजेपर्यंत अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल. शनिवारपर्यंत पुणे शहरातील २,९४८ मतदारांपैकी १,०६०, तर पुणे जिल्ह्यातील १,५९६ मतदारांपैकी ८७३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक सुरुवातीपासूनच दुबार नावे, बोगस मतदान, मृत व्यक्तींची नावे अशा विविध कारणांनी चर्चेत राहिली आहे. प्रारंभीचे काही दिवस थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर सभासदांचा मतदानाचा ओघ हळूहळू वाढला. काही सभासदांना मतपत्रिका न मिळाल्याने त्यांनी दुबार मतपत्रिकांसाठी अर्ज केला होता. अर्ज केलेल्या ४१० पैकी ३५३ पात्र मतदारांना दुबार मतपत्रिका देण्यात आल्याचे परदेशी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मृत व्यक्तींच्या नावे अथवा बोगस मतदानाचे प्रमाण नगण्य असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. निवडणुकीसाठी परदेशी यांच्यासह अ‍ॅड. सुभाष किवडे, प्रा. सुधाकर जाधवर यांनी काम पाहिले. ठाणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये निवडणूक बिनविरोध पार पडली. पुणे शहर, पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, कोकण या विभागांमध्ये मतदान प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी बारकोड पद्धती, ओळखपत्राची सक्ती, या पद्धतीने राबविल्याने मतदारांनी समाधान व्यक्त केले. >प्रथमच बारकोडमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रथमच बारकोड पद्धत वापरण्यात आली आहे. मतमोजणीदरम्यान सुरुवातीला बारकोड मॅच करणे आणि ओळखपत्रे तपासणे या निकषांवर पडताळणी होणार आहे.सुरुवातीचा तास-दीड तास ही पडताळणी झाल्यानंतर पात्र मतपत्रिकांच्या प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात होईल. ओळखपत्र नसलेल्या, मृत व्यक्तींच्या नावाने आलेल्या तसेच चारही बाजूंनी चिकटपट्टी लावलेल्या मतपत्रिका बाद ठरविल्या जाणार आहेत. त्यामुळे बोगस मतदानाचे प्रमाण नगण्य असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मतपत्रिकांबाबत आतापर्यंत झालेले घोळ लक्षात आणून दिले असता, इतक्या वर्षांच्या सवयी कशा बदलणार, असा सवाल करून त्यांनी कोपरखळी मारली.बोगस मतदानाला आळा घातला जावा, यासाठी मतदान प्रक्रिया आणखी पारदर्शी करण्याकडे लक्ष देण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. डॉ. न. म. जोशी यांच्या नावाने बोगस मतदान झाल्याने मसाप निवडणूक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना याबाबतची अधिक माहिती निकालादिवशी देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.