शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

केंद्राच्या विविध योजनांचा लाभ महाराष्ट्राला मिळावा यासाठी ५ सदस्यीय समिती : सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 16:53 IST

केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला घेता यावा यासाठी पाच सादस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, असे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात राज्यस्तरीय प्रारूप आराखाडा बैठक पुढील २ महिन्यात सर्व जिल्ह्यांना देण्यात आलेला १०० टक्के निधी वापरणे शक्य : मुनगंटीवार

पुणे : केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला घेता यावा यासाठी पाच सादस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्राच्या योजनांचे योग्य व प्रभावी प्रस्ताव वेळेत तयार केले जातील, असे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.राज्याच्या नियोजन विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रारूप आराखाडा बैठक सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात घेण्यात आली. या बैठकीस अर्थराज्य मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पुणे विभागिय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुण्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.शेतकरी कर्जमाफी आणि वित्तीय तूट विचारात घेऊन शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीमध्ये शासनाने ३० टक्के निधी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शासनाने ही कपात मागे घेतली आहे, असे मुनगंटीवार यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे पुढील दोन महिन्यात सर्व जिल्ह्यांना देण्यात आलेला १०० टक्के निधी वापरणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्राच्या योजनांसाठी राखून ठेवल्या जाणाऱ्या निधीच्या टक्केवारीमध्येसुद्धा कपात केली जाणार आहे.

केंद्राच्या विविध योजनांचा लाभ महाराष्ट्राला मिळावा यासाठी ५ सदस्यीय समिती : सुधीर मुनगंटीवार

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारArun Jaitleyअरूण जेटलीgirish bapatगिरीष बापटPuneपुणे