शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

पुणे जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायतींना नकोय वित्त आयोगाचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 13:55 IST

४६ पैकी १५ ग्रामपंचायतींना निधी खर्च करण्यात अडचणी...

पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी वित्त आयोगातून जिल्ह्याला २५५ कोटींचा निधी मिळाला. मात्र, ४६ ग्रामपंचायतींनी अद्यापही निधी खर्च केला नसल्याचे समोर आले. यासंदर्भात दोनवेळा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित ग्रामपंचायतींच्या सुनावण्या घेतल्या तरीही त्यामध्ये फरक पडला नाही. त्यामुळे आता अशा ग्रामपंचायतींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे. दरम्यान, काही तांत्रिक कारणांमुळे ४६ पैकी १५ ग्रामपंचायतींना निधी खर्च करण्यात अडचणी येत आहेत.

१५ व्या वित्त आयोग निधीच्या विनियोगातून गावांमध्ये दर्जेदार लोकाभिमुख सुविधांची निर्मिती करण्यात यावी, अशी शासनाला अपेक्षा आहे. या निधीतून गावपातळीवर पाण्याचा निचरा आणि पाणीसाठा व्यवस्थापन, मुलांचे लसीकरण व कुपोषण रोखणे, जोडरस्ते आणि ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल, स्मशानभूमीचे बांधकाम, स्मशानभूमीसाठी जमीन अधिग्रहण, एलईडी पथदिवे व सौर पथदिव्यांचे बांधकाम व दुरुस्ती, ग्रामपंचायतींमध्ये पुरेशी व उच्च बँडविड्थसह वाय-फाय डिजिटल नेटवर्क सेवा, सार्वजनिक वाचनालय, मुलांसाठी उद्याने, मनोरंजन सुविधा, खेळाचे मैदान, क्रीडा व शारीरिक फिटनेस उपकरणे, ग्रामीण आठवडे बाजार, मूलभूत वीज, पाणी, कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट, सुका व ओला कचरा व्यवस्थापन उपकरणे, नैसर्गिक आपत्ती, साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावावेळी मदतकार्य आदी कामे करावयाची आहेत.

जिल्ह्यात १ हजार ३८५ ग्रामपंचायती असून, त्यांना १५व्या वित्त आयोगातून सुमारे २५५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. बहुतांश ग्रामपंचायतींनी त्या निधीच्या माध्यमातून कामाला सुुरुवातदेखील केली आहे. मात्र, साधारण ४६ ग्रामपंचायतींनी अद्यापही एक रुपयाचाही खर्च केला नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासंदर्भात दोन वेळा सुनावणी झाली पण तरीही त्यांच्या कामकाजात फरक पडत नाही. त्यामुळे आता खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर ३९ (१) अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुष प्रसाद यांनी दिली. दरम्यान, ४६ पैकी १५ ग्रामपंचायतींना तांत्रिक अडचणींमुळे निधी खर्च करता येत नसल्याचेही समोर आले आहे. अशा ग्रामपंचायतींना काही दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या

बारामती- ८

भोर- ५

हवेली- १

इंदापूर- ३

जुन्नर- ८

खेड- ७

मुळशी- ३

पुरंदर- ८

शिरुर- १

वेल्हे- २

एकूण- ४६

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायत