शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी ३३.७१ कोटींचा निधी            

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 19:20 IST

राज्यात भूपृष्टावर व भूर्भात पाण्याची उपलब्धता वाढावी,पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा; या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केल्या जाणा-या कामांसाठी राज्य शासनाने पुणे विभागाला ३३.७१ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे निधी आभावी काही काळ प्रलंबित असणा-या कामांना गती मिळणार आहे.

पुणे: राज्यात भूपृष्टावर व भूर्भात पाण्याची उपलब्धता वाढावी,पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा; या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केल्या जाणा-या कामांसाठी राज्य शासनाने पुणे विभागाला ३३.७१ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे निधी आभावी काही काळ प्रलंबित असणा-या कामांना गती मिळणार आहे.

राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१८-१९ मध्ये पुणे विभागातील कोल्हापूर,सातारा,सांगली,सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यातील ६०२ गावात ११ हजार ६९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यातील ८ हजार ४४६ कामे पूर्ण झाली असून १ हजार ८२५ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २१३ गावांमध्ये ३ हजार ८८१ कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यातील २ हजार ७६५ कामे पूर्ण झाली आहेत.तर जिल्ह्यातील १ हजार ४ कामे प्रगतीपथावर आहेत. शासनाकडून पुणे जिल्ह्यातील कामांसाठी ११.९२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर, खोल सलग समपातळी चर ,शेततळे व वनतळे, अनघड दगडाचे बांध, माती नाला बांध व दुरूस्ती, सिमेंट बंधारा, पाझर तलाव दुरूस्ती, नाला खोलीकरण व रुंदीकरंण, विहिर बोअर पुनर्भरण, तलावातील व धरणातील गाळ काढणे आदी कामे केली जात आहेत. त्यामुळे भूपृष्टावरील व भूगर्भातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे.

पुणे विभागात केल्या जाणा-या जलयुक्त शिवारच्या कामांमुळे २६ हजार ८१४ टीसीएम पाणीसाठा निर्माण निर्माण होईल, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यातही पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८ हजार २८८ टीसीएम, सोलापूर जिल्ह्यात ८ हजार १४१ टीसीएम, सांगली जिल्ह्यात 6 हजार ७८३ टीसीएम, साता-यात २ हजार १२६ आणि कोल्हापूरमध्ये १ हजार ४७७ टीसीएम पाणीसाठा वाढणार आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारFarmerशेतकरी