शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी ३३.७१ कोटींचा निधी            

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 19:20 IST

राज्यात भूपृष्टावर व भूर्भात पाण्याची उपलब्धता वाढावी,पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा; या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केल्या जाणा-या कामांसाठी राज्य शासनाने पुणे विभागाला ३३.७१ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे निधी आभावी काही काळ प्रलंबित असणा-या कामांना गती मिळणार आहे.

पुणे: राज्यात भूपृष्टावर व भूर्भात पाण्याची उपलब्धता वाढावी,पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा; या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केल्या जाणा-या कामांसाठी राज्य शासनाने पुणे विभागाला ३३.७१ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे निधी आभावी काही काळ प्रलंबित असणा-या कामांना गती मिळणार आहे.

राज्य शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१८-१९ मध्ये पुणे विभागातील कोल्हापूर,सातारा,सांगली,सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यातील ६०२ गावात ११ हजार ६९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यातील ८ हजार ४४६ कामे पूर्ण झाली असून १ हजार ८२५ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २१३ गावांमध्ये ३ हजार ८८१ कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यातील २ हजार ७६५ कामे पूर्ण झाली आहेत.तर जिल्ह्यातील १ हजार ४ कामे प्रगतीपथावर आहेत. शासनाकडून पुणे जिल्ह्यातील कामांसाठी ११.९२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर, खोल सलग समपातळी चर ,शेततळे व वनतळे, अनघड दगडाचे बांध, माती नाला बांध व दुरूस्ती, सिमेंट बंधारा, पाझर तलाव दुरूस्ती, नाला खोलीकरण व रुंदीकरंण, विहिर बोअर पुनर्भरण, तलावातील व धरणातील गाळ काढणे आदी कामे केली जात आहेत. त्यामुळे भूपृष्टावरील व भूगर्भातील पाणी साठ्यात वाढ होणार आहे.

पुणे विभागात केल्या जाणा-या जलयुक्त शिवारच्या कामांमुळे २६ हजार ८१४ टीसीएम पाणीसाठा निर्माण निर्माण होईल, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यातही पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८ हजार २८८ टीसीएम, सोलापूर जिल्ह्यात ८ हजार १४१ टीसीएम, सांगली जिल्ह्यात 6 हजार ७८३ टीसीएम, साता-यात २ हजार १२६ आणि कोल्हापूरमध्ये १ हजार ४७७ टीसीएम पाणीसाठा वाढणार आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारFarmerशेतकरी