शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

महाराष्ट्रात ३१ टक्के परकीय गुंतवणूक - हर्षदीप कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 03:14 IST

‘‘देशात होणा-या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत आहे. कोणी काहीही म्हणू दे, आपले राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर आहे,’’

पुणे : ‘‘देशात होणाºया एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत आहे. कोणी काहीही म्हणू दे, आपले राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर आहे,’’ असे मत राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केले.टाटा अ‍ॅडमायरर ग्रुपतर्फे आज भारतरत्न जे. आर. डी. टाटा स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कांबळे बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालक मंत्र गिरीश बापट, शहराचे माजी पोलीस सह-आयुक्त अशोक धिवरे आदी उपस्थित होते.कांबळे म्हणाले, ‘‘राज्यात ५४३ मोठे प्रकल्प आले आहेत. पुण्यातही नवीन उद्योगांची भरभराट होत आहे. राज्यातील पूरक धोरणांमुळे गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. कोणी काही म्हटले तरीसुद्धा वास्तव हेच आहे, की देशात होणाºया एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. एक खिडकी योजनेच्या धर्तीवर चालणाºया ‘मैत्री’ उपक्रमाची अंमलबजावणी आता आम्ही जिल्हा स्तरावर करणार आहोत.’’शहरांमध्ये होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी उद्योग-कंपन्यांच्या जवळच निवासी क्षेत्र विकसित करण्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत. पुण्यात हिंजवडी भागातील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी अशाच उपायांचा अवलंब करावा, अशी सूचना राज्य सरकारला केली आहे, असेही कांबळे यांनी सांगितले.बापट यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद देव यांनी प्रास्ताविक केले.आधुनिक भारताच्या जडणघडणीत टाटांचे स्थान अढळ आणि महत्त्वाचे आहे. कर्मचारी कल्याणाचा विचार जे. आर. डी. टाटा यांनी रुजवला. आज अनेक कामगार संघटना ज्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, त्या अनेक कामगारहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी टाटा समूहाने पहिल्यांदा केली आहे. केवळ उद्योगवाढ आणि कर्मचारीहित एवढेच नव्हे, तर टाटा यांनी सामाजिक बांधिलकीसुद्धा जपली होती. त्यांच्या यशाचे गमक हे त्यांच्या शिस्तप्रिय वृत्तीत होते. - सुभाष देसाई,उद्योगमंत्री

टॅग्स :Puneपुणे