शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

न्यायालयातच अडकली ३०९ कोटींची थकबाकी

By admin | Updated: April 14, 2017 04:31 IST

देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना न्यायालयात फेऱ्या मारायला लावून मोबाईल कंपन्यांनी त्यांचा काही हजार कोटी रुपयांचा कर थकवला आहे. एकट्या पुणे महापालिकेचीच

पुणे : देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना न्यायालयात फेऱ्या मारायला लावून मोबाईल कंपन्यांनी त्यांचा काही हजार कोटी रुपयांचा कर थकवला आहे. एकट्या पुणे महापालिकेचीच या कंपन्यांकडे ३०९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर वसूल करता येईल, असा निकाल दिल्यानंतरही सर्व कंपन्या एकत्रितपणे पुन्हा न्यायालयात गेल्यामुळे महापालिकांचा हातात आलेला घास गेला आहे. येत्या २० एप्रिलला या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे.महापालिका हद्दीत या कंपन्यांनी बांधलेल्या टॉवरवर महापालिका कर लावत असते. केंद्र सरकारच्या धोरणानुसार असा कर लावताच येणार नाही, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यावर त्यांनी महापालिकेच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला. सुरुवातीला पुणे व अन्य काही महापालिकांच्या हद्दीत असलेल्या टॉवरसंबंधाने दाखल केलेल्या या दाव्यांना लवकरच सर्व कंपन्यांनी एकत्र येऊन एकच स्वरूप दिले. त्यात बराच वेळ गेला. त्यानंतर तब्बल ३ वर्षे या दाव्याच्या फक्त तारखाच पडत होत्या.दावाच दाखल केल्यामुळे महापालिकांना या कंपन्यांकडून कसलीही वसुली करता येत नव्हती. तरीही पुणे महापालिकेने काही कंपन्यांकडून सुमारे ८० कोटी रुपयांची वसुली केली आहे. अन्य काही महापालिकांनीही याच प्रकारे काही कोटी रुपयांची वसुली केली. या काळात न्यायालयात सातत्याने तारखा पडत होत्या; निकाल मात्र काहीच लागत नव्हता. कंपन्यांनाही तेच हवे होते. त्यामुळे पुणे महापालिकेत तत्कालीन माजी उपमहापौर आबा बागुल यांनी कंपन्यांकडून करवसुली न करता त्यांचे टॉवर ज्यांच्या मिळकतीवर उभे केले आहेत, त्या मिळकतधारकांकडून कर वसूल करावा, अशी मागणी केली. त्याप्रमाणे घरमालकांना नोटिसाही पाठवण्यात आल्या; मात्र त्यांनी जागा भाडेतत्त्वावर देताना कराची बाजू कंपन्यांवर टाकली असल्याचे लेखी करारच महापालिकेला सादर केले.दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने या कंपन्यांकडून महापालिकेला करवसुली करता येईल, असा निकाल दिला. करवसुलीसाठी कंपन्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली. काही कंपन्यांच्या टॉवरना सीलही ठोकले. मात्र, इतकी मोठी थकबाकी आम्हाला देता येणे शक्य नाही; मागील थकबाकी माफ करावी, अशी मागणी करणारी याचिका कंपन्यांनी पुन्हा एकत्रितपणे न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आता २० एप्रिल रोजी सुनावणी होईल. (प्रतिनिधी)- टॉवर बांधण्यासाठी कंपन्यांना महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते. अशी परवानगी न घेताच अनेक कंपन्यांनी टॉवर बांधले असल्याचेही अनेक महापालिकांच्या निदर्शनास आले आहे. यावरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. तो दंड जमा करून कंपन्यांनी कर मात्र थकवला आहे.