शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

डिजिटल चोरट्यांकडून ३०० कोटींवर डल्ला , ५७ हजारांवर नागरिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 05:06 IST

वाढत्या ई-व्यवहारांमुळे चोरीदेखील डिजिटल झाली आहे. चोरट्यांनी नागरिकांच्या खात्यातून अवघ्या दोन वर्षांतच सुमारे ३०० कोटी रुपये लांबविले असल्याची माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून देण्यात आली आहे. देशातील ५७ हजार ४११ नागरिकांना या ई-चोरीचा फटका बसला आहे.

-विशाल शिर्केपुणे : वाढत्या ई-व्यवहारांमुळे चोरीदेखील डिजिटल झाली आहे. चोरट्यांनी नागरिकांच्या खात्यातून अवघ्या दोन वर्षांतच सुमारे ३०० कोटी रुपये लांबविले असल्याची माहिती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून देण्यात आली आहे. देशातील ५७ हजार ४११ नागरिकांना या ई-चोरीचा फटका बसला आहे.ई-अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारकडून चालना देण्यात येत आहे. मात्र, त्या प्रमाणात क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे होणाºया व्यवहारांची सुरक्षितता तितकीशी वाढली नसल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे केंद्रीय माहिती अधिकारी व्ही. जी. शेखर यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत तब्बल ५७ हजार ४११ नागरिकांना फसविण्यात आले. तब्बल २९० कोटी ३४ लाख ७२ हजार रुपये नागरिकांच्या खात्यातून चोरट्यांच्या खिशात गेले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती समोर आणली आहे. स्किमर लावून डेबिट कार्डचे क्लोन करणे, क्रेडिट आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळवून पैसे लांबविणे अशा घटनांचा समावेश आहे.कार्ड फसवणुकीच्या घटनाई-व्यवहारांची सुरक्षा अधिक कडक केली पाहिजे. आधार जोडणीमुळे खातेदाराच्या बोटांच्या ठशांसह संपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. कार्डद्वारे होणाºया व्यवहारांत खातेदाराचे ठसे, तसेच खातेदाराच्या मोबाइल क्रमांकावरील गोपनीय क्रमांक ग्राह्य धरला जावा.- विजय सागर, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमcrimeगुन्हे