शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

लोकन्यायालयात ३० हजार दावे निकाली : पी. आर. अष्टुरकर; २ हजार ३८१ प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:03 IST

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि. १०) आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात ३० हजार ४१५ दावे तडजोडीअंती निकाली काढण्यात आले.

ठळक मुद्दे१० फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे करण्यात आले होते आयोजन३० हजार ४१५ दावे काढण्यात आले निकाली

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि. १०) आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात ३० हजार ४१५ दावे तडजोडीअंती निकाली काढण्यात आले. त्यात २८ हजार ३३४ दावे दाखलपूर्व असून, उर्वरित २ हजार ३८१ प्रकरणे प्रलंबित दाव्यांची आहेत. या प्रकरणांमध्ये १८ कोटी, ४१ लाख, ५७ हजार, ४६४ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली असल्याची माहिती विधी सेवाचे सदस्य सचिव पी. आर. अष्टुरकर यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यात तडजोडयोग्य फौजदारी, धनादेश बाऊन्स, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, बँकेच्या वसुली केसेस, कामगार वाद, वीज बिल, पाणीपट्टी, वैवाहिक वाद, जमिनिचे वाद, सेवासंबंधी आणि महसूलविषयक असे एकूण ६८ हजार ७५३ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये ५५ हजार ५०९ दाखलपूर्व आणि १३ हजार २४४ प्रलंबित दावे होते. त्यापैकी ३० हजार ४१५ दावे निकाली काढण्यात आले आहे. दाखलपूर्व दाव्यामध्ये १० कोटी, १३ लाख, २७ हजार, २६४ आणि प्रलंबित दाव्यामध्ये ८ कोटी, २८ लाख, ३० हजार, २०० अशी एकुण १८ कोटी, ४१ लाख, ५७ हजार, ४६४ रुपयांची नुकसानभरपाई दिल्याची माहिती अष्टुरकर यांनी दिली. 

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे