शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

DSK यांची २७६ खाती गोठविली; तब्बल ३३५ स्थावर मालमत्ता आणि ४६ वाहने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 09:41 IST

या गुन्ह्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या तीन मालमत्ता वगळण्यात आल्या आहेत...

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या आत्तापर्यंत ३३५ स्थावर मालमत्ता आणि डीएसके यांच्याशी संबंधित विविध कंपन्या व खासगी वापराची ४६ वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच डीएसके, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कंपन्यांच्या नावाने असलेली २७६ खाती गोठविण्यात आली आहेत. जप्तपैकी १३ वाहनांचा लिलाव करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई उच्च न्यायालयात नुकतेच दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे.

या गुन्ह्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या तीन मालमत्ता वगळण्यात आल्या आहेत. याबाबत विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोंढवा, फुरसुंगी आणि धायरी येथील स्थावर मालमत्ता जप्तीमधून वगळण्यात आल्या. डीएसके यांच्या आणखी १९ मालमत्ता आढळून आल्या आहेत. त्या जप्त करण्याबाबतचा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविण्यात आला आहे.

डीएसके, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या कंपन्यांच्या नावाने असलेली २७६ खाती गोठविली असून, या खात्यांमधील १२ कोटी नऊ लाख ७४ हजार ७१५ रुपये न्यायालयात जमा केले आहेत. या रकमेतून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी काही प्रमाणात परत मिळाव्यात, अशी मागणी ठेवीदारांनी न्यायालयात केली आहे. अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

या प्रकरणात राज्य सरकारने लक्ष घालून डीएसके यांचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करून ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठीची याचिका ठेवीदारांच्या वतीने ॲड. चंद्रकांत बीडकर यांनी न्यायालयात केली आहे. त्याच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

दरम्यान, पैसे परत मिळावेत म्हणून ठेवीदारांकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे.

या गुन्ह्यातील सर्व आरोपींना जामीन मिळाला असून, ते कारागृहातून बाहेर आले आहेत. मात्र ठेवीदारांना अद्याप कोणताच दिलासा मिळालेला नाही. या सर्वांचा विचार करून न्यायालयाने ठेवीदारांच्या हिताचा विचार करावा, यासाठी याचिका दाखल केली आहे.

- ॲड. चंद्रकांत बीडकर

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड