शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम केला २५ टक्के कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

पुणे : संपूर्ण जगामध्ये कोविड-१९चा प्रादुर्भाव झाला आहे. भारतात देखील त्याचा माेठा परिणाम झाला. केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी ...

पुणे : संपूर्ण जगामध्ये कोविड-१९चा प्रादुर्भाव झाला आहे. भारतात देखील त्याचा माेठा परिणाम झाला. केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च २०२० पासून राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवली. साधरणपणे जूनमध्ये शैक्षणिक वषे सुरू करण्यात येते. मात्र, २०२१-२२ मध्ये देखील नेहमीप्रमाणे शाळा सुरू करता आल्या नाहीत. परिणामी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे शासनाने पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्च २०२० पासून सुरू झालेला कोरोना प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. एप्रिल-मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणखी बिकट परिस्थिती निर्माण झाली. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अद्यापही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. २०२१-२२ चे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र, अद्यापही राज्यात सर्व जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. सन २०२०-२१ प्रमाणेच २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

-----------------------

५० टक्के शुल्क कपात का केली नाही

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अभ्यासक्रमात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अभिनंदनीय आहेच. पण आज कित्येक पालकांची आर्थिक स्थिती दयनिय आहे, त्यात शाळा प्रशासनाकडून उकळली जात असणारी भरमसाठ फी पालक भरू शकत नाहीत. यामुळे अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. यास सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार असेल. काही शिक्षण सम्राटांच्या भल्यासाठी आज शुल्क कपात करण्याचा निर्णय झालेला नाही. अभ्यासक्रमासोबत जर ५० टक्के शुल्क कपातीचा निर्णय घेतला असता तर गायकवाड यांचे मनापासून अभिनंदन केले असते.

- कल्पेश यादव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, शहराध्यक्ष