शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम केला २५ टक्के कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

पुणे : संपूर्ण जगामध्ये कोविड-१९चा प्रादुर्भाव झाला आहे. भारतात देखील त्याचा माेठा परिणाम झाला. केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी ...

पुणे : संपूर्ण जगामध्ये कोविड-१९चा प्रादुर्भाव झाला आहे. भारतात देखील त्याचा माेठा परिणाम झाला. केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार मार्च २०२० पासून राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवली. साधरणपणे जूनमध्ये शैक्षणिक वषे सुरू करण्यात येते. मात्र, २०२१-२२ मध्ये देखील नेहमीप्रमाणे शाळा सुरू करता आल्या नाहीत. परिणामी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे शासनाने पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्च २०२० पासून सुरू झालेला कोरोना प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. एप्रिल-मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आणखी बिकट परिस्थिती निर्माण झाली. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. अद्यापही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. २०२१-२२ चे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र, अद्यापही राज्यात सर्व जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. सन २०२०-२१ प्रमाणेच २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

-----------------------

५० टक्के शुल्क कपात का केली नाही

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अभ्यासक्रमात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अभिनंदनीय आहेच. पण आज कित्येक पालकांची आर्थिक स्थिती दयनिय आहे, त्यात शाळा प्रशासनाकडून उकळली जात असणारी भरमसाठ फी पालक भरू शकत नाहीत. यामुळे अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. यास सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार असेल. काही शिक्षण सम्राटांच्या भल्यासाठी आज शुल्क कपात करण्याचा निर्णय झालेला नाही. अभ्यासक्रमासोबत जर ५० टक्के शुल्क कपातीचा निर्णय घेतला असता तर गायकवाड यांचे मनापासून अभिनंदन केले असते.

- कल्पेश यादव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, शहराध्यक्ष