शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विजेची ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू तर २ जण गंभीर, जुन्नर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 18:27 IST

गोठ्याला लागलेल्या आगीत २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत....

जुन्नर (पुणे) : तालुक्यातील गोद्रे येथे जोरदार वादळी वाऱ्यात विजेची ठिणगी पडून घराला आणि गोठ्याला लागलेल्या आगीत २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथील भिमाजी रेंगडे यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. भिमाजी रेंगडे यांच्या घराशेजारील गवतावर विजेची ठिणगी पडल्याने आग लागली असल्याचे समजते. जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे पसरलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले आणि घराला आग लागली. घरात असलेल्या भीमा बुधा रेंगडे व त्यांच्या पत्नी फसाबई यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. परंतु जोरदार वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली व घराशेजारी असलेल्या गोठ्यासदेखील आग लागली. घर आणि गोठ्यात जनावरे होती. आगीच्या तीव्रतेमुळे जनावरांना बाहेर काढण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही. परिणामी आगीत २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला.

आगीच्या झळा बसल्याने भिमाजी रेंगडे आणि फसाबई रेंगडे हे देखील भाजले. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आगीमुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे असून घरातील चीज वस्तूंबरोबरच अन्न धान्यांचा साठादेखील जळून खाक झाला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड