शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

शहरालगतची ‘ती’ २४ गावं कात्रीत!

By admin | Updated: December 7, 2015 00:08 IST

जिल्हा परिषद पाणी देईना; महापालिकेकडून वसुलीसाठी तगादा... लोकसंख्या लाखोंच्या आसपास गेल्याने ग्रामपंचायतींना डोलारा झेपेना... अशा कात्रीत जिल्ह्यातील ‘ती’ २४ गावं अडकली आहेत

पुणे : जिल्हा परिषद पाणी देईना; महापालिकेकडून वसुलीसाठी तगादा... लोकसंख्या लाखोंच्या आसपास गेल्याने ग्रामपंचायतींना डोलारा झेपेना... अशा कात्रीत जिल्ह्यातील ‘ती’ २४ गावं अडकली आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेला आम्हाला तुमच्यातून आता वगळाच, अशी मागणी केली असून, मुख्यमंत्र्यांना साकडे घालत अंतिम आदेश काढून महापालिकेत घ्या, अशी मागणी केली आहे. १९९७ मध्ये सरकारने पुण्याच्या आसपासच्या ३४ गावांचा समावेश पालिका हद्दीत केला. यातील काही गावांमधून पालिका नको, अशी मागणी सुरू झाली. त्यामुळे २००१ मध्ये राज्य सरकारने विशेष आदेश काढून मांजरी, मुंढवा (केशवनगर), उंड्री, पिसोळी, साडेसतरा नळी, लोहगाव, शिवणे, बावधन, सूस आदी २४ गावे पालिका हद्दीतून वगळली.गावे वगळली असली, तरी तिथे पालिकेकडून होत असलेला पाणीपुरवठा सुरूच राहिला. सलग १५ वर्षे या २४ गावांना पालिका पाणीपुरवठा करीत आहे. यापोेटी या ग्रामपंचायतींकडे सुमारे २० कोटींपर्यंत थकबाकी राहिली आहे. आता महापालिका पाणीपट्टी भरा, नाहीतर पाणी तोडतो, अशी धमकी देत आहे. शासनाने काढलेला एक आदेश पुढे करीत जिल्हा परिषद या गावांत कोणतीही नवीन योजना देण्यास तयार होत नाही. गेल्या आठ महिन्यांत न्यायालयाच्या आदेशानुसार करवसुली बंद आहे. त्यामुळे ग्रामपंचायती अडचणीत आहेत. कचरा गाड्यांना डिझेल भरण्यापुरतेही पैैसे त्यांच्याकडे नाहीत. महापालिका पाणी पुरवते; मग त्यांना पाणीपट्टी दिली पाहिजे, हे आम्हाला मान्य आहे; पण आमच्या तिजोरीतच खडखडाट आहे, तर पैैसे कुठून देणार? असा या गावांचा प्रश्न आहे. या सर्व ग्रामपंचायती शहरालगतच्या असून, तेथील लोकसंख्या लाखाच्या आसपास पोहोचली आहे. फुरसुंगीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या तर २ लाखांपर्र्यंत गेली आहे. आता इतक्या मोठ्या लोकसंख्येचा डोलारा या गावांना पेलवत नाही. तेथे पाणी, कचरा, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर झाला आहे. तेथे बकालपणा वाढत आहे. त्यामुळे शासनाने या गावांचा विचार करून त्यांना महापालिकेत समावेश करून घेणे गरजेचे आहे. या गावांची स्थिती ना इकडेचे ना तिकडचे झाली आहे. शासनाच्या आदेशाला बांधील राहत जिल्हा परिषदेने नव्या योजना नाकारल्याने या गावांना त्राता कोणी उरला नाही. त्यामुळे या गावांनी महानगरपालिकेत सामील करण्याची मागणी केली.