शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

राज्यातील २३ जिल्हे तहानलेलेच; मान्सूनचा काढता पाय, केवळ १३ जिल्ह्यांत गाठली सरासरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 09:56 IST

देशात मान्सूनचा कालावधी संपला असून, आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

पुणे : देशात मान्सूनचा कालावधी संपला असून, आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या पावसाळ्यात महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठलेली नाही. राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस नोंदविला गेला असून, इतर २३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. आता परतीचा पाऊस काही दिलासा देऊ शकतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जून-जुलै-ऑगस्ट या तीन महिन्यांमध्येही पावसाने निराशाच केली. आता सप्टेंबर महिनाअखेर काही प्रमाणात राज्यात पाऊस झाला. विदर्भासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

सर्वांत कमी पाऊस कुठे?

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत आणि अकोला, अमरावतीमध्येही कमी पावसाची नोंद आहे.

पुढील दिवसांत काय?

अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र पूर्व ईशान्याकडे सरकण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत कोकण, गोव्यात मुसळधारची शक्यता आहे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान खराब राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मध्य महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. ४ ऑक्टोबरनंतर उत्तर भागातील मान्सून परतेल. उद्या (दि. १) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट आहे. मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहील.

टॅग्स :Rainपाऊस