शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

राज्यातील २३ जिल्हे तहानलेलेच; मान्सूनचा काढता पाय, केवळ १३ जिल्ह्यांत गाठली सरासरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 09:56 IST

देशात मान्सूनचा कालावधी संपला असून, आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

पुणे : देशात मान्सूनचा कालावधी संपला असून, आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या पावसाळ्यात महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठलेली नाही. राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस नोंदविला गेला असून, इतर २३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. आता परतीचा पाऊस काही दिलासा देऊ शकतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जून-जुलै-ऑगस्ट या तीन महिन्यांमध्येही पावसाने निराशाच केली. आता सप्टेंबर महिनाअखेर काही प्रमाणात राज्यात पाऊस झाला. विदर्भासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

सर्वांत कमी पाऊस कुठे?

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वांत कमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत आणि अकोला, अमरावतीमध्येही कमी पावसाची नोंद आहे.

पुढील दिवसांत काय?

अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र पूर्व ईशान्याकडे सरकण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत कोकण, गोव्यात मुसळधारची शक्यता आहे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान खराब राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मध्य महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. ४ ऑक्टोबरनंतर उत्तर भागातील मान्सून परतेल. उद्या (दि. १) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट आहे. मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहील.

टॅग्स :Rainपाऊस