शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

१८ ते ४५ वयोगटाला ‘या वेळी’ मिळेल लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:21 IST

चौथा टप्पा : कोरोना लसीकरण प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना साथीच्या संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लसीकरण प्रक्रियेचा ...

चौथा टप्पा : कोरोना लसीकरण

प्रज्ञा केळकर-सिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना साथीच्या संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लसीकरण प्रक्रियेचा वेग वाढवला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी लसीकरणाचा चौैथा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. चौैथ्या टप्प्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यात लसीकरणाला पात्र नागरिक आणि लसींची उपलब्धतेचा विचार करुन निर्णय घेणे हिताचे ठरेल, असे वैैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. साथीची ही दुसरी लाट असून एप्रिलपर्यंत रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने वाढणार असल्याचा अंदाज आहे. सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही, लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे. मात्र, लसींची उपलब्धता आणि लसीकरणास पात्र व्यक्ती यांचे समीकरण जुळेनासे झाले आहे.

आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होण्याआधीच ४५ ते ५९ मधील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. लसींच्या डोसची कमतरता निर्माण होत आहे. १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींची संख्या, लस कंपन्यांची उत्पादन क्षमता, आधीच्या तिन्ही टप्प्यातील प्रत्येक लाभार्थींसाठी दोन डोसचे नियोजन या सर्व निकषांचा विचार करुनच केंद्र सरकारला नियोजन करावे लागणार आहे.

-----------------------

कोरोना कृती समितीने लसीकरणाच्या चौैथ्या टप्प्याला सुरुवात करण्याची विनंती सरकारला केली आहे. केंद्र सरकारने व्यवस्थित नियोजन केल्यास लसीकरणाचा वेग वाढवता येऊ शकतो.

- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, कोरोना कृती समिती, महाराष्ट्र राज्य

-----------------------

४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांची भारतातील संख्या सुमारे ३० कोटी आहे. त्यापैैकी केवळ १० टक्के लोकांचे लसीकरण आतापर्यंत झाले आहे. ९० टक्के नागरिक अजूनही लसीकरणापासून दूर आहेत. या वयोगटातील १०० टक्के नागरिकांसाठी पुरतील इतके डोस आहेत का, याचा विचार करावा लागेल. त्यामुळे लसींची उपलब्धता लक्षात घेऊन आधी तिसरा टप्पा संपवावा. त्यानंतर ४५-५९ वयोगटातील कोणतीही व्याधी नसलेल्या व्यक्ती, त्यानंतर १८ ते ४५ मधील व्याधीग्रस्त व्यक्ती आणि मग १८ ते ४५ मधील सामान्य व्यक्ती असे नियोजन करावे लागेल.

- डॉ. संजय ललवाणी, वैैद्यकीय संचालक, भारती विद्यापीठ रुग्णालय

----------------------

मागील तीन दिवसांपासून भारतात सुमारे ३० लाख लोकांना लसीकरण केले जात आहे. प्रत्यक्षात, दररोज ७० लाख ते १ कोटी इतके लसीकरण केले जाणे आवश्यक आहे. ४५ वरील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक या वयोगटात कोरोनाचे गांभीर्य वाढण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना झाला तरी बहुतांश वेळा तो सौम्य असतो आणि ते गृह विलगीकरणात बरे होतात. त्यामुळे पुढील महिन्याभरात लसीकरणाचा तिसरा टप्पा संपवावा लागेल. त्यानंतर चौैथा टप्पा सुरु करता येईल. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनप्रमाणेच स्फुटनिक-व्हीचा समावेशही करता येईल. तोपर्यंत इतर लसींच्या मानवी चाचण्यांचे टप्पे पूर्ण करुन त्यांचे उत्पादन सुरु करता येऊ शकते.

- डॉ. अमित द्रविड, संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ