शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

१८ ते ४५ वयोगटाला ‘या वेळी’ मिळेल लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:21 IST

चौथा टप्पा : कोरोना लसीकरण प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना साथीच्या संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लसीकरण प्रक्रियेचा ...

चौथा टप्पा : कोरोना लसीकरण

प्रज्ञा केळकर-सिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना साथीच्या संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लसीकरण प्रक्रियेचा वेग वाढवला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी लसीकरणाचा चौैथा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. चौैथ्या टप्प्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यात लसीकरणाला पात्र नागरिक आणि लसींची उपलब्धतेचा विचार करुन निर्णय घेणे हिताचे ठरेल, असे वैैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. साथीची ही दुसरी लाट असून एप्रिलपर्यंत रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने वाढणार असल्याचा अंदाज आहे. सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही, लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे. मात्र, लसींची उपलब्धता आणि लसीकरणास पात्र व्यक्ती यांचे समीकरण जुळेनासे झाले आहे.

आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होण्याआधीच ४५ ते ५९ मधील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. लसींच्या डोसची कमतरता निर्माण होत आहे. १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींची संख्या, लस कंपन्यांची उत्पादन क्षमता, आधीच्या तिन्ही टप्प्यातील प्रत्येक लाभार्थींसाठी दोन डोसचे नियोजन या सर्व निकषांचा विचार करुनच केंद्र सरकारला नियोजन करावे लागणार आहे.

-----------------------

कोरोना कृती समितीने लसीकरणाच्या चौैथ्या टप्प्याला सुरुवात करण्याची विनंती सरकारला केली आहे. केंद्र सरकारने व्यवस्थित नियोजन केल्यास लसीकरणाचा वेग वाढवता येऊ शकतो.

- डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, कोरोना कृती समिती, महाराष्ट्र राज्य

-----------------------

४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांची भारतातील संख्या सुमारे ३० कोटी आहे. त्यापैैकी केवळ १० टक्के लोकांचे लसीकरण आतापर्यंत झाले आहे. ९० टक्के नागरिक अजूनही लसीकरणापासून दूर आहेत. या वयोगटातील १०० टक्के नागरिकांसाठी पुरतील इतके डोस आहेत का, याचा विचार करावा लागेल. त्यामुळे लसींची उपलब्धता लक्षात घेऊन आधी तिसरा टप्पा संपवावा. त्यानंतर ४५-५९ वयोगटातील कोणतीही व्याधी नसलेल्या व्यक्ती, त्यानंतर १८ ते ४५ मधील व्याधीग्रस्त व्यक्ती आणि मग १८ ते ४५ मधील सामान्य व्यक्ती असे नियोजन करावे लागेल.

- डॉ. संजय ललवाणी, वैैद्यकीय संचालक, भारती विद्यापीठ रुग्णालय

----------------------

मागील तीन दिवसांपासून भारतात सुमारे ३० लाख लोकांना लसीकरण केले जात आहे. प्रत्यक्षात, दररोज ७० लाख ते १ कोटी इतके लसीकरण केले जाणे आवश्यक आहे. ४५ वरील व्याधीग्रस्त आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक या वयोगटात कोरोनाचे गांभीर्य वाढण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना झाला तरी बहुतांश वेळा तो सौम्य असतो आणि ते गृह विलगीकरणात बरे होतात. त्यामुळे पुढील महिन्याभरात लसीकरणाचा तिसरा टप्पा संपवावा लागेल. त्यानंतर चौैथा टप्पा सुरु करता येईल. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनप्रमाणेच स्फुटनिक-व्हीचा समावेशही करता येईल. तोपर्यंत इतर लसींच्या मानवी चाचण्यांचे टप्पे पूर्ण करुन त्यांचे उत्पादन सुरु करता येऊ शकते.

- डॉ. अमित द्रविड, संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ