शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

जिल्ह्यात १ लाख ७० हजार शेतक-यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 13:47 IST

सरकारने  शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीला वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात सरकार, प्रशासन आणि शेतकरी या सर्वांच्या बाजूने बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे,त्यामुळे या कर्जमाफीची खरे लाभार्थी आणि अपेक्षार्थी यांची संख्या अजूनतरी खात्रीपूर्वक समोर आलेली नाही. 

ठळक मुद्दे १ लाख ७० हजार ४३० शेतकऱ्यांना आतापर्यंत ५७ हजार ८७.०१ लाख कोटी रुपयांची कर्जमाफीपुणे जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार ५६ अर्ज जिल्ह्यात दौंड,इंदापूर, शिरूर ,बारामती तालुक्यातील अधिक शेतक-यांनी या योजनेचा लाभ

पुणे: राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्हयातून २ लाख ९८ हजार ५६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) १ लाख ७० हजार ४३० शेतकऱ्यांना आतापर्यंत ५७ हजार ८७.०१ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक आणि खासगी बँकांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ प्राप्त झाला आहे.राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेला एक वर्ष पूर्ण होत आहे. आॅनलाईन अर्ज भरून आॅनलाईन पध्दतीनेच कर्जाची रक्कम खात्यामध्ये जमा होत असल्याने त्यात पारदर्शकता आणली जात आहे, असे शासनातर्फे सांगितले जात आहे.मात्र,त्यास विलंब होत असल्याने शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच आहे.राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी २२ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार ५६ अर्ज आले होते. त्यांपैकी पीडीसीसी बँकेचे १ लाख ११ हजार थकबाकीदार आणि १ लाख १८ हजार प्रोत्साहनपर लाभार्थी होते, तर व्यावसायिक आणि खासगी बँकांचे ६९ हजार ५६ लाभार्थी होते. सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी २ हजार ३० कोटी एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली होती. ----------------------जिल्ह्यात दौंड,इंदापूर, शिरूर ,बारामती तालुक्यातील अधिक शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज  प्राप्त झाले होते. त्यापैकी पीडीसीसी बँकेचे १ लाख ११ हजार थकबाकीदार आणि १ लाख १८ हजार प्रोत्साहनपर लाभार्थी होते. त्यातील ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या ५१ हजार ६७१ शेतक-यांना २८ हजार ८१.१२ लाख रुपयांची मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ११ हजार ६४४ शेतकऱ्यांना ११ हजार ५५९ लाख रुपयांची एक वेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट- ओटीएस) कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या १ लाख ७  हजार ११५ शेतकऱ्यांना १७ हजार ४४६.८९ लाख रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाची रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ७० हजार ४३० शेतक-यांना ५७ हजार ८७.०१ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे,असे सहकार विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारFarmerशेतकरीbankबँक