शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पास दरवाढीविरोधात १५००० सह्यांचे निवेदन; स्थायी समितीला प्रवाशांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 03:34 IST

बस पास दरवाढ तसेच पंचिंग पास बंदविरोधात पीएमपी प्रवासी मंचने विविध बसस्थानकांवर राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेत १५ हजार प्रवाशांनी सहभाग घेतला. या प्रवाशांच्या सह्यांचे निवेदन शनिवारी महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले.

पुणे : बस पास दरवाढ तसेच पंचिंग पास बंदविरोधात पीएमपी प्रवासी मंचने विविध बसस्थानकांवर राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेत १५ हजार प्रवाशांनी सहभाग घेतला. या प्रवाशांच्या सह्यांचे निवेदन शनिवारी महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले.पीएमपीकडून १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर बस पास मध्ये अनावश्यक बेकायदा दरवाढ करण्यात आल्याचा दावा पीएमपी प्रवासी मंचने केला आहे. ही दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मंचच्या वतीने विविध बसस्थानकावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मंचामधील कार्यकर्त्यांनी विविध स्थानकांवर जाऊन प्रवाशांशी चर्चा करून पास दरवाढीविरोधात त्यांचे सह्यांच्या रुपाने समर्थनही मिळविले आहे. या मोहिमेत १५ हजार प्रवाशांनी सहभाग घेतला आहे. या सह्यांचे निवेदन पीएमपी प्रवासी मंच आणि सहभागी संस्थांतर्फे मोहोळ यांना देण्यात आले. बसपास दरवाढ कमी करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडचे महापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांचे संचालक मंडळ एकमताने ठराव मांडणार असल्याचे आश्वासन मोहोळ यांनी या वेळी दिले.सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, सहसचिव सतीश चितळे, जयदीप साठे, नीलकंठ मांढरे, आशा शिंदे, नागरिक चेतना मंचाचे कर्नल बाबूराव चौधरी, जनवादी महिला संघटनेच्या सरस्वती भांदिरगे, आम आदमी पार्टीचे किशोर मुजुमदार, एस. एम. अली, लोकायतचे तुषार भोतमांगे आदी उपस्थित होते.- १ सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर बस पासमध्ये अनावश्यक बेकायदा दरवाढ करण्यात आल्याचा पीएमपी प्रवासी मंचने केला दावा.

टॅग्स :Puneपुणे