शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत १४ दिवस कडक 'जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 20:31 IST

बारामती शहराच्या सीमा चारही बाजुने होणार ‘सील’

बारामती : बारामती शहर तालुक्यात गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णांनी त्रिशतक पार केले. सलग तीन दिवस कोरोना रुग्णांचा आलेख चढता राहिल्याने प्रशासन हादरले.अखेर प्रशासनाने कडक निर्बंध लागु करीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. यामध्ये मेडिकल,दूध वगळता सर्व सेवा,व्यवसाय बंद राहणार आहेत. बारामती शहराच्या सीमा चारही बाजुने ‘सील’ करण्यात येणार आहे.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,  पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्यधिकारी किरणराज यादव यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार बारामती तालुका व शहर दि ७ सप्टेंबर ते २१ पर्यंत जनता कर्फ्यु राहणार आहे.

शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहर कडक लॉकडाऊन असणार आहे. याबाबत आज नगराध्यक्ष  तावरे यांनी पत्रकारांच्या बैठकीत सांगितले की, शहरातील मागील चार दिवसातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० टक्के एवढी आहे.त्यामुळे वैद्यकीय सेवा ढासळू नये यासाठी चौदा दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. पुढील चौदा दिवस कोणालाही अत्यावश्यक सेवा वगळता घरातून बाहेर पडता येणार नाही.तसेच शहरातून बाहेर किंवा बाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही.

तालुक्यातील कोरोना संसर्गाने  बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.शहरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.जनता कर्फ्युसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. शहरातील खासगी डॉक्टरांनी कोविडच्या कामात हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला. 

कोरोनाचे रुग्ण असणाऱ्या भागात जनता कर्फ्यू राहणार आहे. तरतालुक्याबाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही प्रत्येक गावातीललोकांनी अत्यावश्यक सेवा वगळता आपल्या गावाची सीमा बंद करायची आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे व्यवसाय, हातगाडी, अन्य विक्रेते सुरू राहणार नाहीत. यामुळे देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या संदर्भात माहिती साठी डॉ.मनोज खोमणे तर शहरातील नागरिकांनी डॉ. सदानंद काळे व डॉ. पंकज गांधी यांच्याशी व्हाट्सए वर संपर्क साधावा.तसेच आपल्या जवळील खासगी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,असे आवाहन तावरे यांनी केले. आता कोरोना संसर्गाची तपासणी केल्यानंंतर संबंधितांना त्याच थांबविण्यात येणार आहे.त्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला तेथून थेट रुग्णालयात नेणार आहेत.त्यामुळे त्याच्या घरच्या किंवा आसपासच्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तर या रुग्णांवर चौदा दिवस रुग्णांवर योग्य इलाज झाल्यास कोरोना संसर्ग आटोक्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

......बारामती एमआयडीसीत कंपन्या सुरुच राहणार  बारामती शहर आणि तालुक्यात जनता कर्फ्यु जाहिर करण्यात आला आहे.या दरम्यान शहर  आणि तालुक्याच्या सर्व सीमा सील राहणार आहेत.मात्र,एमआयडीसीतील कंपन्या ,उद्योग नियम व अटींनुसार सुरुच राहणार आहेत. कंपन्यांमधील कामगारांना त्यांचे ओळखपत्र दाखवुन सोडले जाणार आहे,अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.————————————————————————————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवार