शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत १४ दिवस कडक 'जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 20:31 IST

बारामती शहराच्या सीमा चारही बाजुने होणार ‘सील’

बारामती : बारामती शहर तालुक्यात गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णांनी त्रिशतक पार केले. सलग तीन दिवस कोरोना रुग्णांचा आलेख चढता राहिल्याने प्रशासन हादरले.अखेर प्रशासनाने कडक निर्बंध लागु करीत १४ दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. यामध्ये मेडिकल,दूध वगळता सर्व सेवा,व्यवसाय बंद राहणार आहेत. बारामती शहराच्या सीमा चारही बाजुने ‘सील’ करण्यात येणार आहे.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,  पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्यधिकारी किरणराज यादव यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार बारामती तालुका व शहर दि ७ सप्टेंबर ते २१ पर्यंत जनता कर्फ्यु राहणार आहे.

शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहर कडक लॉकडाऊन असणार आहे. याबाबत आज नगराध्यक्ष  तावरे यांनी पत्रकारांच्या बैठकीत सांगितले की, शहरातील मागील चार दिवसातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० टक्के एवढी आहे.त्यामुळे वैद्यकीय सेवा ढासळू नये यासाठी चौदा दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. पुढील चौदा दिवस कोणालाही अत्यावश्यक सेवा वगळता घरातून बाहेर पडता येणार नाही.तसेच शहरातून बाहेर किंवा बाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही.

तालुक्यातील कोरोना संसर्गाने  बळी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.शहरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.जनता कर्फ्युसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. शहरातील खासगी डॉक्टरांनी कोविडच्या कामात हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला. 

कोरोनाचे रुग्ण असणाऱ्या भागात जनता कर्फ्यू राहणार आहे. तरतालुक्याबाहेरील कोणालाही शहरात येता येणार नाही प्रत्येक गावातीललोकांनी अत्यावश्यक सेवा वगळता आपल्या गावाची सीमा बंद करायची आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे व्यवसाय, हातगाडी, अन्य विक्रेते सुरू राहणार नाहीत. यामुळे देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.तालुक्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या संदर्भात माहिती साठी डॉ.मनोज खोमणे तर शहरातील नागरिकांनी डॉ. सदानंद काळे व डॉ. पंकज गांधी यांच्याशी व्हाट्सए वर संपर्क साधावा.तसेच आपल्या जवळील खासगी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,असे आवाहन तावरे यांनी केले. आता कोरोना संसर्गाची तपासणी केल्यानंंतर संबंधितांना त्याच थांबविण्यात येणार आहे.त्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला तेथून थेट रुग्णालयात नेणार आहेत.त्यामुळे त्याच्या घरच्या किंवा आसपासच्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तर या रुग्णांवर चौदा दिवस रुग्णांवर योग्य इलाज झाल्यास कोरोना संसर्ग आटोक्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

......बारामती एमआयडीसीत कंपन्या सुरुच राहणार  बारामती शहर आणि तालुक्यात जनता कर्फ्यु जाहिर करण्यात आला आहे.या दरम्यान शहर  आणि तालुक्याच्या सर्व सीमा सील राहणार आहेत.मात्र,एमआयडीसीतील कंपन्या ,उद्योग नियम व अटींनुसार सुरुच राहणार आहेत. कंपन्यांमधील कामगारांना त्यांचे ओळखपत्र दाखवुन सोडले जाणार आहे,अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.————————————————————————————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवार